शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

प्रक्रियायुक्त पाणी सोडा अन्यथा आंदोलन *

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:33 IST

पेठवडगाव : वडगावातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट मसोबावाडी येथील बंधाऱ्यामध्ये व त्यानंतर वारणा नदीत जात आहे. त्यामुळे परिसरातील ...

पेठवडगाव : वडगावातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट मसोबावाडी येथील बंधाऱ्यामध्ये व त्यानंतर वारणा नदीत जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी पालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी सोडावे, अशी मागणी मसोबावाडी येथील ग्रामस्थांनी निवेदनातून नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वडगाव शहरातील सांडपाणी मसोबावाडी येथील ओढ्यातून जाते. या ओढ्याजवळ जनावरे कत्तलखाने आहेत. त्यामुळे रक्तयुक्त पाणीसुद्धा ओढ्यात सोडले जाते. या ओढ्यावर बंधारा घालण्यात आला आहे. त्यातील काहीजण शेतीसाठी हे पाणी वापरतात तसेच हे पाणी बंधाऱ्यांमध्ये साठून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते तसेच डास वाढतात. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हेच सांडपाणी वारणा नदीत मिसळते. याठिकाणी वडगाव, भादोले गावातील पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल आहेत. पर्यायाने दोन्ही गावांत दुर्दैवाने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे वडगाव पालिकेने तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी विश्वास खोत, संदीप मगदूम, अमर पाटील, प्रणव खोत, सुमित कदम, दत्तात्रय खोत, बाजीराव खोत आदी उपस्थित होते.

फोटो - २९१२२०२०-जेएवाय-०६

फोटो ओळ - पेठवडगाव येथे विनाप्रक्रिया सांडपाणी थेट ओढ्यात सोडले जात आहे.