शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘मलेरिया प्रतिरोध महिना’ बासनात

By admin | Updated: June 7, 2016 07:32 IST

महापालिका प्रशासन सुस्त : उपनगरांत हिवताप, मलेरियासह साथीच्या रोगांचा प्रार्दुभाव

अमर पाटील --कळंबा -पावसाळ्यात उद्भणाऱ्या हिवताप, मलेरिया, डेंग्यू, अतिसार, यांसह अन्य साथीच्या रोगांच्या जनजागृतीसाठी  १ जूनपासून राज्यभर ‘मलेरिया प्रतिरोध महिना’ साजरा केला जातो. विविध माध्यमांतून या साथीच्या जनजागृतीचा प्रसार, प्रसिद्धी केली जाते; परंतु उपनगरात साथीच्या रोगांनी थैमान घातले असतानाच पालिकेचा आरोग्य विभाग मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाच्या जनजागृतीपासून अलिप्त व सुस्त असल्याचे चित्र आहे.उपनगरातील कचरा उठावातील अनियमिततेने अस्ताव्यस्त कचरा, पसरलेले कोंडाळे, सांडपाण्याचा प्रश्न, औषध फवारणीतील अनियमितता, उपनगरांतील नाले सफाईकडे कित्येक वर्षे पालिका प्रशासनाने केलेली डोळेझाक, यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी परिसरात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच साथीच्या रोगांचा फैलाव होतो. हिवताप, डेंग्यूसह अन्य साथीच्या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात.गतवर्षी उपनगरांत हिवतापाच्या रुग्णांची संख्या जास्त होती. वर्षभर अतिसाराचे रुग्ण आढळत होते. साथीच्या रोगांबाबतच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना आखतानाच या साथींबाबात पालिका आरोग्य विभागाकडून तेवढीच जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.१ जूनपासून संपूर्ण राज्यभर हिवताप प्रतिरोध महिना साजरा होत असताना पालिकेच्या आरोग्य विभागातील हिवताप विभागच या मोहिमेपासून दूर असल्याचे चित्र आहे.विभागाकडून कोणतीच प्रसिद्धी प्रचार यंत्रणा राबवली नाही. अशा हालचालीही नाहीत. पावसाळा सुरू होऊन रोग पसरल्यावर या विभागाच्या हालचालींना वेग येणार का? की आरोग्य विभाग साथीच्या रोगांच्या प्रतीक्षेत आहे का, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. दक्षिणच्या उपनगरांची भौगोलिक रचना उंच-सखल असल्याने ४५ एकर उतारावरून कचरा मिश्रित पाणी कसेही वाहत नागरी वस्तीत शिरते. त्यामुळे तपोवन, रायगड कॉलनी, सुर्वेनगर, साळोखेनगर प्रभागातील नागरी वस्त्यांत पाणी तुंबते व साथीचे आजार थैमान घालतात.आज उपनगरातील बऱ्याच प्रभागांचा ना स्वतंत्र ले आऊट, ना ड्रेनेजलाईन विकसित, ना सांडपाणी निर्गतीकरणाच्या गटारी विकसित, त्यामुळे पावसाळ्यात सखल भागात पाणी तुंबून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा उठाव व औषध फवारणीतील अनियमिततेने भरीस भर पडल्याने उपनगरांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊन साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. किमान यावर्षी तरी नालेसफाई करून, औषध फवारणी व कचरा उठावात नियमितता ठेवून नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य सशक्त ठेवावे, ही मागणी जोर धरत आहे.