शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी ‘एफआरपी’ अशक्य

By admin | Updated: December 1, 2015 00:45 IST

शेतकऱ्यांची कोंडी : आश्वासन दिल्यानुसार अद्याप बैठकच न झाल्याने कारखान्यांपुढे पेच

कोल्हापूर : राज्यातील साखर उद्योगासमोर एकरकमी ‘एफआरपी’ वरून पेच निर्माण झाला असताना सरकारच्या पातळीवर काहीच हालचाली दिसत नाहीत. ‘एफआरपी’चा पेच सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते, पण अद्याप बैठक झाली नसल्याने कोंडी वाढत चालली आहे. बाजारातील साखरेचे दर, बँकांची उचल पाहता सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणे कारखानदारांना अशक्य आहे, हे मात्र निश्चित आहे. ‘एफआरपी’ ठरविताना साखरेचा दर ३२०० रुपये गृहित धरली. सध्या साखरेचा दर बाजारात २४२० ते २५०० रुपये प्रतिक्ंिवटल आहे. त्यामुळेच हा पेच निर्माण झाला आहे. साखर मूल्यांकनाच्या राज्य बँक ८५ टक्क्यांप्रमाणे उचल देते. सध्याचे साखर मूल्यांकन २२७० रुपये आहे. त्यातील ८५ टक्के म्हणजे १९३० रुपयेच पोत्यामागे कारखान्यांना मिळणार आहेत. त्यातील प्रक्रिया व पूर्वहंगाम कर्जाचे हप्ते वजा जाता ११८० रुपयेच हातात राहणार आहेत. त्यामध्ये उताऱ्याप्रमाणे वाढ होणार असली तरी एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर उतारा पाहता १६०० ते १७०० रुपये पहिली उचल देणे शक्य आहे.एकरकमी एफआरपी द्यायची म्हटले तर उर्वरित ७०० ते ८०० रुपये सरकारच्या मदतीशिवाय देणे सध्या तरी शक्य नसल्याचे चित्र आहे. केंद्राने साखर निर्यातीची सक्ती केली आहे. साखर निर्यात झाल्यानंतर बाजारातील साखरेचे दर वाढल्यास कारखान्यांच्या हातात चांगले पैसे येतील. त्यानंतर उर्वरित रक्कम देता येऊ शकते. हातात पैसे नसल्याने कारखानदार अडचणीत असले तरी शेतकरी त्यापेक्षा अधिक संकटात आहेत. केंद्र सरकारने खतांसह सर्व बाबींवरील अनुदान हळू-हळू कमी केल्याने उत्पादनखर्च डोक्याच्या वर गेला आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी हातात मिळाली तरच त्यांचे संसाराचे गणित जमणार आहे. कारखानदार व शेतकरी दोन्ही पेचात असताना सरकारने बघ्याची भूमिका घेण्याऐवजी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही पडलेला नाही. त्यामुळे ‘एफआरपी’चा गुंता वाढत असताना सरकार मात्र गप्प दिसत आहे. निम्मे उपाशीच...!गतवर्षी कारखान्यांनी ओढून-ताणून एकरकमी एफआरपी दिली. हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत गाळप झालेल्या शेतकऱ्यांनाच पैसे मिळाले पण त्यानंतर ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांना सहा महिने पैशांविना उपाशी राहावे लागले होते. यावर्षी तसे न करता सर्वच शेतकऱ्यांना पैसे देण्याची मानसिकता कारखानदारांची दिसते.