शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

गाळप हंगामासाठी लगबग सुरू

By admin | Updated: September 29, 2015 23:54 IST

खासगी कारखाने थंडावले : २९ कारखान्यांचे गाळप परवान्यांचे प्रस्ताव दाखल

कोल्हापूर : दुष्काळसदृश स्थिती, उसाचे जादा उत्पादन या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची आगामी हंगामासाठी लगबग वाढली आहे. आतापर्यंत २९ साखर कारखान्यांनी गाळप परवान्याचे प्रस्ताव विभागीय साखर सहसंचालकांकडे पाठविले आहेत. तीन खासगी कारखान्यांनी अद्याप प्रस्ताव दाखल केलेले नाहीत.पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आॅगस्टपासूनच उसाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. डिसेंबरनंतर कोल्हापूर विभागात भयावह परिस्थिती पाहावयास मिळणार आहे. ऊसपीक जगविणे कठीण होणार हे निश्चित आहे. यासाठी यंदाचा हंगाम लवकर सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांनी तयारी केली आहे. १५ आॅक्टोबरला कारखाने सुरू करण्याची तयारी काही कारखान्यांनी केली आहे. मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, डिसेंबरपूर्वी जास्तीत जास्त उसाची उचल करण्याचे नियोजन कारखान्यांनी करावे, अशी सूचनाही मंत्री समितीच्या बैठकीत केली आहे. आगामी हंगामाला मागील हंगामातील ‘एफआरपी’चा अडसर होता; पण केंद्राकडून बहुतांश कारखान्यांना सॉफ्ट लोन मिळाल्याने त्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. उर्वरित कारखान्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यात देय एफआरपीच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पैसे दिले असतील व उर्वरित पैशांची हमी कारखान्यांनी दिली तर त्या कारखान्याला गाळप परवाना द्यावा, अशी सूचना मंत्री समितीने केली आहे. त्यामुळे गाळप परवान्यासाठी एफआरपीचा अडसर शक्यतो येणार नाही. आतापर्यंत विभागातील २९ कारखान्यांचे गाळप परवान्यासाठीचे प्रस्ताव साखर सहसंचालकांकडे दाखल झाले आहेत. प्रस्तावांची छाननी करून ते साखर आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले जाणार आहेत. दुष्काळ, जानेवारीनंतरची पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर सर्वच साखर कारखान्यांनी हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांनी १५ आॅक्टोबरला हंगाम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. उर्वरित कारखाने आठवडाभर पुढे-मागे सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) तीन टप्प्यांतील 'एफआरपी'चा तिढासाखर कारखान्यांसमोरील अडचणी पाहता तीन टप्प्यांत 'एफआरपी' देण्याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत चर्चा झाली; पण याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. कायद्याने एकरकमीच 'एफआरपी' मिळाली पाहिजे, अन्यथा उसाचे दांडके हातात घेऊ, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिल्याने तीन टप्प्यांतील ‘एफआरपी’चा तिढा निर्माण होऊ शकतो.