शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

सर्वसामान्य जनतेला अन्नधान्यापासून वंचित ठेवणारा कायदा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:18 IST

कागल येथे प्रबोधनात्मक शिबिर कागल : नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचा तर बळी ...

कागल येथे प्रबोधनात्मक शिबिर

कागल : नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचा तर बळी जाणारच आहे; पण रोज पिशवीतून किलोभर धान्य खरेदी करणारा गरीब वर्गही संपणार आहे. अदानी, अंबानीसारख्या उद्योगपतींच्या हाती शेतीची अर्थव्यवस्था देऊन सर्वांना अन्नधान्यासाठी मोताद करणारा हा कायदा आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

कागल येथील गाताडे मळ्यात ‘नवीन कृषी विधेयकाचे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम’ या विषयावर आयोजित प्रबोधनात्मक शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गहिनीनाथ कृषी मंडळाचे अध्यक्ष रमेश माळी होते.

उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, विलासराव गाताडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, तालुकाध्यक्ष तानाजी मगदूम, दत्ता सावंत, राजेंद्र माने, नगरसेवक आनंदा पसारे, बाबासाहेब नाईक, विवेक लोटे, सतीश गाडीवड्ड, योगेश गाताडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले की, या नवीन कायद्यामुळे शेती व्यवसाय भांडवलदार कंपन्यांच्या हाती जाईल. करारानंतर आमच्या जमिनी तारण देऊन या कंपन्या कर्ज उचलतील. शेतकरी वर्ग, सर्वच सामान्य जनतेसाठी हा घातक कायदा आहे. म्हणून कडाक्याच्या थंडीत एक महिना शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसलेले आहेत. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, रमेश माळी, अशोक शिरोळे यांची भाषणे झाली. कागल शहराध्यक्ष राजेंद्र बागल यांनी स्वागत केले. नीतेश कोगनोळे यांनी आभार मानले.

गुजरातमध्ये गोडाऊन तयार कशी..?

नवीन कृषी विधेयक मंजूर होण्यापूर्वीच गुजरातमध्ये अदानी, अंबानी यांची विशाल गोडाऊने कशी बांधली गेली? लोकशाहीचे सर्व संकेत, संसदीय परंपरा पायदळी तुडवून हे कायदे मंजूर केले. शेतकऱ्यांची एवढी काळजी असेल तर नरेंद्र मोदी सरकार शेतीमाल हमीभावापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार नाही, असा कायदा का करीत नाही? असा सवालही राजू शेट्टी यांनी केला.

२६ कागल राजू शेट्टी

फोटो कॅप्शन

कागल येथे नवीन कृषी कायद्यासंदर्भात आयोजित शेतकरी प्रबोधन शिबिरात माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भय्या माने, रमेश माळी, सागर कोंडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.