शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

मानाचे ‘जग’ सौंदत्तीला रवाना

By admin | Updated: November 30, 2014 01:01 IST

उदं गं आई उदं’चा गजर, फुलांचा वर्षाव

 कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीचा कडकडाट... हिरव्या बांगड्या, ओटी व फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे ‘जग’ सासनकाठी... फटाक्यांची आतषबाजी... अशा धार्मिक वातावरणात आज, शनिवारी सौंदत्तीला रवाना झाले. सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची यात्रा ५ डिसेंबर रोजी आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातून ओढ्यावरील रेणुका मंदिराचा मदनआई शांताबाई जाधव, रविवार पेठेतील बायाक्काबाई चव्हाण, शुक्रवार पेठेतील लक्ष्मीबाई जाधव व बेलबाग येथील शिवाजी आळवेकर यांचे मानाचे चार ‘जग’ जातात. आज दुपारी बारा वाजता बेलबाग येथील शिवाजी आळवेकर यांचा जग सौंदत्तीला रवाना झाला. दुपारी चार वाजता रेणुका मंदिर, रविवार पेठ आणि शुक्रवार पेठेतील मानाचे जग बिंदू चौकात आले. येथील गजेंद्रलक्ष्मी मंदिर येथे फुलांनी सजलेल्या जगांची हलगीसह वाद्यांच्या गजरात देवीची आरती झाली. फुलांच्या वर्षावात मानकऱ्यांनी हे जग डोक्यावर घेतले आणि ‘उदं गं आई उदं’चा गजर झाला. जगाच्या मार्गात फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतषबाजी केली जात होती. नागरिक जगांचे दर्शन घेत होते. या जगांची मिरवणूक बिंदू चौकातून आझाद चौक, उमा टॉकीज, ओढ्यावरील गणेशमंदिरमार्गे पार्वती टॉकीज येथे आली. येथे जगांना निरोप देण्यात आला. या यात्रेच्या दोन दिवस आधीच कोल्हापुरातील भाविक सौंदत्तीला रवाना होतात. तीन दिवस आणि चार रात्री असा या यात्रेचा कालावधी असतो. यात्रेच्या आदल्या दिवशी गोड नैवेद्य केला जातो. मुख्य यात्रेदिवशी कडबू, आंबील, वडी, वांगी, मेथी, भात असा नैवेद्य देवीला दाखविला जातो. यात्रा पार पडल्यानंतर चार ते पाच दिवसांनी कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा असते.