शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

तहानलेले ठेवूनच पाण्याची ‘परतवणी’

By admin | Updated: November 14, 2015 00:31 IST

ऊसपिके धोक्यात : म्हाकवे, सीमाभागातील शेतकरी व्याकुळ

दत्तात्रय पाटील- म्हाकवे -निढोरी मुख्य कालव्यातून म्हाकवेकडील उजव्या कालव्यातून येण्यासाठी निघालेले पाणी तब्बल १५ दिवसांच्या प्रवासानंतरही म्हाकवेत पोहोचलेच नाही. त्यामुळे म्हाकवे येथील सुमारे १२०० एकर क्षेत्रातील ऊस पिकांसह अन्य पिकेही धोक्यात आली आहेत. तर याबाबत पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदारी झटकत आहेत.नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात क्रमपाळीनुसार निठोरीतून म्हाकवेकडील कालव्यात पाणी सोडण्यात आले. परंतु, या कच्चा कालव्याला असणारी गळती, साचलेले केंदाळ, झाडेझुडपे यामुळे म्हाकवेपर्यंत पाणी येण्यामध्ये अडथळेच निर्माण झाले. काळम्मावाडी धरणातील कमी पाणीसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने म्हाकवेकडील कालव्याला १५ ऐवजी १२ दिवस पाणी सोडण्यचे नियोजन केले आहे. परंतु, पाणी येण्यामध्ये विलंब झाल्याने म्हाकवेतील शेतकऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकाऱ्यांना घेराओ घालून जाब विचारला त्यामुळे ३ दिवस वाढवून मिळाले. या संघर्षानंतरही म्हाकवेपर्यंत पाणी आलेले नाही. या कालव्यातील पाणी बंद करून ते बिद्री मार्गे शेंडूरकडे जाणाऱ्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे म्हाकवे गावच्या उत्तरेकडील माळरानावर असणाऱ्या ऊसपिकांची होरपळ होत आहे तर ज्वारी, हरभरा आदी रब्बी पिकेही धोक्यात आली आहेत.कालव्याच्या पाण्याचे नियोजन, कालव्याची दुरुस्ती करणे, पाणीपट्टी वसूल करणे आदी विभाग आहेत. या सर्वच अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता आमचे काम पाणी सोडण्याचे आहे ते पाणी कुठपर्यंत पोहोचले आहे याची जबाबदारी आमची नाही तर कालव्याची दुरुस्ती न झाल्यामुळे म्हाकवेपर्यंत म्हणजेच निढोरीपासून २६ कि.मी. पर्यंत पाणी आलेले नाही. दुरुस्ती करण्याचे काम आमचे नाही, अशी नेहमीचीच उत्तरे देऊन अधिकारी चालढकल करत आहेत. त्यामुळे पाणीपट्टी मानगुटीवर बसून वसुल करणारे अधिकारी पाणी देताना मात्र जबाबदारी झटकत आहेत, ही बाब आश्चर्यकारकच आहे. ...तर हा प्रश्नच मिटेलम्हाकवेसह शेंडूरकडील कालव्याचे अस्तरीकरण झालेले नाही. त्यामुळे काही ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त गळती होऊन पाणी वाया जात आहे. तसेच येथील शेतकऱ्यांच्या जमिनीही नापीक होत आहेत, तर म्हाकवेसह अवर्षणग्रस्त सीमाभागातील शेतकऱ्यांना अपुरे पाणी मिळते. त्यामुळे शासनाने या कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.