शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करणारे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

पूर्वी राजकारणात निष्ठेला फार महत्त्व होते. मात्र, अलीकडील राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्दच विसरल्याने नेतेही तसाच विचार करू लागले आहेत. ...

पूर्वी राजकारणात निष्ठेला फार महत्त्व होते. मात्र, अलीकडील राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्दच विसरल्याने नेतेही तसाच विचार करू लागले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सभोवतीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे माेहोळ आणि आपल्या कार्यकर्त्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या नेतृत्वाकडे पाहिले की, आजही कोठेतरी विचाराचे राजकारण जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. त्यातूनच प्रा. किसन चौगले यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या सर्वोच्च शिखर संस्था असलेल्या ‘गोकुळ’मध्ये पाठवून मोठा सन्मान करण्यात आला. यामुळे राजकारण व नेत्यावरील सामान्य माणसाचा विश्वास दृढ होण्यास मदत होणार, हे मात्र नक्की आहे.

‘राधानगरी’सारख्या दुर्गम तालुक्यात कोणताही राजकीय वारसा नसताना ए. वाय. पाटील यांनी गेल्या २५ वर्षांत कार्यकर्तृत्वातून कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. जिल्हा बँक, ‘बिद्री’ साखर कारखाना, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वत:चे राजकारण बळकट केलेच, मात्र ‘बिद्री’, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ, बाजार समिती आदी विविध सत्तास्थानांवर सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन राजकारणाचा वेगळा पायंडा त्यांनी राधानगरीत घालून दिला. त्यामुळेच त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्ता तयार होऊ शकला.

एकीकडे मी आणि माझे कुटुंब असे राजकारणाचे गणित मांडले जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र कार्यकर्त्यास सन्मान देणारे ए. वाय. पाटील यांच्यासारखे नेतृत्व आहे. ‘गोकुळ’च्या संचालक पदाची ‘क्रेझ’ वेगळी आहे, त्याला वेगवेगळे कंगोरेही आहेत. येथे आपल्या कुटुंबातील व्यक्ती जावी, यासाठी प्रत्येक नेत्याचा प्रयत्न असतो. यामुळे विधानसभेचे गणित अधिक सोपे होईल, असा काहींचा कयास आहे. पॅनलमध्ये बहुतांशी जणांनी आपल्या वारसदारांना रिंगणात उतरले असताना ए. वाय. पाटील यांनी मात्र सामान्य कार्यकर्त्याचे नाव पुढे करून खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचे आपण पाईक असल्याचे एकप्रकारे दाखवून दिले. प्रा. किसन चौगले यांना उमेदवारीच दिली नाहीतर त्यांना चांगल्या मतांनी विजयी करण्यासाठी कंबर कसली. निवडणूक अटीतटीची होती, यामध्ये काय होईल, याचा अंदाज नव्हता. अशा वातावरणात माझ्या सामान्य कार्यकर्त्याला कोठे दगाफटका बसू नये, यासाठी ए. वाय. पाटील यांनी अंतर्गत लावलेल्या जोडण्या खरोखरच वाखाणण्यासारख्या आहेत. कार्यकर्त्याला संधी देऊन निवडून आणल्याने ए. वाय. पाटील यांची ‘राधानगरी’ मतदारसंघात एक वेगळीच प्रतिमा तयार झाली आहे. सामान्य माणसांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

कार्यकर्त्यांबद्दलचे प्रेम आणि सामान्य माणसाबद्दलची कणवच त्यांना भविष्यातील राजकारणाला बळकटी देणारे ठरणार आहे, हे मात्र नक्की आहे.

- सुनील चौगले (आमजाई व्हरवडे)

ए. वाय. पाटील यांचा फोटो लावा