शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

सहकारच्या पत्राने वाढवला गोकूळ निवडणुकीचा सस्पेन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST

कोल्हापूर : गोकूळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही, यावरून संभ्रमावस्था असताना गुरुवारी त्यात सहकार विभागाने राज्य सहकारी निवडणूक ...

कोल्हापूर : गोकूळ दूध संघाची निवडणूक होणार की नाही, यावरून संभ्रमावस्था असताना गुरुवारी त्यात सहकार विभागाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणालाच पत्र पाठवून मार्गदर्शन मागवल्याने या संभ्रमात आणखी भर पडली. प्रारूप याद्यावरील आक्षेप दाखल करण्याची मुदत संपल्याच्या राज्यातील ३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत आहेत. तोच नियम गोकूळला लावणार का, याबाबत मार्गदर्शन करावे, असे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, विभागीय उपनिबंधक दुग्ध यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कोल्हापुरातील बहुचर्चित गोकूळसह जिल्हा बँक व साखर कारखान्याच्या निवडणुकांनाही स्थगिती आली. १ एप्रिलपासून स्थगित झालेल्या टप्प्यापासून निवडणुकीची प्रकिया सुरू होईल, असे सांगण्यात आले. तथापि गुरुवारी यावरून संभ्रम निर्माण झाल्याने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, विभागीय उपनिबंधक दुग्धचे सुुरेश शिरापूरकर यांनी निवडणूक प्राधिकरणाकडे याबाबत मार्गदर्शन मागवल्याने पुन्हा निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात गोकूळची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली. प्रारूप याद्यावरील आक्षेप घेण्याची मुदत संपल्याच्या दिवशीच पुन्हा एकदा स्थगितीचा आदेश आला. त्यानंतर लगेचच पत्र काढून सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि राज्य सरकारची स्थगिती याबाबत नेमक्या कशाचे पालन करावे, याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती सहकार विभागाने प्राधिकरणाकडे केली आहे.

चौकट ०१

वेगवेगळे मतप्रवाह

केर्ली, ता. करवीर येथील ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्थेने गोकूळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सुनावणीवर निर्णय देताना गोकूळची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नव्याने आदेशाची गरज नाही, असा एक मतप्रवाह आहे, तर एकदा ४ फेब्रुवारीला स्थगिती दिली, १० तारखेला न्यायालयाने निवडणुका सुरू करण्याचे आदेश काढले, नंतर १५ पासून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे १० तारखेला दिलेला निर्णय आपोआपच संपुष्टात आला आहे. पुन्हा २४ तारखेला राज्य सरकारने स्थगिती दिली. त्यामुळे एकदा अंमलबजावणी झाल्यानंतर पुन्हा त्याच निर्णयाची कशी अंमलबजावणी होणार, असा दुसरा मतप्रवाह आहे. त्यामुळे आता पुन्हा न्यायालयात जावे लागणार आहे. कोरोनाची परिस्थिती पाहता ते शक्य नसल्याने निवडणूक होणार नाही, यावर दुसरा मतप्रवाह आहे.