शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

चिकोत्रा खोऱ्यातील ऊस वाळला

By admin | Updated: January 21, 2016 00:29 IST

उपसाबंदीमुळे आशा मावळली : ४० गावांतील शेती धोक्यात; शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक अडचणीत

शशिकांत भोसले -- सेनापती कापशी--चिकोत्रा खोऱ्याला वरदान ठरलेला चिकोत्रा प्रकल्प यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे फक्त ४५ टक्केच भरला. परिणामी, या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ४० गावांतील शेती आता संकटात सापडली आहे. त्यातच चिकोत्रा नदीवर उपसाबंदी केल्यामुळे शेतातील उभा ऊस आता वाळून जात आहे. त्यामुळे या खोऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यातल्या त्यात कागल तालुक्यात तर पावसाने पूर्णपणे पाठच फिरविली. परिणामी, चिकोत्रा खोऱ्यातील ऊस तातडीने उचलण्याची घोषणा सर्वच कारखान्यांनी केली; पण आजची परिस्थिती पाहता अजून निम्मा ऊस शिवारातच आहे. बेलेवाडी काळम्मा येथील संताजी शुगरने आजपर्यंत सर्वाधिक ऊस या परिस्थितीत उचलून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यापाठोपाठ हमीदवाडा व शाहू कारखान्याचा नंबर लागतो.चिकोत्रा प्रकल्प हा कागल, आजरा व भुदरगड तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. हा प्रकल्प झाल्यामुळेच चिकोत्रा नदीत बारमाही पाणी वाहू लागले. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळला; पण यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाने तर या धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले असून, उपसाबंदी केली आहे. जर पाणी उपसले, तर संबंधित शेतकऱ्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. यामुळे शेतातील उभा ऊस आता डोळ््यांसमोर वाळून जात आहे. चिकोत्रा खोऱ्यात अद्याप सुमारे दोन लाख मे. टन ऊस उचल होणे बाकी आहे. चिकोत्रा नदी तर कोरडीच पडली आहे. पाण्याचा दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वच कारखान्यांनी तोडणी यंत्रणा या परिसरात राबवून तातडीने ऊस उचलणे गरजेचे आहे, अन्यथा उसावर गुलाल टाकून पेटवून नेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल, तर हा ऊस आता कोणत्याही परिस्थितीत उचलावाच लागेल.कारखान्यांच्याकडे शिल्लकव उचललेला ऊस पुढीलप्रमाणे : संताजी शुगरने ७० हजार मे.टन ऊस उचलला असून, अद्याप सुमारे ५० हजार मे. टन ऊस उचल होणे बाकी आहे. हमीदवाडा साखर कारखान्याने आजपर्यंत सुमारे ७४ हजार मे. टन ऊस उचलला असून, अद्याप ७० हजार मे. टन. ऊस उचल होणे बाकी आहे, तर शाहू साखर कारखान्याने ५५ हजार मे. टन ऊस उचलला असून, सुमारे ६५ हजार मे. टन ऊस उचलणे बाकी आहे.