शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

‘साहित्य’ क्रांती घडविणारे माध्यम

By admin | Updated: February 12, 2015 00:26 IST

राजा शिरगुप्पे : चिंचवाड येथे सहावे ग्रामीण युवा मराठा साहित्य संमेलन

गांधीनगर : लेखन किंवा साहित्य हे आपल्याला रक्ताशिवाय क्रांती घडविण्यासाठी मिळालेले माध्यम आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हे हत्यार शोषितांच्या व वंचितांच्या हातात जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी केले. ते चिंचवाड (ता. करवीर) येथे सहाव्या ग्रामीण युवा मराठा साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षपदावरून बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत, अ‍ॅड. गोविंदराव पानसरे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.पानसरे म्हणाले, साहित्य आणि सत्य यांच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होतात. सत्य, आणि साहित्याची भूमिका काय असावी, हा प्रश्न आहे. केवळ एकमत किंवा एक विचार दृष्टिकोन यांचा प्रसार आणि प्रचार करून स्वतंत्र विचाराला पायबंद घालणे हे आपण नैतिक मानतो का? स्वागताध्यक्ष दीपक मगदूम, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील ‘जितो’चे अध्यक्ष नेमिचंद संघवी, सागर चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामीण कथाकार शंकर पाटील, कविवर्य आबा पाटील, उपप्राचार्य मनोहर परीट, वैशाली पाटील, संतोष माने व सनतकुमार पाटील यांचा गौरव झाला. तसेच कमल पाटील लिखित ‘वेलीवरचे फुल’ व ‘मोहाचे जाळे’ या नाट्य एकांकिका प्रकाशित झाल्या. दुपारच्या सत्रात शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी ‘आसुही हसले खुदुखुदु’ याचे सादरीकण केले. काव्यसंध्याच्या सत्रात संमेलनाध्यक्ष कवी बाळासोा शेटे यांच्या अध्यक्षतेखालील कवी संमेलनात आबा पाटील, संजय सौंदलगे, के. ए. मगदूम, उमेश सुतार, शर्मिष्ठा पाटील, आदी कवी सहभागी झाले होते. रात्री सृजनशक्ती बालविकास मंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविक, तर व्ही. डी. देसाई, सीमा बोरगावे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी चिंतामणी मगदूम, अंकित सुतार, सचिव नयना पाटील, सुनीता पाटील, आप्पासोा पाटील, रावसोा खोत, श्रेणिक पाटील, आर. ए. चौगुले, के. ए. मगदूम, मुकुंद मांडरेकर, आदी उपस्थित होते.