शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्य जनतेला अन्नधान्यापासून वंचित ठेवणारा कायदा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:18 IST

कागल येथे प्रबोधनात्मक शिबिर कागल : नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचा तर बळी ...

कागल येथे प्रबोधनात्मक शिबिर

कागल : नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचा तर बळी जाणारच आहे; पण रोज पिशवीतून किलोभर धान्य खरेदी करणारा गरीब वर्गही संपणार आहे. अदानी, अंबानीसारख्या उद्योगपतींच्या हाती शेतीची अर्थव्यवस्था देऊन सर्वांना अन्नधान्यासाठी मोताद करणारा हा कायदा आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

कागल येथील गाताडे मळ्यात ‘नवीन कृषी विधेयकाचे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम’ या विषयावर आयोजित प्रबोधनात्मक शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गहिनीनाथ कृषी मंडळाचे अध्यक्ष रमेश माळी होते.

उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, विलासराव गाताडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, तालुकाध्यक्ष तानाजी मगदूम, दत्ता सावंत, राजेंद्र माने, नगरसेवक आनंदा पसारे, बाबासाहेब नाईक, विवेक लोटे, सतीश गाडीवड्ड, योगेश गाताडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले की, या नवीन कायद्यामुळे शेती व्यवसाय भांडवलदार कंपन्यांच्या हाती जाईल. करारानंतर आमच्या जमिनी तारण देऊन या कंपन्या कर्ज उचलतील. शेतकरी वर्ग, सर्वच सामान्य जनतेसाठी हा घातक कायदा आहे. म्हणून कडाक्याच्या थंडीत एक महिना शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसलेले आहेत. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, रमेश माळी, अशोक शिरोळे यांची भाषणे झाली. कागल शहराध्यक्ष राजेंद्र बागल यांनी स्वागत केले. नीतेश कोगनोळे यांनी आभार मानले.

गुजरातमध्ये गोडाऊन तयार कशी..?

नवीन कृषी विधेयक मंजूर होण्यापूर्वीच गुजरातमध्ये अदानी, अंबानी यांची विशाल गोडाऊने कशी बांधली गेली? लोकशाहीचे सर्व संकेत, संसदीय परंपरा पायदळी तुडवून हे कायदे मंजूर केले. शेतकऱ्यांची एवढी काळजी असेल तर नरेंद्र मोदी सरकार शेतीमाल हमीभावापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार नाही, असा कायदा का करीत नाही? असा सवालही राजू शेट्टी यांनी केला.

२६ कागल राजू शेट्टी

फोटो कॅप्शन

कागल येथे नवीन कृषी कायद्यासंदर्भात आयोजित शेतकरी प्रबोधन शिबिरात माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भय्या माने, रमेश माळी, सागर कोंडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.