शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST

सत्ता असो अथवा नसो. सतत समाजासाठी कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्याला लोक स्वीकारतात. सत्तेचा दर्प चढू न देता कार्यरत राहणे आणि ...

सत्ता असो अथवा नसो. सतत समाजासाठी कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्याला लोक स्वीकारतात. सत्तेचा दर्प चढू न देता कार्यरत राहणे आणि सत्ता नसतानाही नाराज न होता पूर्वीच्याच जोमाने सक्रिय होणे .हे राजकारणात सर्वांनाच जमते असे नाही. पण ज्यांना हे जमते ते मास लिडर असतात. समरजितसिंह घाटगे यांना हे तंतोतंत लागू होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून संपूर्ण जिल्हा पिंजून काढणारे आणि शिवार संवादासाठी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचणारे समरजितसिंह हे जिल्ह्यातील एकमेव युवा राजकारणी आहेत.

पुणे म्हाडाचे अध्यक्षपद त्यांना मिळाले. राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले हे पद होते. पण ग्रामीण भागात काम करण्यासाठी फारसे उपयोगी नव्हते.तरी सुद्धा आपल्या कौशल्याने त्यांनी अनेक प्रकल्प सुरू केले.

कागललाही एक प्रकल्प आणला. तोच प्रकल्प आज महाविकास आघाडी शासनानेही पुढे सुरू ठेवला आहे.

विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगली मते घेतली, पण पराभव झाला. त्याने खचून न जाता ते दुसऱ्या दिवसापासून पुन्हा सक्रिय झाले. कार्यकर्त्यांना आधार दिला. गेली वर्षभर पूर्वीप्रमाणे ते सक्रिय आहेत. विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी शिरावर घेतली आहे. विशेषतः शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. सत्तांतरानंतरचा राज्यातील विरोधी पक्षाचा पहिला मोर्चा कोल्हापुरात त्याच्यांच संकल्पनेतून निघाला. समरजितसिंह घाटगे हे नाव राज्यभर पोहचले.

शाहू सहकारी साखर कारखाना आणि संलग्न सर्व संस्थांचे नेतृत्व करीत असताना सहकार चळवळीला मजबूत करण्यासारखे काम ते करीत आहेत. एका निश्चिंत ध्येयाने ते समाजकारण आणि राजकारण करीत आहेत. युवा पिढीच्या गळ्यातील ताईत बनलेले समरजितसिंह आज खऱ्या अर्थाने युवा नेतृत्व ठरले आहेत. ( कागल प्रतिनिधी)