शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

नळांना तोट्या लावा; अन्यथा निधी नाही

By admin | Updated: September 18, 2015 00:02 IST

पाण्याचा अपव्यय टळणार : जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापनाचा निर्णय

आयुब मुल्ला --खोची  --पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने नळास तोटी बसविणे बंधनकारक केले आहे. ज्या गावातील नळांना तोटी नसेल व पाणी वाया जात असेल, अशा गावांना शासनाचा कोणताही निधी मिळणार नाही. यासंबंधीची कठोर भूमिका जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीने घेतली आहे. जिल्ह्यात यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्ययही टळेल आणि लाखो लिटर पाण्याची बचतही होणार आहे. गावपातळीवर प्रत्येक कुटुंबाला आता पाण्याचा काटकसरीनेच वापर करावा लागणार आहे.पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. पाणी म्हणजे जीवन आहे. ही वाक्ये व्याख्यान व लिखाणापुरतीच मर्यादित झाली आहेत. बहुतांश ठिकाणी नळांना तोटीच (चावी) नसल्याचे निदर्शनास येते. पाणी शिळे झाले आहे, असे म्हणण्यापासून हातपाय धुतल्यानंतर नळ तसाच सुरू ठेवण्याचा प्रकार गावागावांत पाहावयास मिळतो. वाहत्या नळाखालीच कपडे, भांडी धुतले जातात. असे असंख्य प्रकार पाणी वाया जाण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे या योजनेची वीजबिले, देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढलेला आहे. अनेक ग्रामपंचायतींची वीजबिले थकीत आहेत. कोट्यवधी रुपये थकल्याने महावितरण कनेक्शन तोडण्यास पुढे सरसावले आहे. योजनेला गळतीही असते. त्यामुळे पाणी वाया जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचे व्यवस्थापन करणे अवघड बनले आहे. या सर्व हानिकारक व नुकसानीच्या बाबींचा अभ्यास करून प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळण्यासाठी नळांना तोटी (चावी) बसवावीच लागेल, यासाठी असा ठराव केला आहे. ज्या गावात या ठरावाची अंमलबजावणी होणार नाही, त्या गावांना शासनाकडून कोणत्याही निधीचा लाभ मिळणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेण्याचे सूचित केले आहे.अंमलबजावणीस लवकरच सुरुवातजिल्ह्यात १०२९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमार्फत गावाला पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. प्रती माणसी ४० लिटर पाण्याची गरज निश्चित केली आहे. एका कुटुंबात पाच व्यक्ती असतील, तर २०० लिटर पाणी त्यांना पुरेसे आहे, असे अभ्यासाद्वारे पुढे आले आहे. परंतु, यापेक्षाही कितीतरी जादा पाणी वापरले जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. त्यामुळे संबंधित समितीने नळांना तोटी बसविण्याचा ठराव केला आहे. त्याच्या अंमलबजावणीस लवकरच सुरुवात होणार आहे.