शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

म. गांधींचे राजकीय गुरू, शिष्य महाराष्ट्रातीलच

By admin | Updated: October 9, 2015 00:41 IST

सदानंद मोरे : शिवाजी विद्यापीठात ‘विमर्श व संवाद’ या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : महात्मा गांधीजींना नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या रूपाने महाराष्ट्राने ‘राजकीय गुरुत्व’ आणि आचार्य विनोबा भावे यांच्या रूपाने सर्वांत मोठा पहिला शिष्यही प्रदान केला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी येथे गुरुवारी केले.शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र, इतिहास अधिविभाग व गांधी अभ्यास केंद्रातर्फे ‘विमर्श व संवाद’ या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ यावर बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आर. बी. पाटील, तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. ज. रा. दाभोळे प्रमुख उपस्थित होते.यावेळी‘विमर्श व संवाद’ या एन. ए. निकम लिखित व डॉ. ज. रा. दाभोळे अनुवादित पुस्तकाचे डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.डॉ. मोरे म्हणाले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांची राजकारणाच्या अध्यात्मीकरणाची संकल्पना गांधीजींना भावली. त्या आधारे अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील चळवळ यशस्वी केली. या पार्श्वभूमीवर गोखले- लोकमान्य टिळक यांच्यातील दरी कमी करण्याचे त्यांनी प्रयत्न केले. गांधीजींना भारत समाजसेवक संघटनेचे सदस्यत्व देण्याचे गोखले यांनी ठरविले होते; पण प्रस्थापित सदस्यांमुळे ते होऊ शकले नाही; अन्यथा गांधीजी पुण्यातच राहिले असते आणि गोखले यांच्या माघारी नेमस्तांचे नेतृत्व त्यांच्याकडे आले असते. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा ‘लोकमान्य ते महात्मा’ या संक्रमणात दडलेला आहे. गांधीजींबद्दल समाजमाणसांत पसरलेले विविध प्रवाद-अपप्रवाद पाहता हे संक्रमण अद्यापही पूर्ण झाले नाही. ‘विमर्श व संवाद’ हे पुस्तक म्हणजे तत्त्वज्ञानाचे पूर्वसुरी तत्त्वज्ञानाबद्दल नेमका कोणता विचार करीत असत, यासंदर्भातील महत्त्वाचा दस्तावेज आहे. डॉ. दाभोळे म्हणाले, तत्त्वज्ञान अभ्यासकांच्यादृष्टीने हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. यावेळी डॉ. वासंती रासम, प्रकाश पवार, भगवान माने, आदी उपस्थित होते. डॉ. भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले. मराठ्यांच्या अपेक्षांना छेद...ब्रिटिशांनी भारत जिंकला म्हणजे दिल्लीचे तख्त ताब्यात घेतले. तथापि, ब्रिटिशांनी प्रत्यक्षात ज्यांच्याशी लढाया करून भारत जिंकला, ते मराठे होते. त्यामुळे राजकारणाची समज, लढवय्येपणा, धडाडी या बळावर स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राच्या नेतृत्वाने वर्चस्व राखले. त्यामुळे महात्मा गांधी यांचा राजकीय पटावरील उदय हा मराठ्यांच्या अपेक्षांना छेद देणारा ठरला, असे निरीक्षण डॉ. मोरे यांनी यावेळी नोंदविले.