शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

‘जीवनदायी’ योजनेचा पंचनामा होणार !

By admin | Updated: September 4, 2014 00:08 IST

जिल्हा परिषदेत चौकशीचा निर्णय : अनेक गैरप्रकारांवरून आरोग्य विभागाच्या बैठकीत जोरदार चर्चा

कोल्हापूर : राजीव गांधी जीवनदायी योजनेमधून आतापर्यंत झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत आज करण्यात आला. येत्या चार दिवसांत संबंधितांना बोलावून योजनेचा पंचनामा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आरोग्य समितीचे सभापती अनिल मादनाईक होते. राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली, पण त्याचा उपयोग लाभार्र्थींना होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत ‘लोकमत’ने या योजनेच्या कारभाराचा पर्दाफाश करत हा विषय लावून धरला होता. त्याचे पडसाद जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत उमटले. योजना चांगली आहे, पण त्याची देखरेख करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचे सांगत जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबीटकर यांनी हा विषय लावून धरला. हॉस्पिटलकडून सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी लाभार्थींच्या असल्याचे निदर्शनास आणून देत आतापर्यंत झालेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव आबीटकर यांनी मांडला. उपचारानंतर शासनाकडून वेळेत पैसे मिळत नाहीत, उपचाराएवढेच पैसे शासनाकडून मिळत असल्याने डॉक्टर टाळाटाळ करत असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. एक जिल्हा समन्वयक व दोन कर्मचारी यावर या योजनेचा डोलारा सुरू असल्याचे सांगत कोण काय करते, हेच कळत नाही. ग्रामीण जनतेसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या योजनेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे अर्जुन आबीटकर यांनी निदर्शनास आणून दिले. यावर येत्या चार दिवसांत आतापर्यंत झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव झाला. बैठकीला सदस्य शहाजी पाटील, परशुराम तावरे, मानसिंग पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, आदी उपस्थित होते.