शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरची रताळी गुजरातला -नवरात्रौत्सवामुळे मागणी :

By admin | Updated: September 25, 2014 23:26 IST

वाशी, मुंबई, पुणे बाजारपेठेत क्विंटलला तीन हजारपर्यंत दर

मलकापूर : मलकापूर परिसरातील रताळी नवरात्रौत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर थेट कोल्हापूरसह, नवी मुंबई (वाशी), मुंबई व पुण्याच्या बाजारपेठेसह गुजरातमध्येही पोहोचली आहेत. रताळीला क्विंटलला दोन ते तीन हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर घाऊक बाजारातही सुमारे २५ ते ३० रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरीही खुशीत आहे. शाहूवाडी तालुक्यात प्रामुख्याने भात व ऊस शेती केली जाते. दहा वर्षांपासून रताळी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. चालू वर्षी एक महिना पाऊस उशिराने दाखल झाला. त्यामुळे रताळी उत्पादनात मोठी घट जाणवू लागली आहे. मात्र, मुंबई, पुणे, वाशी येथे क्विंटलला सरासरी दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पेरीड, कडवे, निनाई परळे, आळतूर, निळे, करुंगळे, भोसलेवाडी, शाहूवाडी, चनवाड, वाळूर, कासार्डे या परिसरातील शेतकरी रताळी पीक घेताना दिसतात. नवरात्रौत्सवात रताळ्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. कोकणातील रत्नागिरी, खेड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, पुणे कर्नाटक, वाशी, गुजरात, आदी बाजारपेठांत येथील लाल रंगाची गोड रताळी निर्यात होत असतात. खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड केली जाते. रेताड मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. मात्र, यंदा पावसाने एक महिना ओढ दिल्याने रताळी पीक उत्पादनात घट झाली आहे. केवळ तीन महिन्यांचे पीक नवरात्रौत्सवात काढणीस येत असल्याने ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येतो. अलीकडे या नगदी पिकाकडे शेतकरी वळला आहे. मात्र, पारंपरिक पद्धतीने शेतकरी रताळ्याचे उत्पादन घेतो. शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना हे पीक उत्पादन आधुनिक पद्धतीने घेण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यावर प्रक्रिया करण्याचे उद्योग उभारले पाहिजेत. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना जादा पैसे स्थानिक बाजारपेठेत रताळीचा ३० ते ३५ रुपये किलो, तर घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किलो विक्रीचा दर आहे. नवरात्रौत्सव, ईद व टिपरी पौर्णिमा या काळात रताळ्यांना मोठी मागणी असते. पाच वर्षांपूर्वी येथील रताळी स्थानिक व्यापारी, दलाल यांच्यामार्फत निर्यात होत होती. मात्र, अलीकडे शेतकरी स्वत:च्या किंवा भाड्याच्या वाहनातून थेट पुणे, मुंबई, वाशी किंवा गुजरात, कोकण, आदी बाजारपेठेत रताळी विक्रीस नेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा पैसे मिळत आहेत.