शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करणारे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

पूर्वी राजकारणात निष्ठेला फार महत्त्व होते. मात्र, अलीकडील राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्दच विसरल्याने नेतेही तसाच विचार करू लागले आहेत. ...

पूर्वी राजकारणात निष्ठेला फार महत्त्व होते. मात्र, अलीकडील राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्दच विसरल्याने नेतेही तसाच विचार करू लागले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सभोवतीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे माेहोळ आणि आपल्या कार्यकर्त्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या नेतृत्वाकडे पाहिले की, आजही कोठेतरी विचाराचे राजकारण जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. त्यातूनच प्रा. किसन चौगले यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या सर्वोच्च शिखर संस्था असलेल्या ‘गोकुळ’मध्ये पाठवून मोठा सन्मान करण्यात आला. यामुळे राजकारण व नेत्यावरील सामान्य माणसाचा विश्वास दृढ होण्यास मदत होणार, हे मात्र नक्की आहे.

‘राधानगरी’सारख्या दुर्गम तालुक्यात कोणताही राजकीय वारसा नसताना ए. वाय. पाटील यांनी गेल्या २५ वर्षांत कार्यकर्तृत्वातून कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. जिल्हा बँक, ‘बिद्री’ साखर कारखाना, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वत:चे राजकारण बळकट केलेच, मात्र ‘बिद्री’, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ, बाजार समिती आदी विविध सत्तास्थानांवर सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन राजकारणाचा वेगळा पायंडा त्यांनी राधानगरीत घालून दिला. त्यामुळेच त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्ता तयार होऊ शकला.

एकीकडे मी आणि माझे कुटुंब असे राजकारणाचे गणित मांडले जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र कार्यकर्त्यास सन्मान देणारे ए. वाय. पाटील यांच्यासारखे नेतृत्व आहे. ‘गोकुळ’च्या संचालक पदाची ‘क्रेझ’ वेगळी आहे, त्याला वेगवेगळे कंगोरेही आहेत. येथे आपल्या कुटुंबातील व्यक्ती जावी, यासाठी प्रत्येक नेत्याचा प्रयत्न असतो. यामुळे विधानसभेचे गणित अधिक सोपे होईल, असा काहींचा कयास आहे. पॅनलमध्ये बहुतांशी जणांनी आपल्या वारसदारांना रिंगणात उतरले असताना ए. वाय. पाटील यांनी मात्र सामान्य कार्यकर्त्याचे नाव पुढे करून खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचे आपण पाईक असल्याचे एकप्रकारे दाखवून दिले. प्रा. किसन चौगले यांना उमेदवारीच दिली नाहीतर त्यांना चांगल्या मतांनी विजयी करण्यासाठी कंबर कसली. निवडणूक अटीतटीची होती, यामध्ये काय होईल, याचा अंदाज नव्हता. अशा वातावरणात माझ्या सामान्य कार्यकर्त्याला कोठे दगाफटका बसू नये, यासाठी ए. वाय. पाटील यांनी अंतर्गत लावलेल्या जोडण्या खरोखरच वाखाणण्यासारख्या आहेत. कार्यकर्त्याला संधी देऊन निवडून आणल्याने ए. वाय. पाटील यांची ‘राधानगरी’ मतदारसंघात एक वेगळीच प्रतिमा तयार झाली आहे. सामान्य माणसांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

कार्यकर्त्यांबद्दलचे प्रेम आणि सामान्य माणसाबद्दलची कणवच त्यांना भविष्यातील राजकारणाला बळकटी देणारे ठरणार आहे, हे मात्र नक्की आहे.

- सुनील चौगले (आमजाई व्हरवडे)

ए. वाय. पाटील यांचा फोटो लावा