शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

समदु:खी नेत्यांचे पॅनेल उभारणार

By admin | Updated: April 26, 2015 01:07 IST

काँग्रेस नेत्यांची माहिती : मोहनराव कदम, शिवाजीराव नाईक, घोरपडे एकत्र

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पाडून राष्ट्रवादीने केलेल्या खेळीला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही समदु:खी नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पॅनेल उभारण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात शनिवारी सांगलीत बैठक झाली. अन्य पक्षांच्या समदु:खी नेत्यांशी त्यांची चर्चाही झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील, भाजपचे खासदार संजय पाटील, काँग्रेसचे मदन पाटील एकत्र आल्यानंतर काँग्रेस व अन्य पक्षाच्या नेत्यांना जोरदार धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न आता होत आहे. शनिवारी सांगलीत काँग्रेसने जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक, दिगंबर जाधव, आदी नेते उपस्थित होते. दोन तास ही बैठक सुरू होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मोहनराव कदम म्हणाले की, आम्ही समदु:खी नेते एकत्र येऊन स्वतंत्र पॅनेल उभारणार आहोत. आ. पतंगराव कदम सोमवारी, २७ एप्रिल रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्याच उपस्थितीत याची चर्चा होऊन पॅनेलचे नावही निश्चित केले जाईल. बऱ्याच लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. अजूनही काहीजण संपर्कात आहेत. त्यामुळे आम्ही अशा सर्व लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढविणार आहोत. मिरज, पलूस, कडेगाव, जत आणि कवठेमहांकाळ येथे आमचे बहुमत आहे. अन्य काही नेते आमच्याबरोबर आले तर निश्चितपणे बँकेतही आमचे बहुमत आम्ही सिद्ध करू शकतो. सर्वसामान्य लोकांचे हे पॅनेल असेल. बँकेच्या हितासाठी आम्ही पॅनेल उभारणार आहोत. (प्रतिनिधी) उमेदवारही निश्चित होणार १९ उमेदवारांचे पॅनेल उभे करताना काँग्रेसला काही ठिकाणी दोनऐवजी एक उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे एकाच गटात दोन अर्ज असतील तर तेथे एकाला शांत करावे लागेल. या गोष्टी शक्य होतील, असे मोहनराव कदम, विशाल पाटील म्हणाले. दिग्गजांचे पॅनेल काँग्रेसच्या पुढाकाराने तयार होणाऱ्या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये मोहनराव कदम, विशाल पाटील यांच्यासह माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी मंत्री भाजपचे नेते अजितराव घोरपडे, आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, प्रा. शरद पाटील असे दिग्गज नेते एकवटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पॅनेलकडेही आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.