शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तहानलेले ठेवूनच पाण्याची ‘परतवणी’

By admin | Updated: November 14, 2015 00:31 IST

ऊसपिके धोक्यात : म्हाकवे, सीमाभागातील शेतकरी व्याकुळ

दत्तात्रय पाटील- म्हाकवे -निढोरी मुख्य कालव्यातून म्हाकवेकडील उजव्या कालव्यातून येण्यासाठी निघालेले पाणी तब्बल १५ दिवसांच्या प्रवासानंतरही म्हाकवेत पोहोचलेच नाही. त्यामुळे म्हाकवे येथील सुमारे १२०० एकर क्षेत्रातील ऊस पिकांसह अन्य पिकेही धोक्यात आली आहेत. तर याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदारी झटकत आहेत.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात क्रमपाळीनुसार निठोरीतून म्हाकवेकडील कालव्यात पाणी सोडण्यात आले. परंतु, या कच्चा कालव्याला असणारी गळती, साचलेले केंदाळ, झाडेझुडपे यामुळे म्हाकवेपर्यंत पाणी येण्यामध्ये अडथळेच निर्माण झाले. काळम्मावाडी धरणातील कमी पाणीसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने म्हाकवेकडील कालव्याला १५ ऐवजी १२ दिवस पाणी सोडण्यचे नियोजन केले आहे. परंतु, पाणी येण्यामध्ये विलंब झाल्याने म्हाकवेतील शेतकऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकाऱ्यांना घेराओ घालून जाब विचारला त्यामुळे ३ दिवस वाढवून मिळाले. या संघर्षानंतरही म्हाकवेपर्यंत पाणी आलेले नाही. या कालव्यातील पाणी बंद करून ते बिद्री मार्गे शेंडूरकडे जाणाऱ्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे म्हाकवे गावच्या उत्तरेकडील माळरानावर असणाऱ्या ऊसपिकांची होरपळ होत आहे तर ज्वारी, हरभरा आदी रब्बी पिकेही धोक्यात आली आहेत.कालव्याच्या पाण्याचे नियोजन, कालव्याची दुरुस्ती करणे, पाणीपट्टी वसूल करणे आदी विभाग आहेत. या सर्वच अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता आमचे काम पाणी सोडण्याचे आहे ते पाणी कुठपर्यंत पोहोचले आहे याची जबाबदारी आमची नाही तर कालव्याची दुरुस्ती न झाल्यामुळे म्हाकवेपर्यंत म्हणजेच निढोरीपासून २६ कि.मी. पर्यंत पाणी आलेले नाही. दुरुस्ती करण्याचे काम आमचे नाही, अशी नेहमीचीच उत्तरे देऊन अधिकारी चालढकल करत आहेत. त्यामुळे पाणीपट्टी मानगुटीवर बसून वसुल करणारे अधिकारी पाणी देताना मात्र जबाबदारी झटकत आहेत, ही बाब आश्चर्यकारकच आहे. ...तर हा प्रश्नच मिटेलम्हाकवेसह शेंडूरकडील कालव्याचे अस्तरीकरण झालेले नाही. त्यामुळे काही ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त गळती होऊन पाणी वाया जात आहे. तसेच येथील शेतकऱ्यांच्या जमिनीही नापीक होत आहेत, तर म्हाकवेसह अवर्षणग्रस्त सीमाभागातील शेतकऱ्यांना अपुरे पाणी मिळते. त्यामुळे शासनाने या कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.