शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाची कर्जप्रकरणे ठप्प निधीच झाला बंद : बेरोजगार तरुणांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:23 IST

शित्तूर-वारुण : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची थेट कर्ज योजना गेली दीड वर्षे केंद्र सरकारने निधीची तरतूदच न केल्याने ...

शित्तूर-वारुण : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची थेट कर्ज योजना गेली दीड वर्षे केंद्र सरकारने निधीची तरतूदच न केल्याने ठप्प आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील तरुणांना व्यावसायिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी या कर्ज योजनांची चांगली मदत होत होती.

मागासवर्गीय समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाकडून मिळणाऱ्या कर्ज निधीतून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात १ लाखापासून ते ५ लाखांपर्यंत थेट व्यवसाय कर्ज योजना २०१९ मध्ये राबविण्यात आली. ११ ते ३० मार्च २०१९ या कालावधीत या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून महामंडळाने अर्ज स्वीकारले. या योजनेसाठी वैधानिक कागदपत्रे पूर्ण झालेल्या पात्र लाभार्थ्यांना डिसेंबर २०१९ दरम्यान मंजुरी पत्रेही दिली. मार्च-एप्रिलमध्ये देशभरात कोरोनाने थैमान घातले अन् या विभागाचा निधी आरोग्यासाठी वर्ग करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या योजनेतून ४ व ५ लाख रुपये मंजूर झालेल्या पात्र लाभार्थ्यांना एक वर्ष उलटून गेले तरी अद्याप व्यवसाय उभारण्यासाठी एक रुपयाचाही कर्जपुरवठा झालेला नाही. व्यवसाय इच्छुक मागासवर्गीय समाजातील बेरोजगार तरुण गेल्या दीड वर्षापासून कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

चौकट-

कोल्हापूर जिल्ह्यात महामंडळाकडे या योजनेसाठी बेरोजगार तरुणांची ४ लाखांची ५२ तर ५ लाखांची १६६ अशी एकूण २१८ प्रकरणे निधीअभावी प्रलंबित आहेत. राज्यभरातील प्रकरणाचा विचार करता ही संख्या कितीतरी मोठी असू शकते.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. कोल्हापूरच्या वतीने यापूर्वीच या योजनेच्या निधीची मागणी व पाठपुरावा केला आहे. मात्र कोरोना कारणामुळे निधी उपलब्ध नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे. हा निधीच केंद्राकडून येत असल्यामुळे ठोस काही सांगता येत नाही.

एस. एम. पवार

जिल्हा व्यवस्थापक-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कोल्हापूर

व्यवसायासाठी महामंडळाकडून कर्ज मंजूर होऊन एक वर्ष उलटून गेले तरी निधीची उपलब्धता नसल्यामुळे व्यवसाय उभारता येत नाही. कर्ज पुरवठा कधीपर्यंत होईल. याबाबतीत संबंधित प्रशासनाकडून ठोस असे काही सांगितले जात नाही.

संदीप कांबळे

कर्जाच्या प्रतीक्षेत असलेले पात्र लाभार्थी