शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करणारे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:24 IST

पूर्वी राजकारणात निष्ठेला फार महत्त्व होते. मात्र, अलीकडील राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्दच विसरल्याने नेतेही तसाच विचार करू लागले आहेत. ...

पूर्वी राजकारणात निष्ठेला फार महत्त्व होते. मात्र, अलीकडील राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्दच विसरल्याने नेतेही तसाच विचार करू लागले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सभोवतीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे माेहोळ आणि आपल्या कार्यकर्त्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या नेतृत्वाकडे पाहिले की, आजही कोठेतरी विचाराचे राजकारण जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. त्यातूनच प्रा. किसन चौगले यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या सर्वोच्च शिखर संस्था असलेल्या ‘गोकुळ’मध्ये पाठवून मोठा सन्मान करण्यात आला. यामुळे राजकारण व नेत्यावरील सामान्य माणसाचा विश्वास दृढ होण्यास मदत होणार, हे मात्र नक्की आहे.

‘राधानगरी’सारख्या दुर्गम तालुक्यात कोणताही राजकीय वारसा नसताना ए. वाय. पाटील यांनी गेल्या २५ वर्षांत कार्यकर्तृत्वातून कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. जिल्हा बँक, ‘बिद्री’ साखर कारखाना, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वत:चे राजकारण बळकट केलेच, मात्र ‘बिद्री’, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ, बाजार समिती आदी विविध सत्तास्थानांवर सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन राजकारणाचा वेगळा पायंडा त्यांनी राधानगरीत घालून दिला. त्यामुळेच त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्ता तयार होऊ शकला.

एकीकडे मी आणि माझे कुटुंब असे राजकारणाचे गणित मांडले जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र कार्यकर्त्यास सन्मान देणारे ए. वाय. पाटील यांच्यासारखे नेतृत्व आहे. ‘गोकुळ’च्या संचालक पदाची ‘क्रेझ’ वेगळी आहे, त्याला वेगवेगळे कंगोरेही आहेत. येथे आपल्या कुटुंबातील व्यक्ती जावी, यासाठी प्रत्येक नेत्याचा प्रयत्न असतो. यामुळे विधानसभेचे गणित अधिक सोपे होईल, असा काहींचा कयास आहे. पॅनलमध्ये बहुतांशी जणांनी आपल्या वारसदारांना रिंगणात उतरले असताना ए. वाय. पाटील यांनी मात्र सामान्य कार्यकर्त्याचे नाव पुढे करून खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचे आपण पाईक असल्याचे एकप्रकारे दाखवून दिले. प्रा. किसन चौगले यांना उमेदवारीच दिली नाहीतर त्यांना चांगल्या मतांनी विजयी करण्यासाठी कंबर कसली. निवडणूक अटीतटीची होती, यामध्ये काय होईल, याचा अंदाज नव्हता. अशा वातावरणात माझ्या सामान्य कार्यकर्त्याला कोठे दगाफटका बसू नये, यासाठी ए. वाय. पाटील यांनी अंतर्गत लावलेल्या जोडण्या खरोखरच वाखाणण्यासारख्या आहेत. कार्यकर्त्याला संधी देऊन निवडून आणल्याने ए. वाय. पाटील यांची ‘राधानगरी’ मतदारसंघात एक वेगळीच प्रतिमा तयार झाली आहे. सामान्य माणसांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.

कार्यकर्त्यांबद्दलचे प्रेम आणि सामान्य माणसाबद्दलची कणवच त्यांना भविष्यातील राजकारणाला बळकटी देणारे ठरणार आहे, हे मात्र नक्की आहे.

- सुनील चौगले (आमजाई व्हरवडे)

ए. वाय. पाटील यांचा फोटो लावा