शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

चिकोत्रा खोऱ्यातील ऊस वाळला

By admin | Updated: January 21, 2016 00:29 IST

उपसाबंदीमुळे आशा मावळली : ४० गावांतील शेती धोक्यात; शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक अडचणीत

शशिकांत भोसले -- सेनापती कापशी--चिकोत्रा खोऱ्याला वरदान ठरलेला चिकोत्रा प्रकल्प यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे फक्त ४५ टक्केच भरला. परिणामी, या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ४० गावांतील शेती आता संकटात सापडली आहे. त्यातच चिकोत्रा नदीवर उपसाबंदी केल्यामुळे शेतातील उभा ऊस आता वाळून जात आहे. त्यामुळे या खोऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यातल्या त्यात कागल तालुक्यात तर पावसाने पूर्णपणे पाठच फिरविली. परिणामी, चिकोत्रा खोऱ्यातील ऊस तातडीने उचलण्याची घोषणा सर्वच कारखान्यांनी केली; पण आजची परिस्थिती पाहता अजून निम्मा ऊस शिवारातच आहे. बेलेवाडी काळम्मा येथील संताजी शुगरने आजपर्यंत सर्वाधिक ऊस या परिस्थितीत उचलून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यापाठोपाठ हमीदवाडा व शाहू कारखान्याचा नंबर लागतो.चिकोत्रा प्रकल्प हा कागल, आजरा व भुदरगड तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. हा प्रकल्प झाल्यामुळेच चिकोत्रा नदीत बारमाही पाणी वाहू लागले. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळला; पण यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाने तर या धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले असून, उपसाबंदी केली आहे. जर पाणी उपसले, तर संबंधित शेतकऱ्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. यामुळे शेतातील उभा ऊस आता डोळ््यांसमोर वाळून जात आहे. चिकोत्रा खोऱ्यात अद्याप सुमारे दोन लाख मे. टन ऊस उचल होणे बाकी आहे. चिकोत्रा नदी तर कोरडीच पडली आहे. पाण्याचा दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वच कारखान्यांनी तोडणी यंत्रणा या परिसरात राबवून तातडीने ऊस उचलणे गरजेचे आहे, अन्यथा उसावर गुलाल टाकून पेटवून नेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल, तर हा ऊस आता कोणत्याही परिस्थितीत उचलावाच लागेल.कारखान्यांच्याकडे शिल्लकव उचललेला ऊस पुढीलप्रमाणे : संताजी शुगरने ७० हजार मे.टन ऊस उचलला असून, अद्याप सुमारे ५० हजार मे. टन ऊस उचल होणे बाकी आहे. हमीदवाडा साखर कारखान्याने आजपर्यंत सुमारे ७४ हजार मे. टन ऊस उचलला असून, अद्याप ७० हजार मे. टन. ऊस उचल होणे बाकी आहे, तर शाहू साखर कारखान्याने ५५ हजार मे. टन ऊस उचलला असून, सुमारे ६५ हजार मे. टन ऊस उचलणे बाकी आहे.