शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

भिंत बांधू म्हणणारे तर सोपी उत्तरे देणारे जादूगारच एन. डी. सरांचा किस्सा व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:25 IST

कोल्हापूर : महापूर आला म्हणून सध्या नदीकाठी भिंत बांधण्याचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मात्र, अशी सोपी उत्तर कोण शोधते ...

कोल्हापूर : महापूर आला म्हणून सध्या नदीकाठी भिंत बांधण्याचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. मात्र, अशी सोपी उत्तर कोण शोधते आणि अशा सोप्या उत्तराने खरंच जनतेचं भलं होत का, याबद्दलचा ज्येष्ठ पुरोगामी नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सांगितलेला एक किस्सा सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी गुरुवारी फेसबुकवर शेअर केला आहे.

ते म्हणतात, पूर येऊ नये म्हणून नदीकाठी मोठ्या भिंती बांधण्याच्या कल्पनेची सोशल मीडियात खिल्लीही उडवली जात आहे. कोणत्याही कठीण प्रश्नावर सोपी उत्तरे शोधण्याकडे अनेकांचा कल असतो व फार विचार न करणाऱ्या समूहवर्गाला ती उत्तरे खूप भावतात. त्यावर राजकारणही उभे राहते. प्रा. पाटील यांना एकदा भेटल्यावर त्यांनी गंमत म्हणून ही गोष्ट सांगितली. एक माणूस पोलीस आयुक्तांकडे गेला व संरक्षणाची मागणी केली. मी केलेले संशोधन प्रत्यक्षात येऊ नये, म्हणून रेल्वे कंपन्या माझा खून करण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्तांनी विचारले की संशोधन कोणते आहे? तो सांगायला तयारच होईना. शेवटी सर्वांना बाहेर काढल्यावर तो आयुक्तांना म्हणाला, ‘मी अशी रेल्वे शोधली आहे की, ज्या रेल्वेला कोळसा किंवा वीज लागत नाही. ती आपोआप चालते’. ते ऐकून पोलीस आयुक्तही थक्क झाले ‘म्हणजे कशी?’

तो माणूस म्हणाला, ‘रेल्वे रुळावर उभी करायची. एक मोठा लोहचुंबक तिथून अर्ध्या किलोमीटरवर रुळावर ठेवायचा व रेल्वेसमोर मोठा लाकडाचा ठोकळा ठेवायचा. रेल्वे सुरू करायची असेल तेव्हा ठोकळा बाजूला काढला की लोहचुंबक रेल्वेला आपल्याकडे ओढून घेईल.’ पोलीस आयुक्त म्हणाले, ‘पण रेल्वे पुढे कशी जाईल?’ तो म्हणाला, ‘रेल्वे त्या लोहचुंबकाला इतक्या जोरात धडक मारेल की पुन्हा लोहचुंबक पुढील अर्धा किलोमीटरवर ढकलले जाईल व परत रेल्वेला आपल्याकडे खेचून घेईल व रेल्वे परत धडक मारून पुढे जाईल. त्यामुळे रेल्वेला कोळसा किंवा विजेची अजिबात गरजच उरणार नाही.’