शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

स्मार्ट व्हायचं की... दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 01:18 IST

परवा गावी गेलो होतो. सीमाभागातील महाराष्टÑ-कर्नाटक सीमेवरील गाव. लोकूर त्याच नाव. गावची यात्रा असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रम, शर्यतींची रेलचेल होती. तरुणाई उत्स्फूर्तपणे सर्वत्र

- चंद्रकांत कित्तुरे

परवा गावी गेलो होतो. सीमाभागातील महाराष्टÑ-कर्नाटक सीमेवरील गाव. लोकूर त्याच नाव. गावची यात्रा असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रम, शर्यतींची रेलचेल होती. तरुणाई उत्स्फूर्तपणे सर्वत्र पुढाकार घेताना दिसत होती. एखाद्याला बोलावणे, काहीतरी आणायला सांगणे, एखादा निरोप देणे, छायाचित्रण करणे, चित्रीकरण म्हणजेच व्हिडीओ शूटिंग करणे अशी बरीच कामे मोबाईलद्वारे केली जात होती. त्यातून मोबाईल विशेषत: स्मार्टफोनच महत्त्व अधोरेखीत होत होते. खरंचं आज मोबाईल ही जीवनावश्यक बाब बनली आहे.

‘अन्न’, ‘वस्त्र’, ‘निवारा’ या मूलभूत गरजांमध्ये आता ‘मोबाईल’चाही समावेश करावा लागेल अशी स्थिती आहे. कारण प्रत्येकाचं पान मोबाईलशिवाय हालत नाही हे जरी खरं असलं तरी या मोबाईलचा वापर कोणत्या गोष्टींसाठी करायचा, कोणत्या नाही हे समजून घेण्याची, सांगण्याची गरज आहे. गावातीलच बहिणीने आपल्या मुलाबद्दल तक्रार केली की मोबाईल हातातून खाली ठेवतच नाही. त्याला जरा सांग असंही ती म्हणाली. त्याला काय सांगायचं, या विचारात असतानाच त्याच्या आजोबांनी एक घटना सांगितली. शेजारच्या एका गावातील माध्यमिक शाळेत पालकसभा होती. शाळेतील मुला-मुलींसोबत त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा सुरू झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी पालकांमधील कुणाला काही बोलायचे असेल तर बोलावे, असे आवाहन केले.

यावेळी एक पालक उठून उभे राहिले अन् सांगू लागले ‘माझी अमूक-अमूक मुलगी. तिला स्मार्ट फोन घेऊन दिलाय. हट्ट करून तिने तो द्यायला लावला. तो दिल्यापासून सतत तिच्या हातात तो मोबाईल अन् डोळे त्या मोबाईलमध्ये खुपसलेले असत्यात. ती त्यावर काय बघते, काय-काय करते आमाला काय बी कळत नाही. आईने एखादे काम सांगितले तरी चिडचिड करते, आम्ही किती सांगितले तरी ऐकत नाही. आम्ही आता काय करायच तुम्हीच सांगा.’ आपल्या वडिलांनी भरसभेत आपले नाव घेऊन लावलेले हे बोल ऐकून त्यांच्या मुलीला रडू कोसळले. ती रडताना पाहून तिच्या मैत्रिणीच्या डोळ्यांतही अश्रू आले. झाले पालक सभेचा नूरच पालटला. वातावरण गंभीर झाले.

आजोबांनी उठून त्या पालकांना थांबविले. सभा संपल्यानंतर ती मुलगी आणि तिच्या वडिलांशी या आजोबांनी संवाद साधून आपली पिढी आणि नवी पिढी तिच्या आवडी-निवडी याविषयी चर्चा करून नव्या पिढीला समजून घ्या, असे सांगताना त्या मुलीलाही चार गोष्टी सांगितल्या. जे तिथे घडले तेच इथेही चाललंय काय करायचं, असा आजोबांचा मला सवाल? मी तरी काय सांगणार. मोबाईल तर प्रत्येकाचा जीव की प्राण झालाय. फक्त त्यातल काय घ्यायच आणि काय नाही हे कळलं की झालं. टी. व्ही. आला त्यानंतरही असचं झालं होत. सर्वजण ‘इडियट बॉक्स’ म्हणून तो कसा वाईट आहे. त्यामुळे वेळ कसा आणि किती वाया जातो. लोक कामधाम सोडून टीव्हीच पाहात बसतात असे आक्षेप घेतले जात होते. काहीअंशी ते खरेही होते पण काळाप्रमाणे बदलते तंत्रज्ञानही अनुकरले जाते. अंगवळणी पडते आणि लोक दुष्परिणाम विसरूनही जातात.

आता टी.व्ही.ला ‘इडियट बॉक्स’ म्हणताना कोणी दिसत नाही. आज टी.व्ही. तर घराघरांत आहेच; पण त्याचा नवा अवतार मोबाईलही प्रत्येकाच्या घरातच नव्हे तर हातात आहे यात काय नाही. टी.व्ही.त फक्त चॅनेलच दिसायची. मोबाईलमध्ये चॅनेल काय, व्हिडिओ काय, गाणी काय, नाटक काय सर्व काही दिसते शिवाय तो संगणकाचेही काम करतो. संदेशाच्या देवाण-घेवाण तर एकदम सोपी. तुम्ही कुठेही असा तुमच्याशी कुणीही थेट बोलू शकतो, तुम्हाला बघू शकतो. तुमच्याशी संवाद साधू शकतो. त्याचवेळी याचे दुष्परिणामही लक्षात घ्यायला हवेत. कारण मोबाईलमुळे माणसा-माणसांतील संवाद हरवत चालल्याचे चित्र आहे. कारण कुठेही जा भेटल्यानंतर काहीवेळांतच मोबाईल उघडून बघत बसतो नाहीतर सारखे त्यात डोकावत राहतो. काल-परवाचीच बातमी मोबाईलमुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे सांगणारी होती. महिलांच्यादृष्टीने तर मोबाईल म्हणजे सवत बनली आहे, असे काहीसे त्यात म्हटले होते.

एकमेकांचा मोबाईल पती-पत्नीला हाताळता येत असेल त्याची मुभा असेल तर अविश्वासाचे वातावरण निर्माण होणार नाही पण ती मुभा नसेल तर ती किंवा तो कुणाशी बोलतोय. त्यांच्यात काय चॅटिंग चालतंय याबाबत मनाचे मांडे खाणे किंवा मनोराज्ये रचणे याव्यतिरिक्त काही करता येत नाही. त्यातूनच गैरसमज निर्माण होतात. ते वेळीच दूर झाले तर ठीक अन्यथा अविश्वास वाढत जावून प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते. त्यामुळे स्मार्टफोन वापरायला हवाच पण त्याचा वापर करून स्वत: स्मार्ट व्हायचे की स्वत:ला बरबाद करून घ्यायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे आहे.

kollokmatpratisad@gmail.com