शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

कोल्हापुरातील खासगी रुग्णालयांची अचानक तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा ग्रामीण भागातील रुग्ण आल्यानंतर बेड नसल्याचे सांगितले जाते. परंतु वस्तुस्थितीमध्ये बेड ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचा ग्रामीण भागातील रुग्ण आल्यानंतर बेड नसल्याचे सांगितले जाते. परंतु वस्तुस्थितीमध्ये बेड उपलब्ध असतात. रुग्णांची अडवणूक करणाऱ्या आणि आर्थिक त्रास देणाऱ्या या रुग्णालयांची अचानक तपासणी केली जावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या गुरुवारी झालेल्या आरोग्य समितीमध्ये करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सदस्यांच्या भावना लेखी कळविण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती हंबीरराव पाटील होते.

ऑनलाईन झालेल्या या बैठकीत समिती सदस्य सविता राजाराम भाटले, सुनीता रेडेकर, पुष्पा वसंत आळतेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मोरे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी उप‍स्थित होते.

यावेळी सभापती पाटील म्हणाले, कमी तीव्रतेची लक्षणे असलेल्या रुग्णाला कोविड काळजी केंद्रामध्ये दाखल करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये अशा केंद्राची उभारणी करा. लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरी अलगीकरण करण्यात यावे. या रुग्णांची रोज ऑक्सिजन तपासणी, थर्मल तपासणी करण्यात यावी. तसेच असे रुग्ण इतरत्र फिरणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

सुपर स्प्रेडरची रॅपीड अँटिजेन टेस्ट करण्यात यावी. सर्वेक्षणाचे काम प्रभावी करण्यात यावे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरची तपासणी करावी. रुग्ण बाधित आल्यानंतर सहवासित शोध गांभीर्याने करावा. प्रत्येक रुग्णामागे किमान २० सहवासीतांच्या कोविड चाचण्या कराव्यात.

चौकट -

प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन बेडचे केंद्र उभे करा

यावेळी सभापती पाटील यांनी तालुका पातळीवर केवळ ऑक्सिजन बेडचे कोविड काळजी केंद्र उभारण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सर्वसाधारण कोविड काळजी केंद्र आणि ऑक्सिजन बेड असलेले काळजी केंद्र स्वतंत्र करा. प्रत्येक तालुक्याला असे केंद्र उभारल्याने किमान त्यांना घरचे जेवण देता येईल आणि शहरावरील ताण कमी येईल, असे पाटील म्हणाले. जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या भागामध्ये जिल्हा परिषद आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने अशी केंद्रे उभारावीत, असे आवाहन त्यांनी केले.