शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पाझरणाऱ्या पाण्यावर फुलविले जीवन

By admin | Updated: May 20, 2016 00:32 IST

बकरे कुटुंबीयांचा उपक्रम : पाणी बचतीचे अनुकरण परिसरातील सहा कुटुंबांतूनही---- जलमित्र

कोल्हापूर : पावसाळ्यात जमिनीत मुरलेले तसेच खडकांतून पाझरणारे पाणी तळघरात एकत्र करून ते अंघोळीपासून कपडे धुण्यापर्यंत व स्वच्छतागृहापासून ते कुंड्यांतील झाडांना घालून टेरेसवर बगीचा फुलविण्याचा अनोखा प्रयोग राजारामपुरीतील बकरे कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे, या पाणी बचतीचा संदेश परिसरातील सुमारे पाच-सहा कुटुंबीयांनीही घेऊन त्यांनीही पाणी बचतीचा मार्ग अवलंबला आहे.राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील व्यवसायाने आर्किटेक्चर असलेले मोहन गोविंद बकरे त्यांचे भाऊ आर्टिस्ट विलास बकरे व नंदकुमार बकरे यांनी पाणी बचतीचा संदेश परिसरातही पोहोचविण्याचे काम कृतीतून केले आहे. बकरे कुटुंबीयांना इमारतीच्या पायातच पाणी लागले. मोहन बकरे हे आर्किटेक्चर असल्याने त्यांनी त्याच पाण्याचा वापर नियोजनबद्ध केला. त्यांनी खोदकामात साचलेल्या पाण्यात दगड-धोंडे टाकले. अशा सुमारे ६०० फूट जागेवर त्यांनी स्लॅब टाकून पाण्याला आतील खोली तीन फूट उंचीची ठेवून टाकीचे स्वरुप आणले, याच पाण्याचा वापर करून तीन मजली इमारत बांधली आहे. बकरे कुटुंबीयाने याच तळघरामधील पाणी विद्युत मोटरद्वारे चौथ्या मजल्यावर टाकीत टाकून त्यातून टेरेस गार्डन फुलवले आहे. यासाठी विद्या बकरे यांचेही मोलाचा हातभार लाभला. टेरसवरील टाकीतील पाणी पुन्हा पाईपलाईनद्वारे स्वयंपाकघरासह शौचालय, स्वच्छतागृह, कपडे धुण्यासाठी तसेच चक्क वॉशिंग मशीनसाठीही वापरात आणले आहे. या घरातील लहान मुले ही आंघोळीसाठीही हेच पाणी दररोज वापरतात तसेच हेच वापरलेले पाणी तळमजल्यात रस्त्याकडेच्या झाडांना पुन्हा वापरले आहे. टेरेसवरील गार्डनमध्ये त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून ठिबकचा वापर केला आहे. त्यामुळे पाण्याचीही बचत होत आहे. टेरेसवरच पक्ष्यांना पाणी मिळावे यासाठी छोटी-छोटी भांडी ठेवली आहेत. दिवसभरात या ठिकाणी अनेक पक्ष्यांचा वावर असतो. विलास बकरे हे सायंकाळी विविध प्रकारचे आवाज काढून पक्ष्यांना टेरेसवर बोलावितात. या पाण्याचा वापर करून आमच्या पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त सर्व गरजा पूर्ण करतो, आमच्या कुटुंबातही एकूण १६ जण हेच पाणी वापरत असल्यामुळे पाण्याचे बिलही अत्यल्प येते.