शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गाळप हंगामासाठी लगबग सुरू

By admin | Updated: September 29, 2015 23:54 IST

खासगी कारखाने थंडावले : २९ कारखान्यांचे गाळप परवान्यांचे प्रस्ताव दाखल

कोल्हापूर : दुष्काळसदृश स्थिती, उसाचे जादा उत्पादन या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांची आगामी हंगामासाठी लगबग वाढली आहे. आतापर्यंत २९ साखर कारखान्यांनी गाळप परवान्याचे प्रस्ताव विभागीय साखर सहसंचालकांकडे पाठविले आहेत. तीन खासगी कारखान्यांनी अद्याप प्रस्ताव दाखल केलेले नाहीत.पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आॅगस्टपासूनच उसाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. डिसेंबरनंतर कोल्हापूर विभागात भयावह परिस्थिती पाहावयास मिळणार आहे. ऊसपीक जगविणे कठीण होणार हे निश्चित आहे. यासाठी यंदाचा हंगाम लवकर सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांनी तयारी केली आहे. १५ आॅक्टोबरला कारखाने सुरू करण्याची तयारी काही कारखान्यांनी केली आहे. मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून, डिसेंबरपूर्वी जास्तीत जास्त उसाची उचल करण्याचे नियोजन कारखान्यांनी करावे, अशी सूचनाही मंत्री समितीच्या बैठकीत केली आहे. आगामी हंगामाला मागील हंगामातील ‘एफआरपी’चा अडसर होता; पण केंद्राकडून बहुतांश कारखान्यांना सॉफ्ट लोन मिळाल्याने त्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. उर्वरित कारखान्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यात देय एफआरपीच्या ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पैसे दिले असतील व उर्वरित पैशांची हमी कारखान्यांनी दिली तर त्या कारखान्याला गाळप परवाना द्यावा, अशी सूचना मंत्री समितीने केली आहे. त्यामुळे गाळप परवान्यासाठी एफआरपीचा अडसर शक्यतो येणार नाही. आतापर्यंत विभागातील २९ कारखान्यांचे गाळप परवान्यासाठीचे प्रस्ताव साखर सहसंचालकांकडे दाखल झाले आहेत. प्रस्तावांची छाननी करून ते साखर आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविले जाणार आहेत. दुष्काळ, जानेवारीनंतरची पाणीटंचाई या पार्श्वभूमीवर सर्वच साखर कारखान्यांनी हंगाम लवकर सुरू करण्याची तयारी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांनी १५ आॅक्टोबरला हंगाम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. उर्वरित कारखाने आठवडाभर पुढे-मागे सुरू होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) तीन टप्प्यांतील 'एफआरपी'चा तिढासाखर कारखान्यांसमोरील अडचणी पाहता तीन टप्प्यांत 'एफआरपी' देण्याबाबत मंत्री समितीच्या बैठकीत चर्चा झाली; पण याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. कायद्याने एकरकमीच 'एफआरपी' मिळाली पाहिजे, अन्यथा उसाचे दांडके हातात घेऊ, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिल्याने तीन टप्प्यांतील ‘एफआरपी’चा तिढा निर्माण होऊ शकतो.