शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनच्या पॅटर्नची भुरळ

By admin | Updated: November 25, 2014 00:31 IST

महावितरणचे यश : विजेच्या मागणीचे उत्कृष्ट व्यवस्थापन

मेहरुन नाकाडे -रत्नागिरी =विजेच्या बिकट प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी महावितरण कंपनीने फिडरनिहाय भारनियमन सुरू केले. फेजिंग व गावठाणांसाठी स्वतंत्र फिडर्स करून विजेच्या मागणीचे व्यवस्थापन केले. त्यामुळे जेथे वसुली कमी व वितरण हानी जास्त अशा १५ टक्के भागात भारनियमन करण्यात येत आहे. महावितरणने राबवलेल्या या पॅटर्नमुळे वीज वितरण, त्यातील त्रुटी, योग्य वसुली अशा विविध गोष्टी प्रत्यक्षात आल्याने अन्य राज्यांनीही महावितरणच्या या पॅटर्नचा अभ्यास करण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील वीज स्थिती व वितरण यंत्रणेत तफावत असल्याने डिसेंबर २0१२ पासून ‘जेथे वसुली कमी व वितरण हानी जास्त’ अशा १५ टक्के भागात हेतूत: भारनियमन करण्यात येत आहे. वीज प्रश्नावर महावितरण कंपनीने शासनाच्या सहकार्याने मिळवलेल्या नियंत्रणाचा पॅटर्न अन्य राज्यासाठी उपयोगी ठरला आहे. कर्नाटक, उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, बिहार, मध्यप्रदेश, तामिळनाडू राज्यांतील प्रतिनिधी महाराष्ट्राला भेट देऊन या पॅटर्नचा अभ्यास करत आहेत. शिवाय अन्य राज्यांचेही प्रतिनिधीही लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत. वितरण हानी कमी करण्यासाठी महावितरण कंपनीकडून नियोजनबध्द प्रयत्न करण्यात येत आहेत. चोरी पकडणे केवळ भरारी पथकाचे काम नाही तर सर्वांचे आहे. त्यामुळे वीज चोरांविरूध्द सातत्याने मोहीम राबवण्यात येत आहे. कृषिपंपधारकांसाठी ‘महावितरण आपल्या दारी’ ही मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात जोडण्या देण्यात आल्या आहेत. रेडिओ फ्रिक्वेंसी व इन्फ्रारेड मीटर्सचे वितरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. गैरप्रकार शोधून काढण्यासाठी नियुक्त पथकात महिला कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेत दामिनी पथकाची स्थापना केली.महावितरण कंपनीने १९९६ पासून संगणकीकृत वीजबिले देण्यास प्रारंभ केला. नवीन वीज जोडणी देणे, मीटर वाचन, देयक आकारणी, त्याची वसूली व शेवटी त्यासाठी त्या त्या भागात आलेली वीज, देयक आकारणी झालेली वीज, याचा हिशेब मांडून त्याचे ऊर्जा अंकेक्षण करणे आदी सर्व कामे संगणकीकृत यंत्रणेमार्फत सुरू करण्यात आली. अनेक राज्यांनी या प्रणाली त्यांच्या राज्यात राबवण्यासाठी मोबदला देऊन मागितल्या आहेत. परंतु शासकीय उपक्रम म्हणून या सर्व सेवा विनामोबदला पुरविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. रेडिओ फ्रिक्वेंसी व इन्फ्रारेड मीटर्स याबद्दलसुध्दा अनेक राज्यांनी माहिती मागवली आहे.शासकीय प्रकल्पातून ६४५५ मेगावॅट निर्मिती सुरू असून, खासगी प्रकल्पातून ४१३३ मेगावॅट विजेची निर्मिती होते. दरदिवशी १० ते १२ हजार मेगावॅट वीज लागते. आॅक्टोबर हीटमुळे ही मागणी १७ हजारापर्यंत वाढली होती. मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी केंद्राकडून काही प्रमाणात वीज घेण्यात येत होतीच. परंतु मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात महावितरणला यश आले आहे. ज्या फीडर्सवर वीज हानी जास्त व वसुली कमी त्याठिकाणी भारनियमन करण्यात येते. त्यामुळे पुनर्रचनेच्या वेळी ३५ टक्क्यांवर असलेली वितरण हानी आता १४ टक्क्यांवर आली आहे.पॅटर्नमुळे जेथे गळती नाही, ज्या फिडरवरील ग्राहकांकडून वीज बिले भरणा करण्याचे प्रमाण अधिक आहे, अशा ग्राहकांना भारनियमनाच्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे. उपलब्ध विजेचा वापर योग्य पद्धतीने केला जात आहे. हीच बाब अन्य राज्यांनाही मोहात टाकणारी ठरली आहे.पंतप्रधानांनी केले पॅटर्नचे कौतुकअल्पकालीन व दीर्घकालीन नियोजन करून शासनाच्या मदतीने महावितरणकडून वीज प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. नियमित वीजबिल न भरणाऱ्या फिडर्सवर भारनियमन सुरू केले. गावठाणांसाठी स्वतंत्र फिडर्स, सिंगल फेजिंग, वीजहानी कमी करण्यात आली आहे. शिवाय माहिती तंत्रज्ञानातील अनेक उपक्रम अन्य राज्यांसाठी पथदर्शी ठरले आहेत. काही राज्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रात येऊन याचा अभ्यास करीत आहेत. किंबहुना त्याचा अवलंब आपल्या राज्यात करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या पॅटर्नचे कौतुक केले असून, त्याबाबत आणखी अभ्यासाच्या सूचना केल्या आहेत.- अजय मेहता,व्यवस्थापकीय संचालक, महावितरण