शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

मलकापूरची रताळी गुजरातला -नवरात्रौत्सवामुळे मागणी :

By admin | Updated: September 25, 2014 23:26 IST

वाशी, मुंबई, पुणे बाजारपेठेत क्विंटलला तीन हजारपर्यंत दर

मलकापूर : मलकापूर परिसरातील रताळी नवरात्रौत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर थेट कोल्हापूरसह, नवी मुंबई (वाशी), मुंबई व पुण्याच्या बाजारपेठेसह गुजरातमध्येही पोहोचली आहेत. रताळीला क्विंटलला दोन ते तीन हजारांपर्यंत दर मिळत आहे, तर घाऊक बाजारातही सुमारे २५ ते ३० रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकरीही खुशीत आहे. शाहूवाडी तालुक्यात प्रामुख्याने भात व ऊस शेती केली जाते. दहा वर्षांपासून रताळी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. चालू वर्षी एक महिना पाऊस उशिराने दाखल झाला. त्यामुळे रताळी उत्पादनात मोठी घट जाणवू लागली आहे. मात्र, मुंबई, पुणे, वाशी येथे क्विंटलला सरासरी दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील पेरीड, कडवे, निनाई परळे, आळतूर, निळे, करुंगळे, भोसलेवाडी, शाहूवाडी, चनवाड, वाळूर, कासार्डे या परिसरातील शेतकरी रताळी पीक घेताना दिसतात. नवरात्रौत्सवात रताळ्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. कोकणातील रत्नागिरी, खेड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली, पुणे कर्नाटक, वाशी, गुजरात, आदी बाजारपेठांत येथील लाल रंगाची गोड रताळी निर्यात होत असतात. खरीप हंगामातील भाताबरोबर रताळी वेलाची लागवड केली जाते. रेताड मिश्रित मातीत हे पीक चांगले येते. मात्र, यंदा पावसाने एक महिना ओढ दिल्याने रताळी पीक उत्पादनात घट झाली आहे. केवळ तीन महिन्यांचे पीक नवरात्रौत्सवात काढणीस येत असल्याने ऐनवेळी शेतकऱ्यांच्या हाती ताजा पैसा येतो. अलीकडे या नगदी पिकाकडे शेतकरी वळला आहे. मात्र, पारंपरिक पद्धतीने शेतकरी रताळ्याचे उत्पादन घेतो. शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना हे पीक उत्पादन आधुनिक पद्धतीने घेण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यावर प्रक्रिया करण्याचे उद्योग उभारले पाहिजेत. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना जादा पैसे स्थानिक बाजारपेठेत रताळीचा ३० ते ३५ रुपये किलो, तर घाऊक बाजारात २५ ते ३० रुपये किलो विक्रीचा दर आहे. नवरात्रौत्सव, ईद व टिपरी पौर्णिमा या काळात रताळ्यांना मोठी मागणी असते. पाच वर्षांपूर्वी येथील रताळी स्थानिक व्यापारी, दलाल यांच्यामार्फत निर्यात होत होती. मात्र, अलीकडे शेतकरी स्वत:च्या किंवा भाड्याच्या वाहनातून थेट पुणे, मुंबई, वाशी किंवा गुजरात, कोकण, आदी बाजारपेठेत रताळी विक्रीस नेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा पैसे मिळत आहेत.