शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चला, सावली तयार करूया

By admin | Updated: May 10, 2017 21:05 IST

सामूहिक प्रयत्नांची गरज : नियोजन करून वृक्षलागवड करणे आवश्यक

यंदा कोल्हापुरात फारच उन्हाळा जाणवायला लागला आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये डोक्याला, तोंडाला रुमाल बांधून फिरणारे नागरिक आपण टी.व्ही.वरून पाहत होतो. मात्र, तशी माणसं आता कोल्हापुरात सर्रास दिसायला सुरुवात झाली आहे. महिला आणि मुली तोंडभर रुमाल बांधून जातात; म्हणून त्यांची चेष्टाही व्हायची; परंतु या उन्हानं अशी पाळी आणली की, पुरुषसुद्धा डोक्यावर टोपी घालून, तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडायला लागले. महाराष्ट्र शासनानं तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भूभागाच्या ३३ टक्के वनक्षेत्र हे आदर्श प्रमाण मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या केवळ २० टक्के झाडेझुडपे आहेत. त्यामुळे हे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याच्या उद्दिष्टापेक्षाही जास्त वृक्षारोपण कोल्हापूर जिल्ह्यात झालं. मात्र, महानगरपालिकेकडून या कामामध्ये फारशी आस्था दाखविली नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आयआरबी कंपनीने तोडलेली झाडे शेंडा पार्क चौकाच्या डाव्या बाजूला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या दबावाखातर पुन्हा लावण्यात आली; परंतु नंतरच्या देखभालीअभावी आता या ठिकाणी वाळलेल्या लाकडाचे सुळके उभे आहेत. आता तरी किमान महापालिकेने उत्तम नियोजन करून वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. प्रचंड उन्हामुळे शहरातून फिरताना जिथे झाड आहे तिथे गाड्या पार्किंगसाठी गर्दी दिसू लागते. त्यामुळे अगदी गाड्या रस्त्यावर येतील अशा पद्धतीने झाडाखाली सावलीत गाड्या लावल्या जातात. उमा टॉकीजकडून दसरा चौकाकडे येताना लक्ष्मीपुरीतील चौकात मोठे झाड आहे. त्याची सावलीही प्रचंड. त्यामुळे या ठिकाणी सिग्नलला चार मिनिटांऐवजी दहा मिनिटे जरी थांबायला लागले तरी कुणाची हरकत नसणार; कारण वर सावली आहे. मात्र तेच उमा टॉकीजच्या चौकात एकही झाड नसल्याने तेथे उन्हात थांबायचे नागरिकांच्या जिवावर येते. त्यामुळे दसरा चौकाकडून गोखले कॉलेजकडे जाणारे अनेक दुचाकीधारक उमा टॉकीजच्या चौकाच्या अलीकडे एक झाड आहे, त्याच्या सावलीला हिरवा सिग्नल होईपर्यंत थांबतात. याच पद्धतीने आता जिथे गरज आहे तिथे सावली निर्माण करता येईल का, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी केवळ शोभेची झाडे न लावता जास्त सावली देणारी झाडे लावण्यावर भर दिला पाहिजे. फार मुळे न पसरणारी झाडे असतील तर त्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाहीत अशा पद्धतीने जर चौकाचौकांत, कोपऱ्याकोपऱ्यांवर शहरभर झाडे लावली गेली आणि ती चांगली जोपासली गेली तर सर्वत्र गारवा निर्माण होईल. पक्ष्यांना चांगला आसरा मिळेल. झाड कधीही पडू शकतं, रोज पाने पडणार, त्याचा कचरा होणार असे न म्हणता आवश्यक तेथे झाडे लावून सावली कशी वाढविता येईल, यासाठी प्रयत्न हवे आहेत.समीर देशपांडे