शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

७५ टक्के एफआरपी देणाऱ्या कारखानदारांना मिळणार कारवाईतून सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:19 IST

: कोल्हापूर विभागातील केवळ १९ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात गाळप ...

: कोल्हापूर विभागातील केवळ १९ कारखान्यांनी दिली १०० टक्के एफआरपी

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : शेतकऱ्याचा ऊस कारखान्यात गाळप झाल्यापासून १४ दिवसांत एफआरपी देण्याचा कायदा आहे. जर नाही दिली तर अशा कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत साखर जप्तीची कारवाई करून शेतकऱ्यांना एफआरपी अदा करण्याचा अधिकार साखर आयुक्तांना आहेत; पण प्रादेशिक सहसंचालक व साखर आयुक्त अशी कारवाई करण्याची टाळाटाळ करत असल्याने कारखानदार ऊस उत्पादकांना वेळेत पैसे अदा करत नसल्याचे चित्र याही हंगामात पहायला मिळत आहे.

हंगाम २०२०/२१ कोल्हापूर विभागात ४२ कारखान्यांपैकी ३७ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम यशस्वी पार पाडले आहेत. केवळ १९ साखर कारखान्यांनी या हंगामातील १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली आहे. साखर हंगाम संपन्न होऊन जवळपास दीड-दोन महिने झाले असले तरी शेतकऱ्यांना कारखानदारांकडून कधी एफआरपी मिळणार याकडे डोळे लागले आहेत.

ऊस(नियंत्रण)आदेश १९६६ मधील कलम ३(३)च्या तरतुदीनुसार गाळप केलेल्या उसाचे बिल १४ दिवसांत एफआरपीप्रमाणे ऊस पुरवठादारांना अदा करणे कायद्याने बंधनकारक आहे. या विहित कालावधीत एफआरपी अदा केली नाही, तर कलम ३ (३A) नुसार विलंब कालावधीसाठी १५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे.

कोल्हापूर विभागातील केवळ १९ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी अदा केली असून, अजून १९ कारखान्यांकडे कोट्यवधीची एफआरपी थकीत आहे. परंतु प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने काही कारखानदारांना वाचवण्यासाठी एक मार्ग काढला असून, ज्या कारखान्यांनी ७५ टक्केपेक्षा कमी एफआरपी दिली आहे, अशाच कारखान्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. यामुळे आणखी १० कारखाने कारवाईपासून वाचणार आहेत. कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालकांनी पाठवलेल्या या प्रस्तावावर शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला असून, १०० टक्के एफआरपी न देणाऱ्या सर्व कारखान्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया :

ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ हा कायदा ऊसगाळप झाल्यानंतर १४ दिवसांत कारखान्यांंनी १०० टक्के ऊस बिल अदा करण्याचा कायदा आहे. कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालकांनी बड्या नेत्यांच्या कारखान्यांवर कारवाई होणार असल्याने दबावाखाली ७५ टक्के हा बेस लावून कारवाईचे आयुक्तांना प्रस्ताव पाठवले आहेत. परंतु हे चुकीचे असून याबाबत साखर आयुक्तांना जाब विचारणार आहे.

-धनाजी चुडमुंग, अंकुश शेतकरी संघटना

हंगाम २०२०/२१ मधील कोल्हापूर विभागाचा एफआरपी लेखा-जोखा

कोल्हापूर विभाग एकूण कारखाने ४२ हंगाम घेतलेले ३७

कोल्हापूर जिल्हा २३ कारखाने

हंगाम घेतलेले २२

१०० टक्के एफआरपी देणारे कारखाने -१५

७५ ते ९५ टक्के एफआरपी देणारे कारखाने - ५

७५ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे कारखाने - २

सांगली जिल्हा १७ कारखाने

हंगाम घेतलेले -- १५

१०० टक्के एफआरपी देणारे कारखाने - ४

७५ ते ९५ टक्के एफआरपी देणारे कारखाने - ६

७५ टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे कारखाने - ५