शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

प्रक्रियायुक्त पाणी सोडा अन्यथा आंदोलन *

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:33 IST

पेठवडगाव : वडगावातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट मसोबावाडी येथील बंधाऱ्यामध्ये व त्यानंतर वारणा नदीत जात आहे. त्यामुळे परिसरातील ...

पेठवडगाव : वडगावातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट मसोबावाडी येथील बंधाऱ्यामध्ये व त्यानंतर वारणा नदीत जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तरी पालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी सोडावे, अशी मागणी मसोबावाडी येथील ग्रामस्थांनी निवेदनातून नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वडगाव शहरातील सांडपाणी मसोबावाडी येथील ओढ्यातून जाते. या ओढ्याजवळ जनावरे कत्तलखाने आहेत. त्यामुळे रक्तयुक्त पाणीसुद्धा ओढ्यात सोडले जाते. या ओढ्यावर बंधारा घालण्यात आला आहे. त्यातील काहीजण शेतीसाठी हे पाणी वापरतात तसेच हे पाणी बंधाऱ्यांमध्ये साठून राहिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते तसेच डास वाढतात. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हेच सांडपाणी वारणा नदीत मिसळते. याठिकाणी वडगाव, भादोले गावातील पिण्याच्या पाण्याचे जॅकवेल आहेत. पर्यायाने दोन्ही गावांत दुर्दैवाने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे वडगाव पालिकेने तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

यावेळी विश्वास खोत, संदीप मगदूम, अमर पाटील, प्रणव खोत, सुमित कदम, दत्तात्रय खोत, बाजीराव खोत आदी उपस्थित होते.

फोटो - २९१२२०२०-जेएवाय-०६

फोटो ओळ - पेठवडगाव येथे विनाप्रक्रिया सांडपाणी थेट ओढ्यात सोडले जात आहे.