शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम देण्यासाठी आयुष्य: राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:54 IST

हुपरी : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठीच आपण आयुष्यभर प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठीच साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी ...

हुपरी : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देण्यासाठीच आपण आयुष्यभर प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठीच साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून आपण बसत असतो. शेतकरी हिताविरोधी आपण कधीही भूमिका घेतलेली नसून माझ्या मिशीला आजपर्यंत कधीही खरकट लागलेले नाही. त्यामुळेच आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नी अगदी खुल्यापणाने सातत्याने रोखठोक भूमिका घेत असतो, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ हुपरी (ता.हातकणंगले) येथील हुतात्मा शंकर चिटणीस चौकात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेस पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, या भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे समाजातील एकही घटक समाधानी नाही. अन्न सुरक्षा योजना चुकीच्या पद्धतीने राबवून गोरगरीब जनतेच्या चुलीत पाणी ओतण्याचे व बेरोजगारी वाढवून तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचे काम सरकारने केले आहे. या सत्ताधुंद सरकारला घराकडे पाठविण्याची वेळ आता आली आहे.माजी खासदार जयवंतराव आवळे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. मात्र, आपल्यातल्या अंतर्गत मतभेदांनीच विरोधकांना मोठे करण्याचे काम केले आहे. आता यापुढे एकमेकांच्या पायात पाय न घालता हातात हात घालून पुढे जाण्याचे काम आपणा सर्वांना करावे लागणार आहे. नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आता नव्याने उभारी घेऊ लागला आहे. यापुढील सर्व निवडणुका आपण जिंकून काँग्रेस पक्षाची ताकद वाढवूया, असे आवाहन यावेळी केले.स्वागत व प्रास्ताविक राजूबाबा आवळे यांनी केले. यावेळी राजेश पाटील बी. के. चव्हाण, बाबासाहेब दबडे, सासने, प्रकाश पाटील, आप्पासाहेब एडके, नूरमहम्मद मुजावर, रेवती पाटील, संभाजी पोवार आदींनी मनोगते व्यक्त केले. विलासराव गाताडे, बाबासाहेब चौगुले, राहुल आवाडे, किरण पोतदार, बाळासाहेब जाधव, जालिंदर पाटील, नानासाहेब गाट, आदी यावेळी उपस्थित होते.नातवाचा नाद सोडून शेट्टी यांच्याबरोबरतत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांचे जुने सहकारी संभाजी पोवार एक जुनी आठवण सांगताना म्हणाले, मानेसाहेबांच्या मनामध्ये सर्वसामान्य शेतकºयांच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा तीव्र होती. त्यांची इच्छापूर्ती करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम खासदार राजू शेट्टी यांनी खºया अर्थाने पूर्ण केले आहे. त्यामुळेच आपण त्यांच्या नातवाचा नाद सोडून शेतकºयांसाठी आपले आयुष्य वेचणाºया खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.