शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

युतीच्या प्रतिसादानंतरच ‘महायुती’

By admin | Updated: July 26, 2014 00:17 IST

विधानसभेची रणनीती : राजू शेट्टी यांची भूमिका

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती आकारास आली, कारण त्यावेळी जागा मर्यादित होत्या. परंतु विधानसभा निवडणुकीत २८८ जागा असल्याने शिवसेना-भाजपचा प्रतिसाद कसा मिळतो, यावरच महायुती आकारास येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.शेट्टी यांनी सांगितले, ‘महायुतीबाबत यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन-तीनवेळा बोलणे झाले आहे. आज मुंबईत शिवसेना व भाजपची बैठक झाली. युतीचा गेल्या पंधरा वर्षांतील जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलावा, अशी मुख्यत: भाजपची मागणी आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने वाढीव जागा हव्या आहेत. त्यामुळे कुणी किती जागा लढवायच्या हे या दोन पक्षांत ठरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यांच्या जागा निश्चित झाल्यावर या दोन पक्षांनी स्वाभिमानी, रासप व आठवले गटाला किती जागा सोडायच्या याचा निर्णय होईल. या दोन पक्षांची त्यासंदर्भात आज प्राथमिक चर्चा झाली आहे. परंतु त्याचा तपशील समजलेला नाही. त्यांच्याकडून काय प्रस्ताव येतो हे समजल्यावरच आमची रणनीती ठरवू. आम्ही पक्ष म्हणून विधानसभेसाठी किती जागा हव्यात, याची मागणी अद्याप या पक्षांकडे केलेली नाही. परंतु आम्ही स्वबळावर लढायचेच झाल्यास किती जागांवर लढू शकू याची चाचपणी करून ठेवली आहे. त्यानुसार राज्यांतील किमान ६५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासंदर्भातील चाचपणी म्हणूनच उद्या, शनिवारी कोल्हापुरात व रविवारी (दि.२७) गारगोटी (ता. भुदरगड) येथे ‘स्वाभिमानी’चा मेळावा होत आहे. (प्रतिनिधी)