शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मलकापूरची रताळी गुजरातला -नवरात्रौत्सवामुळे मागणी :

By admin | Updated: September 25, 2014 23:26 IST

वाशी, मुंबई, पुणे बाजारपेठेत क्विंटलला तीन हजारपर्यंत दर

मलकापूर : मलकापूर परिसरातील रताळी नवरात्रौत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर थेट कोल्हापूरसह, नवी मुंबई (वाशी), मुंबई व पुण्याच्या बाजारपेठेसह गुजरातमध्येही पोहोचली आहेत. रताळीला क्विंटलला दोन ते तीन हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर घाऊक बाजारातही सुमारे २५ ते ३० रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरीही खुशीत आहे. शाहूवाडी तालुक्यात प्रामुख्याने भात व ऊस शेती केली जाते. दहा वर्षांपासून रताळी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. चालू वर्षी एक महिना पाऊस उशिराने दाखल झाला. त्यामुळे रताळी उत्पादनात मोठी घट जाणवू लागली आहे. मात्र, मुंबई, पुणे, वाशी येथे क्विंटलला सरासरी दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पेरीड, कडवे, निनाई परळे, आळतूर, निळे, करुंगळे, भोसलेवाडी, शाहूवाडी, चनवाड, वाळूर, कासार्डे या परिसरातील शेतकरी रताळी पीक घेताना दिसतात. नवरात्रौत्सवात रताळ्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. कोकणातील रत्नागिरी, खेड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, पुणे कर्नाटक, वाशी, गुजरात, आदी बाजारपेठांत येथील लाल रंगाची गोड रताळी निर्यात होत असतात. खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड केली जाते. रेताड मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. मात्र, यंदा पावसाने एक महिना ओढ दिल्याने रताळी पीक उत्पादनात घट झाली आहे. केवळ तीन महिन्यांचे पीक नवरात्रौत्सवात काढणीस येत असल्याने ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येतो. अलीकडे या नगदी पिकाकडे शेतकरी वळला आहे. मात्र, पारंपरिक पद्धतीने शेतकरी रताळ्याचे उत्पादन घेतो. शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना हे पीक उत्पादन आधुनिक पद्धतीने घेण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यावर प्रक्रिया करण्याचे उद्योग उभारले पाहिजेत. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना जादा पैसे स्थानिक बाजारपेठेत रताळीचा ३० ते ३५ रुपये किलो, तर घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किलो विक्रीचा दर आहे. नवरात्रौत्सव, ईद व टिपरी पौर्णिमा या काळात रताळ्यांना मोठी मागणी असते. पाच वर्षांपूर्वी येथील रताळी स्थानिक व्यापारी, दलाल यांच्यामार्फत निर्यात होत होती. मात्र, अलीकडे शेतकरी स्वत:च्या किंवा भाड्याच्या वाहनातून थेट पुणे, मुंबई, वाशी किंवा गुजरात, कोकण, आदी बाजारपेठेत रताळी विक्रीस नेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा पैसे मिळत आहेत.