शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

युतीच्या प्रतिसादानंतरच ‘महायुती’

By admin | Updated: July 26, 2014 00:17 IST

विधानसभेची रणनीती : राजू शेट्टी यांची भूमिका

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती आकारास आली, कारण त्यावेळी जागा मर्यादित होत्या. परंतु विधानसभा निवडणुकीत २८८ जागा असल्याने शिवसेना-भाजपचा प्रतिसाद कसा मिळतो, यावरच महायुती आकारास येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते.शेट्टी यांनी सांगितले, ‘महायुतीबाबत यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन-तीनवेळा बोलणे झाले आहे. आज मुंबईत शिवसेना व भाजपची बैठक झाली. युतीचा गेल्या पंधरा वर्षांतील जागा वाटपाचा फॉर्म्युला बदलावा, अशी मुख्यत: भाजपची मागणी आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने वाढीव जागा हव्या आहेत. त्यामुळे कुणी किती जागा लढवायच्या हे या दोन पक्षांत ठरल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यांच्या जागा निश्चित झाल्यावर या दोन पक्षांनी स्वाभिमानी, रासप व आठवले गटाला किती जागा सोडायच्या याचा निर्णय होईल. या दोन पक्षांची त्यासंदर्भात आज प्राथमिक चर्चा झाली आहे. परंतु त्याचा तपशील समजलेला नाही. त्यांच्याकडून काय प्रस्ताव येतो हे समजल्यावरच आमची रणनीती ठरवू. आम्ही पक्ष म्हणून विधानसभेसाठी किती जागा हव्यात, याची मागणी अद्याप या पक्षांकडे केलेली नाही. परंतु आम्ही स्वबळावर लढायचेच झाल्यास किती जागांवर लढू शकू याची चाचपणी करून ठेवली आहे. त्यानुसार राज्यांतील किमान ६५ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पाच जागांवर लढण्याची तयारी आहे. त्यासंदर्भातील चाचपणी म्हणूनच उद्या, शनिवारी कोल्हापुरात व रविवारी (दि.२७) गारगोटी (ता. भुदरगड) येथे ‘स्वाभिमानी’चा मेळावा होत आहे. (प्रतिनिधी)