शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

शाहू कृषी संघाचा आणखीन शाखा विस्तार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST

कागल : शेतकरीवर्गाला लागलागवड, औषधे, शेतीपूरक साहित्य योग्य किमतीत आणि दर्जेदार मिळावीत यासाठी अडतीस वर्षांपूर्वी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे ...

कागल : शेतकरीवर्गाला लागलागवड, औषधे, शेतीपूरक साहित्य योग्य किमतीत आणि दर्जेदार मिळावीत यासाठी अडतीस वर्षांपूर्वी स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी हा कृषी संघ स्थापन केला. आज बावीस शाखांद्वारे शेतकरीवर्गाला सेवा पुरवली जात आहे. भविष्यात आणखीन शाखाविस्तार करण्यासाठी सज्ज राहूया, असे प्रतिपादन संघाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.

छत्रपती शाहू कृषी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. येथील राममंदिर सभागृहात झालेल्या या सभेस सर्व संचालक, सभासद, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय पत्रिकेवरील बारा विषयांना हात उंचावून मंजुरी देण्यात आली. घाटगे म्हणाले, शाहूू साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेल्या व्यवसाय व्यवहारातून या संघाला आर्थिक स्थैर्य आहेच; पण आता स्वबळावर झेप घेण्यासाठी नवनवीन प्रयोग कार्यकारी संचालक समीर नाळे आणि संचालक मंडळाने राबवावेत. आपण त्यांच्या पाठीशी आहोत. प्रास्ताविक उपाध्यक्ष रामचंद्र खराडे यांनी केले. अहवाल आणि विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक समीर नाळे यांनी केले. आभार सुनील मगदूम यांनी मानले. संचालक नानासाहेब घाटगे, एकनाथ मगदूम, रामचंद्र वैराट, अरुण शिंत्रे, भाऊसाहेब कांबळे, प्रशांत घोरपडे, प्रकाश पाटील, राजू जाधव, रंजना सातवेकर, विमल चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

कागल येथील शाहू कृषी संघाच्या ३८ व्या वार्षिक सभेत अध्यक्ष समरजित घाटगे यांचा सत्कार उपाध्यक्ष रामचंद्र खराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.