शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

दारिद्र्यरेषेखालील यादी होणार कालबाह्य

By admin | Updated: May 20, 2016 00:34 IST

आता प्राधान्यक्रम कुटुंब यादी : योजनांसाठी सामाजिक, आर्थिक, जात जनगणनेनुसार नवीन यादी

जहॉँगिर शेख-- कागल --२०११ सालामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने संयुक्तरीत्या सामाजिक, आर्थिक, जात जनगणना करण्यात आली होती. या जनगणनेनुसार प्राधान्यक्रम लाभार्थ्यांची निवड करून त्यांनाच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. २००२ मध्ये निश्चित केलेल्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाची यादी यामुळे रद्द करण्यात आली असून, यापुढे दारिद्र्यरेषा यादी ऐवजी ही नवीन प्राधान्यक्रम कुटुंब यादी घरकुल, निवास योजना आणि अन्य योजनांसाठी पात्र ठरविण्यात आली आहे. भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने एप्रिल महिन्यात तशा सूचना महाराष्ट्र शासनाला दिल्यानंतर आता शासनाने जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका अशा संबंधित घटकांना ही यादी आणि सूचना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसांत ‘प्राधान्यक्रम कुटुंब यादी’ सार्वजनिकरीत्या जाहीर होणार आहे.दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव असणे म्हणजे विविध शासकीय योजना, अनुदानाचा भडिमार असणारे कुटुंब अशीच ओळख अलीकडे बनली होती. मोफत घरकुल, इंदिरा आवास योजना, शौचालये अनुदान, विविध कर्ज प्रकरणे, सबसिडी, पेन्शन, रेशनचे मुबलक धान्य, आदींद्वारे या कुटुंबांना दारिद्र्यरेषेवर आणण्याचे प्रयत्न झाले. ही दारिद्र्यरेषेखालची यादी २००२-२००३ मध्ये जाहीर झाली होती. तेव्हा चुकीच्या व्यक्तींची नावे असल्यावरून आणि श्रीमंतांचीही नावे या यादीत, तर खरे गरीब बाजूला, अशी टीका होऊन गदारोळ झाला होता; पण तीच यादी अंतिम मानण्यात आली आणि आजअखेर या यादीनुसार योजना राबविल्या. आता मात्र ही दारिद्र्यरेषेखालील यादी रद्द ठरविली गेली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी असा नवा प्राधान्यक्रम यादीमधून निश्चित केला जाणार आहे. तूर्त जरी केवळ इंदिरा आवास योजनेसाठी अशा सूचना केंद्र सरकारने केल्या असल्या तरी हीच यादी पुढे इतर योजनांसाठीही ग्राह्य मानली जाण्याची शक्यता आहे. शासन पातळीवरही या नव्या यादीबद्दल लोकमत कसे उद्दिपित होते, याबद्दल चाचपणी सुरू असून, त्यासाठी ग्रामसभांचा आधार घेतला जाणार आहे.लाभार्थी कुटुंबांची संख्या मर्यादित?दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची यादी बनविताना जनगणना करून १७ टक्क्यांप्रमाणे प्रत्येक गावात कुटुंबे निश्चित केली होती. या नव्या प्राधान्यक्रम यादीत असा प्रकार नाही. जबाबदार अधिकाऱ्यांकडून जनगणना करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित केली गेली आहे. काटेकोर निकष लावले आहेत. तसेच गावची भौगोलिक सुपीकताही लक्षात घेतली आहे. यामुळे पूर्वी कागल तालुक्यात ८७६४ कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली होती. आता पहिली प्राधान्यक्रम यादी आली आहे; त्यामध्ये ३७४४ कुटुंबांचा समावेश आहे. काही गावात शंभर ते दीडशे, तर काही गावांत ‘एक’ आणि ‘झीरो’ अशीही संख्या आहे.निवडक ग्रामपंचायतींमध्ये यादी वाचन?या आर्थिक, सामाजिक, जातनिहाय जनगणनेची लाभार्थी कुटुंबांची यादी जाहीर करण्यापूर्वी तसेच लाभार्थी निवड यातून करण्यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा बोलावून यादीचे वाचन केले जाणार आहे. जिल्ह्यातील दोन पंचायत समिती निवडून प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत पाच ग्रामपंचायती निवडण्यात येतील. येथे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. या ग्रामसभेत सूचना घेतल्या जातील, असे स्पष्ट आदेश शासनाने दिल्याने ही यादीच अंतिम मानली जाणार असे चित्र दिसते.