शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

महाडिक गटाला खिंडार

By admin | Updated: April 17, 2015 00:08 IST

राजकारणाला वेग : नाराज माणिक पाटील गटाची ‘सतेज’ यांना रसद

कोल्हापूर : कसबा बावड्यात राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महादेवराव महाडिक गटाला मोठा हादरा बसण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी नाकारल्याने नाराज माजी नगरसेविका माणिक पाटील व जयवंत पाटील गटाने सतेज पाटील यांच्या चमूत सामील होण्याची तयारी पूर्ण केली. त्याचे पडसाद ‘राजाराम’ व बावड्यात महापालिकेच्या निवडणुकीसह श्रीराम सोसायटीच्या निवडणुकीवर होणार आहे. सतेज पाटील यांच्याशी तात्त्विक मतभेद झाल्याने पाच वर्षांपूर्वी पाटील गटाने फारकत घेत बावड्यात सवतासुभा मांडला. पाटील गटाने सतेज पाटील यांच्या विरोधात महापालिका निवडणुकीत थेट आव्हान उभे केले. त्यातूनच प्रभाग क्रमांक-३ मधून माणिक पाटील याचा निसटता पराभव झाला. संघर्षास महाडिक यांचे पाठबळ मिळाले. २००९ च्या ‘दक्षिण’च्या निवडणुकीत पाटील दाम्पत्य प्रचारात आघाडीवर राहिले. हा संघर्ष तेवत ठेवण्यासाठी माणिक पाटील यांना ‘राजाराम’वर ‘स्वीकृत संचालक’ म्हणून घेतले होते.पण निवडणुकीत जयवंत पाटील यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी महाडिक यांनी निरोप दिला. त्यामुळे माणिक पाटील व गटाच्या कार्यकर्त्यांची भावाना दुखावल्या. दरम्यान, सतेज पाटील व जयवंत पाटील यांनी मागील सर्व विसरून एकत्र येण्यासाठी चर्चा केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर महाडिक गटाने मनधरणीचा प्रयत्न सुरू केला आहे. पाटील गट तटस्थ राहिला तरी फटका महाडिक यांना येत्या स्थानिक निवडणुकीत बावडा परिसरात बसणार आहे (प्रतिनिधी)भाकरी परतलीच नाही...‘पुतण्या खासदार झाला, मुलगा आमदार झाला. मात्र, बावड्यातील ‘राजाराम’च्या संचालकांनी साधी ‘चिमणी’ फटाकेही उडविण्याची किंवा लहान पोस्टर लावण्याचेही धाडस केले नाही’. ही सल महाडिक यांनी बावड्यातील अनेक इच्छुकांना बोलूनही दाखविली. त्यामुळे बावड्यात महाडिक ‘भाकरी’ परतणार, अशीच अटकळ होती तसे न घडता, महाडिकांनी पुन्हा जुन्या शिलेदारांनाच मैदानात उतरविले. यातच माणिक पाटील गट सतेज पाटील यांच्या गळाला लागल्यास बावड्यातून महाडिक गट हद्दपार झाल्यासारखेच होणार आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे माजी नगरसेविका माणिक पाटील व जयवंत पाटील यांनी स्पष्ट केले.