शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

७५ टक्के एफआरपी देणाऱ्या कारखानदारांना मिळणार कारवाईतून सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:19 IST

: कोल्हापूर विभागातील केवळ १९ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात गाळप ...

: कोल्हापूर विभागातील केवळ १९ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात गाळप झाल्यापासून १४ दिवसांत एफआरपी देण्याचा कायदा आहे. जर नाही दिली तर अशा कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत साखर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांना एफआरपी अदा करण्याचा अधिकार साखर आयुक्तांना आहेत; पण प्रादेशिक सहसंचालक व साखर आयुक्त अशी कारवाई करण्याची टाळाटाळ करत असल्याने कारखानदार ऊस उत्पादकांना वेळेत पैसे अदा करत नसल्याचे चित्र याही हंगामात पहायला मिळत आहे.

हंगाम २०२०/२१ कोल्हापूर विभागात ४२ कारखान्यांपैकी ३७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम यशस्वी पार पाडले आहेत. केवळ १९ साखर कारखान्यांनी या हंगामातील १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. साखर हंगाम संपन्न होऊन जवळपास दीड-दोन महिने झाले असले तरी शेतकऱ्यांना कारखानदारांकडून कधी एफआरपी मिळणार याकडे डोळे लागले आहेत.

ऊस(नियंत्रण)आदेश १९६६ मधील कलम ३(३)च्या तरतुदीनुसार गाळप केलेल्या उसाचे बिल १४ दिवसांत एफआरपीप्रमाणे ऊस पुरवठादारांना अदा करणे कायद्याने बंधनकारक आहे. या विहित कालावधीत एफआरपी अदा केली नाही, तर कलम ३ (३A) नुसार विलंब कालावधीसाठी १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे.

कोल्हापूर विभागातील केवळ १९ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी अदा केली असून, अजून १९ कारखान्यांकडे कोट्यवधीची एफआरपी थकीत आहे. परंतु प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने काही कारखानदारांना वाचवण्यासाठी एक मार्ग काढला असून, ज्या कारखान्यांनी ७५ टक्केपेक्षा कमी एफआरपी दिली आहे, अशाच कारखान्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. यामुळे आणखी १० कारखाने कारवाईपासून वाचणार आहेत. कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालकांनी पाठवलेल्या या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला असून, १०० टक्के एफआरपी न देणाऱ्या सर्व कारखान्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया :

ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ हा कायदा ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांत कारखान्यांंनी १०० टक्के ऊस बिल अदा करण्याचा कायदा आहे. कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालकांनी बड्या नेत्यांच्या कारखान्यांवर कारवाई होणार असल्याने दबावाखाली ७५ टक्के हा बेस लावून कारवाईचे आयुक्तांना प्रस्ताव पाठवले आहेत. परंतु हे चुकीचे असून याबाबत साखर आयुक्तांना जाब विचारणार आहे.

-धनाजी चुडमुंग, अंकुश शेतकरी संघटना

हंगाम २०२०/२१ मधील कोल्हापूर विभागाचा एफआरपी लेखा-जोखा

कोल्हापूर विभाग एकूण कारखाने ४२ हंगाम घेतलेले ३७

कोल्हापूर जिल्हा २३ कारखाने

हंगाम घेतलेले २२

१०० टक्के एफआरपी देणारे कारखाने -१५

७५ ते ९५ टक्के एफआरपी देणारे कारखाने - ५

७५ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे कारखाने - २

सांगली जिल्हा १७ कारखाने

हंगाम घेतलेले -- १५

१०० टक्के एफआरपी देणारे कारखाने - ४

७५ ते ९५ टक्के एफआरपी देणारे कारखाने - ६

७५ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे कारखाने - ५