शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘साहित्य’ क्रांती घडविणारे माध्यम

By admin | Updated: February 12, 2015 00:26 IST

राजा शिरगुप्पे : चिंचवाड येथे सहावे ग्रामीण युवा मराठा साहित्य संमेलन

गांधीनगर : लेखन किंवा साहित्य हे आपल्याला रक्ताशिवाय क्रांती घडविण्यासाठी मिळालेले माध्यम आहे. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून हे हत्यार शोषितांच्या व वंचितांच्या हातात जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी केले. ते चिंचवाड (ता. करवीर) येथे सहाव्या ग्रामीण युवा मराठा साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षपदावरून बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत, अ‍ॅड. गोविंदराव पानसरे यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.पानसरे म्हणाले, साहित्य आणि सत्य यांच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण होतात. सत्य, आणि साहित्याची भूमिका काय असावी, हा प्रश्न आहे. केवळ एकमत किंवा एक विचार दृष्टिकोन यांचा प्रसार आणि प्रचार करून स्वतंत्र विचाराला पायबंद घालणे हे आपण नैतिक मानतो का? स्वागताध्यक्ष दीपक मगदूम, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील ‘जितो’चे अध्यक्ष नेमिचंद संघवी, सागर चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्रामीण कथाकार शंकर पाटील, कविवर्य आबा पाटील, उपप्राचार्य मनोहर परीट, वैशाली पाटील, संतोष माने व सनतकुमार पाटील यांचा गौरव झाला. तसेच कमल पाटील लिखित ‘वेलीवरचे फुल’ व ‘मोहाचे जाळे’ या नाट्य एकांकिका प्रकाशित झाल्या. दुपारच्या सत्रात शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी यांनी ‘आसुही हसले खुदुखुदु’ याचे सादरीकण केले. काव्यसंध्याच्या सत्रात संमेलनाध्यक्ष कवी बाळासोा शेटे यांच्या अध्यक्षतेखालील कवी संमेलनात आबा पाटील, संजय सौंदलगे, के. ए. मगदूम, उमेश सुतार, शर्मिष्ठा पाटील, आदी कवी सहभागी झाले होते. रात्री सृजनशक्ती बालविकास मंदिर या शाळेच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. एस. डी. पाटील यांनी प्रास्ताविक, तर व्ही. डी. देसाई, सीमा बोरगावे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी चिंतामणी मगदूम, अंकित सुतार, सचिव नयना पाटील, सुनीता पाटील, आप्पासोा पाटील, रावसोा खोत, श्रेणिक पाटील, आर. ए. चौगुले, के. ए. मगदूम, मुकुंद मांडरेकर, आदी उपस्थित होते.