शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

७५ टक्के एफआरपी देणाऱ्या कारखानदारांना मिळणार कारवाईतून सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:19 IST

: कोल्हापूर विभागातील केवळ १९ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात गाळप ...

: कोल्हापूर विभागातील केवळ १९ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात गाळप झाल्यापासून १४ दिवसांत एफआरपी देण्याचा कायदा आहे. जर नाही दिली तर अशा कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत साखर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांना एफआरपी अदा करण्याचा अधिकार साखर आयुक्तांना आहेत; पण प्रादेशिक सहसंचालक व साखर आयुक्त अशी कारवाई करण्याची टाळाटाळ करत असल्याने कारखानदार ऊस उत्पादकांना वेळेत पैसे अदा करत नसल्याचे चित्र याही हंगामात पहायला मिळत आहे.

हंगाम २०२०/२१ कोल्हापूर विभागात ४२ कारखान्यांपैकी ३७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम यशस्वी पार पाडले आहेत. केवळ १९ साखर कारखान्यांनी या हंगामातील १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. साखर हंगाम संपन्न होऊन जवळपास दीड-दोन महिने झाले असले तरी शेतकऱ्यांना कारखानदारांकडून कधी एफआरपी मिळणार याकडे डोळे लागले आहेत.

ऊस(नियंत्रण)आदेश १९६६ मधील कलम ३(३)च्या तरतुदीनुसार गाळप केलेल्या उसाचे बिल १४ दिवसांत एफआरपीप्रमाणे ऊस पुरवठादारांना अदा करणे कायद्याने बंधनकारक आहे. या विहित कालावधीत एफआरपी अदा केली नाही, तर कलम ३ (३A) नुसार विलंब कालावधीसाठी १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे.

कोल्हापूर विभागातील केवळ १९ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी अदा केली असून, अजून १९ कारखान्यांकडे कोट्यवधीची एफआरपी थकीत आहे. परंतु प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने काही कारखानदारांना वाचवण्यासाठी एक मार्ग काढला असून, ज्या कारखान्यांनी ७५ टक्केपेक्षा कमी एफआरपी दिली आहे, अशाच कारखान्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. यामुळे आणखी १० कारखाने कारवाईपासून वाचणार आहेत. कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालकांनी पाठवलेल्या या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला असून, १०० टक्के एफआरपी न देणाऱ्या सर्व कारखान्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया :

ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ हा कायदा ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांत कारखान्यांंनी १०० टक्के ऊस बिल अदा करण्याचा कायदा आहे. कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालकांनी बड्या नेत्यांच्या कारखान्यांवर कारवाई होणार असल्याने दबावाखाली ७५ टक्के हा बेस लावून कारवाईचे आयुक्तांना प्रस्ताव पाठवले आहेत. परंतु हे चुकीचे असून याबाबत साखर आयुक्तांना जाब विचारणार आहे.

-धनाजी चुडमुंग, अंकुश शेतकरी संघटना

हंगाम २०२०/२१ मधील कोल्हापूर विभागाचा एफआरपी लेखा-जोखा

कोल्हापूर विभाग एकूण कारखाने ४२ हंगाम घेतलेले ३७

कोल्हापूर जिल्हा २३ कारखाने

हंगाम घेतलेले २२

१०० टक्के एफआरपी देणारे कारखाने -१५

७५ ते ९५ टक्के एफआरपी देणारे कारखाने - ५

७५ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे कारखाने - २

सांगली जिल्हा १७ कारखाने

हंगाम घेतलेले -- १५

१०० टक्के एफआरपी देणारे कारखाने - ४

७५ ते ९५ टक्के एफआरपी देणारे कारखाने - ६

७५ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे कारखाने - ५