शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

पाझरणाऱ्या पाण्यावर फुलविले जीवन

By admin | Updated: May 20, 2016 00:32 IST

बकरे कुटुंबीयांचा उपक्रम : पाणी बचतीचे अनुकरण परिसरातील सहा कुटुंबांतूनही---- जलमित्र

कोल्हापूर : पावसाळ्यात जमिनीत मुरलेले तसेच खडकांतून पाझरणारे पाणी तळघरात एकत्र करून ते अंघोळीपासून कपडे धुण्यापर्यंत व स्वच्छतागृहापासून ते कुंड्यांतील झाडांना घालून टेरेसवर बगीचा फुलविण्याचा अनोखा प्रयोग राजारामपुरीतील बकरे कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे, या पाणी बचतीचा संदेश परिसरातील सुमारे पाच-सहा कुटुंबीयांनीही घेऊन त्यांनीही पाणी बचतीचा मार्ग अवलंबला आहे.राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील व्यवसायाने आर्किटेक्चर असलेले मोहन गोविंद बकरे त्यांचे भाऊ आर्टिस्ट विलास बकरे व नंदकुमार बकरे यांनी पाणी बचतीचा संदेश परिसरातही पोहोचविण्याचे काम कृतीतून केले आहे. बकरे कुटुंबीयांना इमारतीच्या पायातच पाणी लागले. मोहन बकरे हे आर्किटेक्चर असल्याने त्यांनी त्याच पाण्याचा वापर नियोजनबद्ध केला. त्यांनी खोदकामात साचलेल्या पाण्यात दगड-धोंडे टाकले. अशा सुमारे ६०० फूट जागेवर त्यांनी स्लॅब टाकून पाण्याला आतील खोली तीन फूट उंचीची ठेवून टाकीचे स्वरुप आणले, याच पाण्याचा वापर करून तीन मजली इमारत बांधली आहे. बकरे कुटुंबीयाने याच तळघरामधील पाणी विद्युत मोटरद्वारे चौथ्या मजल्यावर टाकीत टाकून त्यातून टेरेस गार्डन फुलवले आहे. यासाठी विद्या बकरे यांचेही मोलाचा हातभार लाभला. टेरसवरील टाकीतील पाणी पुन्हा पाईपलाईनद्वारे स्वयंपाकघरासह शौचालय, स्वच्छतागृह, कपडे धुण्यासाठी तसेच चक्क वॉशिंग मशीनसाठीही वापरात आणले आहे. या घरातील लहान मुले ही आंघोळीसाठीही हेच पाणी दररोज वापरतात तसेच हेच वापरलेले पाणी तळमजल्यात रस्त्याकडेच्या झाडांना पुन्हा वापरले आहे. टेरेसवरील गार्डनमध्ये त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून ठिबकचा वापर केला आहे. त्यामुळे पाण्याचीही बचत होत आहे. टेरेसवरच पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी छोटी-छोटी भांडी ठेवली आहेत. दिवसभरात या ठिकाणी अनेक पक्ष्यांचा वावर असतो. विलास बकरे हे सायंकाळी विविध प्रकारचे आवाज काढून पक्ष्यांना टेरेसवर बोलावितात. या पाण्याचा वापर करून आमच्या पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त सर्व गरजा पूर्ण करतो, आमच्या कुटुंबातही एकूण १६ जण हेच पाणी वापरत असल्यामुळे पाण्याचे बिलही अत्यल्प येते.