शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पोलिसांअभावी एलबीटी मोहीम थांबली

By admin | Updated: March 3, 2015 23:03 IST

कारवाईवर प्रशासन ठाम : व्यापाऱ्यांशी चर्चेचा प्रस्ताव आयुक्तांनी फेटाळला

सांगली : एलबीटी वसुलीसाठी व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याच्या इराद्याने तयारी करणाऱ्या प्रशासनाच्या प्रयत्नांना आज, मंगळवारी ब्रेक लागला. दहावीची परीक्षा असल्याने महापालिकेला पोलीस बंदोबस्त मिळू शकला नाही. त्यामुळे आज दिवसभरात व्यापाऱ्यांवरील कारवाईची मोहीम थांबविण्यात आली. आयुक्त अजिज कारचे यांनी पोलीस बंदोबस्त मिळताच पुन्हा मोहीम हाती घेणार असल्याचे स्पष्ट करीत व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्तावही फेटाळून लावला. एलबीटी वसुलीसाठी महापालिकेने व्यापाऱ्यांच्या दुकानावर छापे टाकण्याची तयारी पूर्ण केली आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. पण पालिकेचे महापौर विवेक कांबळे यांनी आक्रमक भूमिका घेत एलबीटी वसुलीचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी व महापालिका संघर्ष सुरू आहे. पालिका हद्दीतील सुमारे ४०० व्यापाऱ्यांची एलबीटी निश्चित करून त्यांना नोटीसा बजाविल्या आहेत. या व्यापाऱ्यांकडे आजपासून वसुलीची मोहीम हाती घेतली जाणार होती. त्यासाठी पालिकेने पोलीस प्रशासनाला बंदोबस्त देण्याचे पत्र दिले होते. पण दहावीची परीक्षा सुरू झाल्याने परीक्षा केंद्रांवर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी महापालिकेला बंदोबस्त देण्यात असमर्थता दर्शविली. आयुक्त अजिज कारचे म्हणाले की, पोलीस बंदोबस्त मिळताच पुन्हा कारवाईची मोहीम हाती घेणार आहोत. मुख्यमंत्री व नगरविकास सचिवांनीही व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्याची सूचना केली आहे. सध्या पालिकेने मुद्दल व व्याज, दंडासह नोटिसा बजाविल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार व्याज व दंडावर विचार होऊ शकतो. पण व्यापाऱ्यांना एलबीटीची मुद्दल भरावीच लागेल. त्याबाबत कोणतीही तडजोड पालिका करणार नाही. व्यापाऱ्यांनी मुद्दल भरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही केले. व्यापाऱ्यांशी चर्चेचा प्रस्ताव फेटाळत ते म्हणाले की, मुख्यमंत्री अथवा नगरविकास सचिवांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही. यापूर्वी व्यापाऱ्यांसोबत बैठका झाल्या आहेत. आता कारवाई हाच एकमेव पर्याय आहे. आम्ही केवळ मुद्दल भरण्यास सांगत आहोत. व्यापाऱ्यांनी एलबीटी न भरल्यास कारवाई करावी लागेल. त्यात कोणीचीही गय केली जाणार नाही. (प्रतिनिधी)अनुदानाचे त्रांगडे; पालिकेला फटकाएलबीटी रद्द झाल्यानंतर राज्य शासनाकडून सध्याच्या वसुलीवर पालिकेला अनुदान दिले जाऊ शकते. त्याचा सर्वाधिक फटका सांगली महापालिकेला बसणार आहे. गेल्यावर्षी ५० कोटी, तर यंदा ८० कोटीचा एलबीटी वसूल झाला आहे. एलबीटीपूर्वी जकातीचे उत्पन्न १०५ कोटीपर्यंत गेले होते. त्यात गेल्या दोन वर्षातील नैसर्गिक पंधरा टक्के वाढ धरल्यास १४० ते १४५ कोटीपर्यंत एलबीटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. वस्तुत: वसुली ८० कोटीपर्यंत जाणार आहे. भविष्यात याच रकमेवर अनुदान मिळेल. त्यामुळे महापालिकेला दरवर्षी ५० ते ६० कोटी रुपयांच्या उत्पन्नावरील अनुदानाला मुकावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे.