शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

भारनियमनच्या पॅटर्नची भुरळ

By admin | Updated: November 25, 2014 00:31 IST

महावितरणचे यश : विजेच्या मागणीचे उत्कृष्ट व्यवस्थापन

मेहरुन नाकाडे -रत्नागिरी =विजेच्या बिकट प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी महावितरण कंपनीने फिडरनिहाय भारनियमन सुरू केले. फेजिंग व गावठाणांसाठी स्वतंत्र फिडर्स करून विजेच्या मागणीचे व्यवस्थापन केले. त्यामुळे जेथे वसुली कमी व वितरण हानी जास्त अशा १५ टक्के भागात भारनियमन करण्यात येत आहे. महावितरणने राबवलेल्या या पॅटर्नमुळे वीज वितरण, त्यातील त्रुटी, योग्य वसुली अशा विविध गोष्टी प्रत्यक्षात आल्याने अन्य राज्यांनीही महावितरणच्या या पॅटर्नचा अभ्यास करण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील वीज स्थिती व वितरण यंत्रणेत तफावत असल्याने डिसेंबर २0१२ पासून ‘जेथे वसुली कमी व वितरण हानी जास्त’ अशा १५ टक्के भागात हेतूत: भारनियमन करण्यात येत आहे. वीज प्रश्नावर महावितरण कंपनीने शासनाच्या सहकार्याने मिळवलेल्या नियंत्रणाचा पॅटर्न अन्य राज्यासाठी उपयोगी ठरला आहे. कर्नाटक, उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, बिहार, मध्यप्रदेश, तामिळनाडू राज्यांतील प्रतिनिधी महाराष्ट्राला भेट देऊन या पॅटर्नचा अभ्यास करत आहेत. शिवाय अन्य राज्यांचेही प्रतिनिधीही लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत. वितरण हानी कमी करण्यासाठी महावितरण कंपनीकडून नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येत आहेत. चोरी पकडणे केवळ भरारी पथकाचे काम नाही तर सर्वांचे आहे. त्यामुळे वीज चोरांविरूध्द सातत्याने मोहीम राबवण्यात येत आहे. कृषिपंपधारकांसाठी ‘महावितरण आपल्या दारी’ ही मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात जोडण्या देण्यात आल्या आहेत. रेडिओ फ्रिक्वेंसी व इन्फ्रारेड मीटर्सचे वितरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. गैरप्रकार शोधून काढण्यासाठी नियुक्त पथकात महिला कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेत दामिनी पथकाची स्थापना केली.महावितरण कंपनीने १९९६ पासून संगणकीकृत वीजबिले देण्यास प्रारंभ केला. नवीन वीज जोडणी देणे, मीटर वाचन, देयक आकारणी, त्याची वसूली व शेवटी त्यासाठी त्या त्या भागात आलेली वीज, देयक आकारणी झालेली वीज, याचा हिशेब मांडून त्याचे ऊर्जा अंकेक्षण करणे आदी सर्व कामे संगणकीकृत यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आली. अनेक राज्यांनी या प्रणाली त्यांच्या राज्यात राबवण्यासाठी मोबदला देऊन मागितल्या आहेत. परंतु शासकीय उपक्रम म्हणून या सर्व सेवा विनामोबदला पुरविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. रेडिओ फ्रिक्वेंसी व इन्फ्रारेड मीटर्स याबद्दलसुध्दा अनेक राज्यांनी माहिती मागवली आहे.शासकीय प्रकल्पातून ६४५५ मेगावॅट निर्मिती सुरू असून, खासगी प्रकल्पातून ४१३३ मेगावॅट विजेची निर्मिती होते. दरदिवशी १० ते १२ हजार मेगावॅट वीज लागते. आॅक्टोबर हीटमुळे ही मागणी १७ हजारापर्यंत वाढली होती. मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी केंद्राकडून काही प्रमाणात वीज घेण्यात येत होतीच. परंतु मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात महावितरणला यश आले आहे. ज्या फीडर्सवर वीज हानी जास्त व वसुली कमी त्याठिकाणी भारनियमन करण्यात येते. त्यामुळे पुनर्रचनेच्या वेळी ३५ टक्क्यांवर असलेली वितरण हानी आता १४ टक्क्यांवर आली आहे.पॅटर्नमुळे जेथे गळती नाही, ज्या फिडरवरील ग्राहकांकडून वीज बिले भरणा करण्याचे प्रमाण अधिक आहे, अशा ग्राहकांना भारनियमनाच्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे. उपलब्ध विजेचा वापर योग्य पद्धतीने केला जात आहे. हीच बाब अन्य राज्यांनाही मोहात टाकणारी ठरली आहे.पंतप्रधानांनी केले पॅटर्नचे कौतुकअल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन करून शासनाच्या मदतीने महावितरणकडून वीज प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. नियमित वीजबिल न भरणाऱ्या फिडर्सवर भारनियमन सुरू केले. गावठाणांसाठी स्वतंत्र फिडर्स, सिंगल फेजिंग, वीजहानी कमी करण्यात आली आहे. शिवाय माहिती तंत्रज्ञानातील अनेक उपक्रम अन्य राज्यांसाठी पथदर्शी ठरले आहेत. काही राज्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रात येऊन याचा अभ्यास करीत आहेत. किंबहुना त्याचा अवलंब आपल्या राज्यात करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या पॅटर्नचे कौतुक केले असून, त्याबाबत आणखी अभ्यासाच्या सूचना केल्या आहेत.- अजय मेहता,व्यवस्थापकीय संचालक, महावितरण