शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

गांधीनगर प्रादेशिक नळपाणी योजनेला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:38 IST

उचगाव : गांधीनगरसह १३ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सरनोबतवाडीजवळच्या मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गेल्या ...

उचगाव : गांधीनगरसह १३ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सरनोबतवाडीजवळच्या मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गेल्या सहा महिन्यांपूर्वी गळती लागली आहे. मात्र, विद्युत विभाग व प्राधिकरण यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ही गळती अजूनही काढली नसल्याने रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या गळतीमुळे यातील बहुतांश गावांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईची मोठी झळ सोसावी लागत आहे. सिद्धनेर्ली येथील दूधगंगा नदीवरून गांधीनगरसह १३ गावांसाठी गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेला सरनोबतवाडीजवळच्या मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गळती लागली. मात्र, जलवाहिनीला अडसर ठरलेल्या विद्युत डीपीमुळे गळती काढणे कठीण झाले आहे.

या ठिकाणची गळती काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी खुदाई करून ठेवली आहे. जवळच विद्युत डीपी असल्याने खुदाई करणे व गळती काढणे धोक्‍याचे बनले आहे. त्यामुळे गळती काढण्याचे काम तात्पुरते थांबविले आहे. परिणामी रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे उचगाव, गांधीनगर या मोठ्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विद्युत विभाग व प्राधिकरण यांच्यामध्ये समन्वय नसल्याने हे गळती काढण्याचे काम पुढे सरकलेले नाही. गळतीमुळे उचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, मणेरमळा भागांत पाणीपुरवठा अपुरा होत असल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्युत विभाग, संबंधित ग्रामपंचायत व जीवन प्राधिकरण यांच्या एकत्रित समन्वयाने यावर तोडगा काढून ही गळती काढावी अशी मागणी होत आहे.

..........................

चौकट

नवीन वाहिनी कार्यान्वित करणे गरजेचे

सदरची मुख्य वाहिनी ही २० वर्षांपूर्वीची असल्याने तिचे आयुष्यमान संपले आहे. यामुळे प्रादेशिक योजनेच्या जलवाहिनीला वारंवार अनेक ठिकाणी गळती लागत असून नवीन डक्टलाईन आयर्नच्या वाहिनीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, ती वाहिनी कार्यान्वित करणे गरजेचे बनले आहे.

कोट

गळती काढण्यासाठी जलवाहिनीजवळच्या विद्युत डीपीचा अडथळा आहे. कामे करताना विद्युत डीपीच्या वीजप्रवाहामुळे धोका आहे. या कारणामुळे गळती काढण्याचे काम थांबविले आहे. ग्रामपंचायत व विद्युत विभाग यांनी सहकार्य करावे.

- ए.डी. चौगुले

उपअभियंता

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

ही योजना १३ गावांची आहे. उचगावसारख्या ५० हजार लोकसंख्येच्या गावाला या योजनेतून पाणीपुरवठा होतो. जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे पाणीपुरवठा अपुरा होत आहे. गळती काढण्याची जबाबदारी पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.

- दीपक रेडेकर, शिवसेना, उचगाव

फोटो १५ गांधीनगर पाणीपुरवठा

ओळ : सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गांधीनगरच्या नळपाणी योजनेला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

छाया : मोहन सातपुते