शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

गाळप हंगामासाठी लगबग सुरू

By admin | Updated: September 29, 2015 23:54 IST

खासगी कारखाने थंडावले : २९ कारखान्यांचे गाळप परवान्यांचे प्रस्ताव दाखल

कोल्हापूर : दुष्काळसदृश स्थिती, उसाचे जादा उत्पादन या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची आगामी हंगामासाठी लगबग वाढली आहे. आतापर्यंत २९ साखर कारखान्यांनी गाळप परवान्याचे प्रस्ताव विभागीय साखर सहसंचालकांकडे पाठविले आहेत. तीन खासगी कारखान्यांनी अद्याप प्रस्ताव दाखल केलेले नाहीत.पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आॅगस्टपासूनच उसाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. डिसेंबरनंतर कोल्हापूर विभागात भयावह परिस्थिती पाहावयास मिळणार आहे. ऊसपीक जगविणे कठीण होणार हे निश्चित आहे. यासाठी यंदाचा हंगाम लवकर सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांनी तयारी केली आहे. १५ आॅक्टोबरला कारखाने सुरू करण्याची तयारी काही कारखान्यांनी केली आहे. मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, डिसेंबरपूर्वी जास्तीत जास्त उसाची उचल करण्याचे नियोजन कारखान्यांनी करावे, अशी सूचनाही मंत्री समितीच्या बैठकीत केली आहे. आगामी हंगामाला मागील हंगामातील ‘एफआरपी’चा अडसर होता; पण केंद्राकडून बहुतांश कारखान्यांना सॉफ्ट लोन मिळाल्याने त्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. उर्वरित कारखान्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यात देय एफआरपीच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पैसे दिले असतील व उर्वरित पैशांची हमी कारखान्यांनी दिली तर त्या कारखान्याला गाळप परवाना द्यावा, अशी सूचना मंत्री समितीने केली आहे. त्यामुळे गाळप परवान्यासाठी एफआरपीचा अडसर शक्यतो येणार नाही. आतापर्यंत विभागातील २९ कारखान्यांचे गाळप परवान्यासाठीचे प्रस्ताव साखर सहसंचालकांकडे दाखल झाले आहेत. प्रस्तावांची छाननी करून ते साखर आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले जाणार आहेत. दुष्काळ, जानेवारीनंतरची पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर सर्वच साखर कारखान्यांनी हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांनी १५ आॅक्टोबरला हंगाम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. उर्वरित कारखाने आठवडाभर पुढे-मागे सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) तीन टप्प्यांतील 'एफआरपी'चा तिढासाखर कारखान्यांसमोरील अडचणी पाहता तीन टप्प्यांत 'एफआरपी' देण्याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत चर्चा झाली; पण याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. कायद्याने एकरकमीच 'एफआरपी' मिळाली पाहिजे, अन्यथा उसाचे दांडके हातात घेऊ, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिल्याने तीन टप्प्यांतील ‘एफआरपी’चा तिढा निर्माण होऊ शकतो.