शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

रस्त्यांचा ‘मेंटेनन्स’ महापालिकेच्या माथी

By admin | Updated: May 13, 2016 00:57 IST

रस्ते विकास प्रकल्प : शासनाने झटकले हात; ‘आयआरबी’सोबतचा करार रद्द करण्यास टाळाटाळ

विश्वास पाटील -- कोल्हापूर -कोल्हापुरात आयआरबी कंपनीने केलेल्या वादग्रस्त रस्ते प्रकल्पातील ४९ किलोमीटरच्या रस्त्याचा देखभाल-दुरुस्ती खर्च महापालिकेनेच करावा, असा प्रयत्न आता चक्क राज्य शासनाकडूनच सुरू आहे. रस्ते प्रकल्पाच्या करारानुसार ही जबाबदारी आयआरबी कंपनीची आहे. ते करणार नसतील तर विकासक म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाने ही जबाबदारी घ्यायला हवी परंतु या दोघांनाही त्यातून बाजूला काढून महापालिकेनेच हा खर्च करावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे टोलमधून सुटका झालेल्या शहरवासीयांची रस्त्यांची देखभाल नीट न झाल्यास नवी डोकेदुखी सुरू होणार आहे. टोल प्रकल्पाची किंमत म्हणून शासनाने ४५९ कोटी रुपये ‘आयआरबी’ कंपनीस देण्याचा निर्णय घेतल्यावर ४ फे ब्रुवारी २०१६ ला टोल रद्द करण्यात आल्याची अधिसूचना शासनाच्या नगरविकास विभागाने काढली. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्याची येथे पत्रकार परिषद घेऊन घोषणाही केली. त्यानंतर कोल्हापूरकरांनी टोल रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही केला. त्यानंतर गेल्या चार दिवसांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘रस्ते आहेत त्या स्थितीत ताब्यात घ्यावेत,’ असे पत्र महापालिकेस दिले. हे करत असताना राज्य सरकारने त्यामध्ये मुद्दाम एक त्रुटी ठेवली. टोल रद्द झाला व त्याचे पैसे सरकार देणार असूनही शासनाने आयआरबी सोबतचा करार रद्द केल्याचे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. कारण या करारातील ‘कलम ३९’ नुसार ज्यादिवशी करार रद्द होईल त्या दिवसापासून पुढील तीन वर्षे रस्त्यांचा देखभाल-दुरुस्ती खर्च आयआरबी कंपनीने करावा, असा स्पष्ट उल्लेख आहे. करार रद्द केल्याचे जाहीर केल्यास करारातील तरतुदीनुसार कंपनीस पुढील तीन वर्षे देखभाल करावी लागेल अथवा देखभालीचा खर्च त्यांच्या रकमेतून वजा करावा लागेल. हा मूळ करार आयआरबी व राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामध्ये झाला आहे. महापालिका फक्त ‘कन्फर्मिंग पार्टी’ आहे. त्यामुळे कंपनी देखभाल-दुरुस्ती करणार नसेल तर विकासक म्हणून राज्य रस्ते विकास महामंडळाची ही जबाबदारी आहे. करारानुसार कंपनीस दिलेला टेंबलाईवाडी येथील तीन लाख चौरस फुटांचा भूखंड महामंडळाने आपल्याकडे ठेवून घेतला आहे; परंतु रस्त्यांच्या देखभालीबद्दल मात्र महामंडळ अंग झटकून टाकत असल्याचे दिसते आहे व त्यास राज्य शासन पाठीशी घालत आहे. ‘तुमचे टोलचे पैसे भागवले, आता देखभालीचे तुमचे तुम्ही बघा,’ असेच सरकारचे म्हणणे आहे म्हणूनच करार रद्द झाल्याशिवाय तसेच सचिव पातळीवर अपूर्ण कामांविषयी निर्णय झाल्याशिवाय ‘आयआरबी’ने केलेले रस्ते ताब्यात घेण्यास महानगरपालिकेने स्पष्ट नकार दिला आहे. यासंदर्भात सचिव पातळीवर बैठक व्हावी, असे महापालिका प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे टोल रद्द झाला तरी त्यानंतरची दुखणी कायम आहेत.