शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

मानेवाडी, अवचितवाडीत एस.टी. बस पोहोचणार तरी केव्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:23 IST

श्रीकांत ऱ्हायकर धामोड : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास सत्तर वर्षांचा कालखंड लोटला तरीदेखील तुळशी नदीकाठावरील मानेवाडी व अवचितवाडी ...

श्रीकांत ऱ्हायकर

धामोड : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास सत्तर वर्षांचा कालखंड लोटला तरीदेखील तुळशी नदीकाठावरील मानेवाडी व अवचितवाडी ही गावे एसटी बसपासून वंचित आहेत. येथील ग्रामस्थांना एसटीचा प्रवास लाभणार तरी केव्हा? की अनेक वर्षे वाटच पाहावी लागणार, असा प्रश्न येथील ग्रामस्थांतून उपस्थित केला जात आहे. एसटीअभावी येथील विद्यार्थ्यांची चांगलीच ससेहोलपट होत असून, केवळ शाळेसाठी सहा किलोमीटरची पायपीट करून या विद्यार्थ्यांना धामोड येथे चालत यावे लागत आहे.

महाराष्ट्र शासनाने गाव तिथे एस.टी. या ब्रीद वाक्य घेऊन महाराष्ट्रातील बहुतांशी वाड्या-वस्त्यापर्यंत एसटी सेवा पोहोचविण्याचे काम केले. पण, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात अद्यापही अशी काही खेडी एसटी बसपासून वंचित राहिलेली आहेत. दळणवळणाच्या सुविधा नसल्यामुळे येथील राहणीमान व त्याचबरोबर विकासकामांचा आलेख घसरताना पाहावयास मिळतो आहे. शालेय विद्यार्थ्यांना तर याचा नाहक त्रास होत असून, दळणवळणाच्या सुविधा नसल्याने या ठिकाणच्या मुलींचे शिक्षण थांबल्याचेही आकडेवारीवरून लक्षात येते.

तुळशी नदीकाठावरील ही दोन गावेही एसटी सेवेपासून अद्याप वंचित असल्याने या गावातील दहावी पास नंतरच्या मुलींना शालेय शिक्षण घेता येणे अवघड बनले आहे. इच्छा असूनही दळणवळणाच्या सुविधा नसल्याने या दोन गावांतील बारावी पास मुलींची आकडेवारी दोन अंकी संकेतही पाहावयास मिळत नाही. धामोड- म्हासुर्ली या मुख्य रस्त्यापासून साधारणत: दीड ते दोन किलोमीटर ही गावे आत असल्याने या मार्गावरून धावणारी एकमेव एस.टी. चुकल्यास मुलांना सहा किलोमीटरची पायपीट करून धामोड येथील शाळेत जावे लागत आहे.

एसटी सुरू करण्याबाबतची निवेदने येथील ग्रामस्थांकडून वारंवार देऊनदेखील या निवेदनात अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविली गेली आहे. त्यामुळे आता येथील ग्रामस्थांनी अखेरचा प्रयोग म्हणून एसटी आगार प्रमुखांच्या दारात ठिय्या मांडण्याचे ठरविले आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत जागृतीची भूमिका बजावणाऱ्या सरकारने केवळ जाहिरातींच्या माध्यमातून आपली तत्परता न दाखविता अशा खेड्यापाड्यांमध्ये शिक्षणाबाबत मुलांची होणारी आबाळ थांबविण्यासाठी दळणवळणाच्या सुविधा अद्ययावत करणे गरजेचे आहे .

प्रतिक्रिया :

मानेवाडी ग्रामस्थांचा एस.टी. सेवेचा प्रश्न अकरा वेळा निवेदन देऊनदेखील अद्यापही सुटलेला नाही. आता आर-पारची लढाई म्हणून आगारप्रमुख राधानगरी यांच्या दारातच ठिय्या आंदोलन करणार आहोत.

- सचिन पाटील