शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

गाळप हंगामासाठी लगबग सुरू

By admin | Updated: September 29, 2015 23:54 IST

खासगी कारखाने थंडावले : २९ कारखान्यांचे गाळप परवान्यांचे प्रस्ताव दाखल

कोल्हापूर : दुष्काळसदृश स्थिती, उसाचे जादा उत्पादन या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची आगामी हंगामासाठी लगबग वाढली आहे. आतापर्यंत २९ साखर कारखान्यांनी गाळप परवान्याचे प्रस्ताव विभागीय साखर सहसंचालकांकडे पाठविले आहेत. तीन खासगी कारखान्यांनी अद्याप प्रस्ताव दाखल केलेले नाहीत.पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आॅगस्टपासूनच उसाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. डिसेंबरनंतर कोल्हापूर विभागात भयावह परिस्थिती पाहावयास मिळणार आहे. ऊसपीक जगविणे कठीण होणार हे निश्चित आहे. यासाठी यंदाचा हंगाम लवकर सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांनी तयारी केली आहे. १५ आॅक्टोबरला कारखाने सुरू करण्याची तयारी काही कारखान्यांनी केली आहे. मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, डिसेंबरपूर्वी जास्तीत जास्त उसाची उचल करण्याचे नियोजन कारखान्यांनी करावे, अशी सूचनाही मंत्री समितीच्या बैठकीत केली आहे. आगामी हंगामाला मागील हंगामातील ‘एफआरपी’चा अडसर होता; पण केंद्राकडून बहुतांश कारखान्यांना सॉफ्ट लोन मिळाल्याने त्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. उर्वरित कारखान्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यात देय एफआरपीच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पैसे दिले असतील व उर्वरित पैशांची हमी कारखान्यांनी दिली तर त्या कारखान्याला गाळप परवाना द्यावा, अशी सूचना मंत्री समितीने केली आहे. त्यामुळे गाळप परवान्यासाठी एफआरपीचा अडसर शक्यतो येणार नाही. आतापर्यंत विभागातील २९ कारखान्यांचे गाळप परवान्यासाठीचे प्रस्ताव साखर सहसंचालकांकडे दाखल झाले आहेत. प्रस्तावांची छाननी करून ते साखर आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले जाणार आहेत. दुष्काळ, जानेवारीनंतरची पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर सर्वच साखर कारखान्यांनी हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांनी १५ आॅक्टोबरला हंगाम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. उर्वरित कारखाने आठवडाभर पुढे-मागे सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) तीन टप्प्यांतील 'एफआरपी'चा तिढासाखर कारखान्यांसमोरील अडचणी पाहता तीन टप्प्यांत 'एफआरपी' देण्याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत चर्चा झाली; पण याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. कायद्याने एकरकमीच 'एफआरपी' मिळाली पाहिजे, अन्यथा उसाचे दांडके हातात घेऊ, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिल्याने तीन टप्प्यांतील ‘एफआरपी’चा तिढा निर्माण होऊ शकतो.