शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

समदु:खी नेत्यांचे पॅनेल उभारणार

By admin | Updated: April 26, 2015 01:07 IST

काँग्रेस नेत्यांची माहिती : मोहनराव कदम, शिवाजीराव नाईक, घोरपडे एकत्र

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पाडून राष्ट्रवादीने केलेल्या खेळीला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही समदु:खी नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पॅनेल उभारण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात शनिवारी सांगलीत बैठक झाली. अन्य पक्षांच्या समदु:खी नेत्यांशी त्यांची चर्चाही झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील, भाजपचे खासदार संजय पाटील, काँग्रेसचे मदन पाटील एकत्र आल्यानंतर काँग्रेस व अन्य पक्षाच्या नेत्यांना जोरदार धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न आता होत आहे. शनिवारी सांगलीत काँग्रेसने जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक, दिगंबर जाधव, आदी नेते उपस्थित होते. दोन तास ही बैठक सुरू होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मोहनराव कदम म्हणाले की, आम्ही समदु:खी नेते एकत्र येऊन स्वतंत्र पॅनेल उभारणार आहोत. आ. पतंगराव कदम सोमवारी, २७ एप्रिल रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्याच उपस्थितीत याची चर्चा होऊन पॅनेलचे नावही निश्चित केले जाईल. बऱ्याच लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. अजूनही काहीजण संपर्कात आहेत. त्यामुळे आम्ही अशा सर्व लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढविणार आहोत. मिरज, पलूस, कडेगाव, जत आणि कवठेमहांकाळ येथे आमचे बहुमत आहे. अन्य काही नेते आमच्याबरोबर आले तर निश्चितपणे बँकेतही आमचे बहुमत आम्ही सिद्ध करू शकतो. सर्वसामान्य लोकांचे हे पॅनेल असेल. बँकेच्या हितासाठी आम्ही पॅनेल उभारणार आहोत. (प्रतिनिधी) उमेदवारही निश्चित होणार १९ उमेदवारांचे पॅनेल उभे करताना काँग्रेसला काही ठिकाणी दोनऐवजी एक उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे एकाच गटात दोन अर्ज असतील तर तेथे एकाला शांत करावे लागेल. या गोष्टी शक्य होतील, असे मोहनराव कदम, विशाल पाटील म्हणाले. दिग्गजांचे पॅनेल काँग्रेसच्या पुढाकाराने तयार होणाऱ्या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये मोहनराव कदम, विशाल पाटील यांच्यासह माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी मंत्री भाजपचे नेते अजितराव घोरपडे, आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, प्रा. शरद पाटील असे दिग्गज नेते एकवटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पॅनेलकडेही आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.