शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

चिकोत्रा खोऱ्यातील ऊस वाळला

By admin | Updated: January 21, 2016 00:29 IST

उपसाबंदीमुळे आशा मावळली : ४० गावांतील शेती धोक्यात; शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक अडचणीत

शशिकांत भोसले -- सेनापती कापशी--चिकोत्रा खोऱ्याला वरदान ठरलेला चिकोत्रा प्रकल्प यंदा पावसाने पाठ फिरविल्यामुळे फक्त ४५ टक्केच भरला. परिणामी, या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ४० गावांतील शेती आता संकटात सापडली आहे. त्यातच चिकोत्रा नदीवर उपसाबंदी केल्यामुळे शेतातील उभा ऊस आता वाळून जात आहे. त्यामुळे या खोऱ्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. त्यातल्या त्यात कागल तालुक्यात तर पावसाने पूर्णपणे पाठच फिरविली. परिणामी, चिकोत्रा खोऱ्यातील ऊस तातडीने उचलण्याची घोषणा सर्वच कारखान्यांनी केली; पण आजची परिस्थिती पाहता अजून निम्मा ऊस शिवारातच आहे. बेलेवाडी काळम्मा येथील संताजी शुगरने आजपर्यंत सर्वाधिक ऊस या परिस्थितीत उचलून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यापाठोपाठ हमीदवाडा व शाहू कारखान्याचा नंबर लागतो.चिकोत्रा प्रकल्प हा कागल, आजरा व भुदरगड तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. हा प्रकल्प झाल्यामुळेच चिकोत्रा नदीत बारमाही पाणी वाहू लागले. त्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळला; पण यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाने तर या धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले असून, उपसाबंदी केली आहे. जर पाणी उपसले, तर संबंधित शेतकऱ्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. यामुळे शेतातील उभा ऊस आता डोळ््यांसमोर वाळून जात आहे. चिकोत्रा खोऱ्यात अद्याप सुमारे दोन लाख मे. टन ऊस उचल होणे बाकी आहे. चिकोत्रा नदी तर कोरडीच पडली आहे. पाण्याचा दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे सर्वच कारखान्यांनी तोडणी यंत्रणा या परिसरात राबवून तातडीने ऊस उचलणे गरजेचे आहे, अन्यथा उसावर गुलाल टाकून पेटवून नेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल, तर हा ऊस आता कोणत्याही परिस्थितीत उचलावाच लागेल.कारखान्यांच्याकडे शिल्लकव उचललेला ऊस पुढीलप्रमाणे : संताजी शुगरने ७० हजार मे.टन ऊस उचलला असून, अद्याप सुमारे ५० हजार मे. टन ऊस उचल होणे बाकी आहे. हमीदवाडा साखर कारखान्याने आजपर्यंत सुमारे ७४ हजार मे. टन ऊस उचलला असून, अद्याप ७० हजार मे. टन. ऊस उचल होणे बाकी आहे, तर शाहू साखर कारखान्याने ५५ हजार मे. टन ऊस उचलला असून, सुमारे ६५ हजार मे. टन ऊस उचलणे बाकी आहे.