शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

युतीच्या प्रतिसादानंतरच ‘महायुती’

By admin | Updated: July 26, 2014 00:17 IST

विधानसभेची रणनीती : राजू शेट्टी यांची भूमिका

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती आकारास आली, कारण त्यावेळी जागा मर्यादित होत्या. परंतु विधानसभा निवडणुकीत २८८ जागा असल्याने शिवसेना-भाजपचा प्रतिसाद कसा मिळतो, यावरच महायुती आकारास येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.शेट्टी यांनी सांगितले, ‘महायुतीबाबत यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन-तीनवेळा बोलणे झाले आहे. आज मुंबईत शिवसेना व भाजपची बैठक झाली. युतीचा गेल्या पंधरा वर्षांतील जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलावा, अशी मुख्यत: भाजपची मागणी आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने वाढीव जागा हव्या आहेत. त्यामुळे कुणी किती जागा लढवायच्या हे या दोन पक्षांत ठरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यांच्या जागा निश्चित झाल्यावर या दोन पक्षांनी स्वाभिमानी, रासप व आठवले गटाला किती जागा सोडायच्या याचा निर्णय होईल. या दोन पक्षांची त्यासंदर्भात आज प्राथमिक चर्चा झाली आहे. परंतु त्याचा तपशील समजलेला नाही. त्यांच्याकडून काय प्रस्ताव येतो हे समजल्यावरच आमची रणनीती ठरवू. आम्ही पक्ष म्हणून विधानसभेसाठी किती जागा हव्यात, याची मागणी अद्याप या पक्षांकडे केलेली नाही. परंतु आम्ही स्वबळावर लढायचेच झाल्यास किती जागांवर लढू शकू याची चाचपणी करून ठेवली आहे. त्यानुसार राज्यांतील किमान ६५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासंदर्भातील चाचपणी म्हणूनच उद्या, शनिवारी कोल्हापुरात व रविवारी (दि.२७) गारगोटी (ता. भुदरगड) येथे ‘स्वाभिमानी’चा मेळावा होत आहे. (प्रतिनिधी)