शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करणारे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

पूर्वी राजकारणात निष्ठेला फार महत्त्व होते. मात्र, अलीकडील राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्दच विसरल्याने नेतेही तसाच विचार करू लागले आहेत. ...

पूर्वी राजकारणात निष्ठेला फार महत्त्व होते. मात्र, अलीकडील राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्दच विसरल्याने नेतेही तसाच विचार करू लागले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सभोवतीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे माेहोळ आणि आपल्या कार्यकर्त्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या नेतृत्वाकडे पाहिले की, आजही कोठेतरी विचाराचे राजकारण जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. त्यातूनच प्रा. किसन चौगले यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या सर्वोच्च शिखर संस्था असलेल्या ‘गोकुळ’मध्ये पाठवून मोठा सन्मान करण्यात आला. यामुळे राजकारण व नेत्यावरील सामान्य माणसाचा विश्वास दृढ होण्यास मदत होणार, हे मात्र नक्की आहे.

‘राधानगरी’सारख्या दुर्गम तालुक्यात कोणताही राजकीय वारसा नसताना ए. वाय. पाटील यांनी गेल्या २५ वर्षांत कार्यकर्तृत्वातून कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. जिल्हा बँक, ‘बिद्री’ साखर कारखाना, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वत:चे राजकारण बळकट केलेच, मात्र ‘बिद्री’, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ, बाजार समिती आदी विविध सत्तास्थानांवर सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन राजकारणाचा वेगळा पायंडा त्यांनी राधानगरीत घालून दिला. त्यामुळेच त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्ता तयार होऊ शकला.

एकीकडे मी आणि माझे कुटुंब असे राजकारणाचे गणित मांडले जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र कार्यकर्त्यास सन्मान देणारे ए. वाय. पाटील यांच्यासारखे नेतृत्व आहे. ‘गोकुळ’च्या संचालक पदाची ‘क्रेझ’ वेगळी आहे, त्याला वेगवेगळे कंगोरेही आहेत. येथे आपल्या कुटुंबातील व्यक्ती जावी, यासाठी प्रत्येक नेत्याचा प्रयत्न असतो. यामुळे विधानसभेचे गणित अधिक सोपे होईल, असा काहींचा कयास आहे. पॅनलमध्ये बहुतांशी जणांनी आपल्या वारसदारांना रिंगणात उतरले असताना ए. वाय. पाटील यांनी मात्र सामान्य कार्यकर्त्याचे नाव पुढे करून खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचे आपण पाईक असल्याचे एकप्रकारे दाखवून दिले. प्रा. किसन चौगले यांना उमेदवारीच दिली नाहीतर त्यांना चांगल्या मतांनी विजयी करण्यासाठी कंबर कसली. निवडणूक अटीतटीची होती, यामध्ये काय होईल, याचा अंदाज नव्हता. अशा वातावरणात माझ्या सामान्य कार्यकर्त्याला कोठे दगाफटका बसू नये, यासाठी ए. वाय. पाटील यांनी अंतर्गत लावलेल्या जोडण्या खरोखरच वाखाणण्यासारख्या आहेत. कार्यकर्त्याला संधी देऊन निवडून आणल्याने ए. वाय. पाटील यांची ‘राधानगरी’ मतदारसंघात एक वेगळीच प्रतिमा तयार झाली आहे. सामान्य माणसांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

कार्यकर्त्यांबद्दलचे प्रेम आणि सामान्य माणसाबद्दलची कणवच त्यांना भविष्यातील राजकारणाला बळकटी देणारे ठरणार आहे, हे मात्र नक्की आहे.

- सुनील चौगले (आमजाई व्हरवडे)

ए. वाय. पाटील यांचा फोटो लावा