शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

डाव्यांनी लढणे सोडल्याने निवडणूक विसरले, एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्यावर होती पकड 

By राजाराम लोंढे | Updated: October 23, 2024 13:52 IST

संघटनात्मक बांधणीत अपयश : नव्या नेतृत्वाने मरगळ झटकण्याची गरज

राजाराम लोंढेकोल्हापूर : एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड असलेल्या डाव्या पक्षांची आज अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी लढणेच सोडून दिल्याने त्यांना निवडणुकांचा विसर पडला की काय? अशी चर्चा सुरू आहे. काळानुरूप नवीन नेतृत्व तयार करून संघटनात्मक बांधणी करणे अपेक्षित होते; पण तसे झाले नसल्यानेच विशेषता शेतकरी कामगार पक्ष, जनता दलाची ताकद कमी झाली आहे.

साधारणता ५० वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्हा म्हणजे डाव्या पक्षांचा बालेकिल्ला अशी ओळख होती. शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, ‘भाकप’, ‘माकप’ने या पक्षांनी जिल्ह्याला आमदार, खासदार दिले. ‘लाल टोपी’चा दबदबा राजकारणावर होता. त्याच कालावधीत काँग्रेसची लाट आल्यानंतरही ‘डाव्या’ पक्षांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काम केले.विधानसभेच्या १९७२ च्या निवडणुकीत कोल्हापुरातून त्र्यंबक कारखानीस हे पहिले आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतरच्या काळात एकाचे तीन आमदार निवडून आणून आपला करिष्मा दाखवून तर दिलाच; पण १९७८, १९८०, १९८५, १९९०, १९९५ व १९९९ मध्ये डाव्या पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळात प्रतिनिधित्व केले; पण त्यानंतर अनेकजण निवडणुकीला सामोरे गेले; पण एकालाही यश मिळाले नाही. डाव्या पक्षांत नवे नेतृत्व उदयास आले आहेत; पण त्यांनी मरगळ झटकण्याची गरज आहे.

२५ वर्षांपूर्वी डाव्यांवर गुलालविधानसभेच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत प्रत्येक वेळी ‘शेकाप’, ‘जनता दल’, ‘भाकप’, ‘माकप’ या डाव्या पक्षांनी उमेदवार दिले; पण १९९९ ला संपतराव पवार यांच्या रूपाने शेवटचा गुलाल डाव्या पक्षांना मिळाला होता.

नवीन पिढीची चळवळीकडे पाठ‘डावे’ म्हणजे सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकऱ्यांचे पक्ष अशीच त्यावेळी धारणा होती; पण ज्यावेळी पक्षाची हुकमत होती, त्यावेळी तरुण नेतृत्वाला अपेक्षित संधी न मिळाल्याने पक्षवाढीला मर्यादा आल्याचे बोलले जाते. त्यामुळेच नवीन पिढीने चळवळीकडे पाठ फिरवली.

आतापर्यंत ‘डाव्या’ पक्षांचे झालेले आमदारनिवडणूक - मतदारसंघ - विजयी उमेदवार - पक्ष१९७२ - कोल्हापूर - त्र्यंबक कारखानीस - शेकाप१९७८ - इचलकरंजी - शिवगोंडा पाटील  - कम्युनिस्ट१९७८ - कोल्हापूर - रवींद्र सबनीस -  जनता पक्ष१९७८ - वडगाव - नानासाहेब माने  - जनता पक्ष१९८० - शिरोळ - दिनकरराव यादव - शेकाप१९८५ - सांगरुळ - गोविंदराव कलिकते -  शेकाप१९८५ - गडहिंग्लज - श्रीपतराव शिंदे  - जनता दल१९९० - इचलकरंजी - के. एल. मलबादे -  माकप१९९० - राधानगरी - शंकर धोंडी पाटील - जनता दल१९९० - गडहिंग्लज - श्रीपतराव शिंदे - जनता दल१९९५ - सांगरुळ - संपतराव पवार -  शेकाप१९९९ - सांगरुळ - संपतराव पवार - शेकाप

अजूनही येथे आहे डाव्यांची ताकद :‘करवीर’, ‘राधानगरी’, ‘शाहूवाडी’, ‘काेल्हापूर दक्षिण’, ‘कागल’, ‘कोल्हापूर उत्तर’, ‘इचलकरंजी’.

जुन्या-नव्यांचा मिलाफ करत पक्ष मजबुतीच्या दृष्टीने आम्ही पाऊले टाकली आहेत. आगामी काळात तुम्हाला मजबूत पक्ष म्हणून ‘शेकाप’ दिसेल. - बाबासाहेब देवकर (राज्य सहचिटणीस, शेकाप) 

सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याचे काम आतापर्यंत डाव्या पक्षांनी केले. मात्र, दुर्दैवाने निवडणुकीच्या रिंगणात यश मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला सत्तेपेक्षा गोरगरिबांचे प्रश्न सोडवायचे आहेत. - चंद्रकांत यादव (ज्येष्ठ नेते, माकप)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण