शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रा खोऱ्यातील ऊस वाळला

By admin | Updated: January 21, 2016 00:29 IST

उपसाबंदीमुळे आशा मावळली : ४० गावांतील शेती धोक्यात; शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक अडचणीत

शशिकांत भोसले -- सेनापती कापशी--चिकोत्रा खोऱ्याला वरदान ठरलेला चिकोत्रा प्रकल्प यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे फक्त ४५ टक्केच भरला. परिणामी, या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ४० गावांतील शेती आता संकटात सापडली आहे. त्यातच चिकोत्रा नदीवर उपसाबंदी केल्यामुळे शेतातील उभा ऊस आता वाळून जात आहे. त्यामुळे या खोऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यातल्या त्यात कागल तालुक्यात तर पावसाने पूर्णपणे पाठच फिरविली. परिणामी, चिकोत्रा खोऱ्यातील ऊस तातडीने उचलण्याची घोषणा सर्वच कारखान्यांनी केली; पण आजची परिस्थिती पाहता अजून निम्मा ऊस शिवारातच आहे. बेलेवाडी काळम्मा येथील संताजी शुगरने आजपर्यंत सर्वाधिक ऊस या परिस्थितीत उचलून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यापाठोपाठ हमीदवाडा व शाहू कारखान्याचा नंबर लागतो.चिकोत्रा प्रकल्प हा कागल, आजरा व भुदरगड तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. हा प्रकल्प झाल्यामुळेच चिकोत्रा नदीत बारमाही पाणी वाहू लागले. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळला; पण यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाने तर या धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले असून, उपसाबंदी केली आहे. जर पाणी उपसले, तर संबंधित शेतकऱ्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. यामुळे शेतातील उभा ऊस आता डोळ््यांसमोर वाळून जात आहे. चिकोत्रा खोऱ्यात अद्याप सुमारे दोन लाख मे. टन ऊस उचल होणे बाकी आहे. चिकोत्रा नदी तर कोरडीच पडली आहे. पाण्याचा दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वच कारखान्यांनी तोडणी यंत्रणा या परिसरात राबवून तातडीने ऊस उचलणे गरजेचे आहे, अन्यथा उसावर गुलाल टाकून पेटवून नेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल, तर हा ऊस आता कोणत्याही परिस्थितीत उचलावाच लागेल.कारखान्यांच्याकडे शिल्लकव उचललेला ऊस पुढीलप्रमाणे : संताजी शुगरने ७० हजार मे.टन ऊस उचलला असून, अद्याप सुमारे ५० हजार मे. टन ऊस उचल होणे बाकी आहे. हमीदवाडा साखर कारखान्याने आजपर्यंत सुमारे ७४ हजार मे. टन ऊस उचलला असून, अद्याप ७० हजार मे. टन. ऊस उचल होणे बाकी आहे, तर शाहू साखर कारखान्याने ५५ हजार मे. टन ऊस उचलला असून, सुमारे ६५ हजार मे. टन ऊस उचलणे बाकी आहे.