शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मानेवाडी, अवचितवाडीत एस.टी. बस पोहोचणार तरी केव्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास सत्तर वर्षांचा कालखंड लोटला तरीदेखील तुळशी नदीकाठावरील मानेवाडी व अवचितवाडी ...

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास सत्तर वर्षांचा कालखंड लोटला तरीदेखील तुळशी नदीकाठावरील मानेवाडी व अवचितवाडी ही गावे एसटी बसपासून वंचित आहेत. येथील ग्रामस्थांना एसटीचा प्रवास लाभणार तरी केव्हा? की अनेक वर्षे वाटच पाहावी लागणार, असा प्रश्न येथील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. एसटीअभावी येथील विद्यार्थ्यांची चांगलीच ससेहोलपट होत असून, केवळ शाळेसाठी सहा किलोमीटरची पायपीट करून या विद्यार्थ्यांना धामोड येथे चालत यावे लागत आहे.

महाराष्ट्र शासनाने गाव तिथे एस.टी. या ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्रातील बहुतांशी वाड्या-वस्त्यापर्यंत एसटी सेवा पोहोचविण्याचे काम केले. पण, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात अद्यापही अशी काही खेडी एसटी बसपासून वंचित राहिलेली आहेत. दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे येथील राहणीमान व त्याचबरोबर विकासकामांचा आलेख घसरताना पाहावयास मिळतो आहे. शालेय विद्यार्थ्यांना तर याचा नाहक त्रास होत असून, दळणवळणाच्या सुविधा नसल्याने या ठिकाणच्या मुलींचे शिक्षण थांबल्याचेही आकडेवारीवरून लक्षात येते.

तुळशी नदीकाठावरील ही दोन गावेही एसटी सेवेपासून अद्याप वंचित असल्याने या गावातील दहावी पास नंतरच्या मुलींना शालेय शिक्षण घेता येणे अवघड बनले आहे. इच्छा असूनही दळणवळणाच्या सुविधा नसल्याने या दोन गावांतील बारावी पास मुलींची आकडेवारी दोन अंकी संकेतही पाहावयास मिळत नाही. धामोड- म्हासुर्ली या मुख्य रस्त्यापासून साधारणत: दीड ते दोन किलोमीटर ही गावे आत असल्याने या मार्गावरून धावणारी एकमेव एस.टी. चुकल्यास मुलांना सहा किलोमीटरची पायपीट करून धामोड येथील शाळेत जावे लागत आहे.

एसटी सुरू करण्याबाबतची निवेदने येथील ग्रामस्थांकडून वारंवार देऊनदेखील या निवेदनात अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविली गेली आहे. त्यामुळे आता येथील ग्रामस्थांनी अखेरचा प्रयोग म्हणून एसटी आगार प्रमुखांच्या दारात ठिय्या मांडण्याचे ठरविले आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत जागृतीची भूमिका बजावणाऱ्या सरकारने केवळ जाहिरातींच्या माध्यमातून आपली तत्परता न दाखविता अशा खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाबाबत मुलांची होणारी आबाळ थांबविण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा अद्ययावत करणे गरजेचे आहे .

प्रतिक्रिया :

मानेवाडी ग्रामस्थांचा एस.टी. सेवेचा प्रश्न अकरा वेळा निवेदन देऊनदेखील अद्यापही सुटलेला नाही. आता आर-पारची लढाई म्हणून आगारप्रमुख राधानगरी यांच्या दारातच ठिय्या आंदोलन करणार आहोत.

- सचिन पाटील