शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

चला, सावली तयार करूया

By admin | Updated: May 10, 2017 21:05 IST

सामूहिक प्रयत्नांची गरज : नियोजन करून वृक्षलागवड करणे आवश्यक

यंदा कोल्हापुरात फारच उन्हाळा जाणवायला लागला आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये डोक्याला, तोंडाला रुमाल बांधून फिरणारे नागरिक आपण टी.व्ही.वरून पाहत होतो. मात्र, तशी माणसं आता कोल्हापुरात सर्रास दिसायला सुरुवात झाली आहे. महिला आणि मुली तोंडभर रुमाल बांधून जातात; म्हणून त्यांची चेष्टाही व्हायची; परंतु या उन्हानं अशी पाळी आणली की, पुरुषसुद्धा डोक्यावर टोपी घालून, तोंडाला रुमाल बांधून बाहेर पडायला लागले. महाराष्ट्र शासनानं तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. भूभागाच्या ३३ टक्के वनक्षेत्र हे आदर्श प्रमाण मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या केवळ २० टक्के झाडेझुडपे आहेत. त्यामुळे हे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याच्या उद्दिष्टापेक्षाही जास्त वृक्षारोपण कोल्हापूर जिल्ह्यात झालं. मात्र, महानगरपालिकेकडून या कामामध्ये फारशी आस्था दाखविली नाही, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. आयआरबी कंपनीने तोडलेली झाडे शेंडा पार्क चौकाच्या डाव्या बाजूला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या दबावाखातर पुन्हा लावण्यात आली; परंतु नंतरच्या देखभालीअभावी आता या ठिकाणी वाळलेल्या लाकडाचे सुळके उभे आहेत. आता तरी किमान महापालिकेने उत्तम नियोजन करून वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. प्रचंड उन्हामुळे शहरातून फिरताना जिथे झाड आहे तिथे गाड्या पार्किंगसाठी गर्दी दिसू लागते. त्यामुळे अगदी गाड्या रस्त्यावर येतील अशा पद्धतीने झाडाखाली सावलीत गाड्या लावल्या जातात. उमा टॉकीजकडून दसरा चौकाकडे येताना लक्ष्मीपुरीतील चौकात मोठे झाड आहे. त्याची सावलीही प्रचंड. त्यामुळे या ठिकाणी सिग्नलला चार मिनिटांऐवजी दहा मिनिटे जरी थांबायला लागले तरी कुणाची हरकत नसणार; कारण वर सावली आहे. मात्र तेच उमा टॉकीजच्या चौकात एकही झाड नसल्याने तेथे उन्हात थांबायचे नागरिकांच्या जिवावर येते. त्यामुळे दसरा चौकाकडून गोखले कॉलेजकडे जाणारे अनेक दुचाकीधारक उमा टॉकीजच्या चौकाच्या अलीकडे एक झाड आहे, त्याच्या सावलीला हिरवा सिग्नल होईपर्यंत थांबतात. याच पद्धतीने आता जिथे गरज आहे तिथे सावली निर्माण करता येईल का, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. यासाठी केवळ शोभेची झाडे न लावता जास्त सावली देणारी झाडे लावण्यावर भर दिला पाहिजे. फार मुळे न पसरणारी झाडे असतील तर त्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाहीत अशा पद्धतीने जर चौकाचौकांत, कोपऱ्याकोपऱ्यांवर शहरभर झाडे लावली गेली आणि ती चांगली जोपासली गेली तर सर्वत्र गारवा निर्माण होईल. पक्ष्यांना चांगला आसरा मिळेल. झाड कधीही पडू शकतं, रोज पाने पडणार, त्याचा कचरा होणार असे न म्हणता आवश्यक तेथे झाडे लावून सावली कशी वाढविता येईल, यासाठी प्रयत्न हवे आहेत.समीर देशपांडे