शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

उशिरा आलेले परीक्षार्थी पेपरला मुकले

By admin | Updated: April 30, 2017 18:52 IST

केंद्रीय चयन आयोगाची परीक्षा; विवेकानंद ज्युनिअर कॉलेज केंद्रावरील प्रकार

आॅनलाईन/लोकमतकोल्हापूर, दि. ३0 : उशिरा आलेल्या परीक्षार्थींना केंद्रीय चयन (निवड) आयोगाच्या (स्टाफ सिलेक्शन) पेपरला मुकावे लागले. विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर रविवारी हा प्रकार घडला. शहरातील विविध १७ केंद्रांवर दोन सत्रांत एकूण ५३८४ उमेदवारांनी परीक्षा दिली.

मल्टी टास्किंग या अतांत्रिकपदाच्या भरतीसाठी केंद्रीय चयन आयोगातर्फे परीक्षा आयोजित केली होती. आयोगाने कोल्हापुरातील शहरामधील स. म. लोहिया हायस्कूल, प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, विवेकानंद ज्युनिअर कॉलेज, न्यू मॉडेल इंग्शिल मेडियम स्कूल, विद्यापीठ हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, विद्यापीठ हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, शहाजी महाविद्यालय, राजर्षी शाहू महाराज हायस्कूल, गोखले कॉलेज, महावीर महाविद्यालय, उषाराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू कॉलेज, गर्ल्स हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, शहाजी लॉ कॉलेज, देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल या केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते ४ या दोन सत्रात परीक्षा घेतली.

यातील सकाळच्या सत्रातील पेपरसाठी ९ ते ९.३० ही वेळ परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये सोडण्याची होती. मात्र, विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या केंद्रावर निर्धारित वेळ संपल्यानंतर पावणेदहाच्या सुमारास काही परीक्षार्थी दाखल झाले. यात चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, आदी परिसरातील परीक्षार्थींचा समावेश होता. त्यांनी पेपरसाठी परीक्षा हॉलमध्ये सोडविण्यात यावे अशी मागणी येथील केंद्र प्रमुख आणि परीक्षेचे कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांना केली.आयोगाच्या नियमानुसार निर्धारित वेळ संपल्याने त्यांना आत सोडण्यात आले नाही. त्यामुळे त्यांना या पेपरला मुकावे लागले.

दरम्यान, याबाबत संबंधित परीक्षा केंद्राचे प्रमुख आणि शाहूवाडीचे गटविकास अधिकारी उदय पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावर त्यांनी सांगितले की, आयोगाने परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये सोडविण्याची वेळ सकाळी ९ ते ९.३० अशी निर्धारित केली होती. त्याची माहिती आयोगाने प्रवेश पत्रावर देखील दिली आहे. असे असताना काही परीक्षार्थी पावणेदहा वाजता केंद्राबाहेर आले. त्यांनी परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात यावी अशी मागणी केली. निर्धारीत वेळेत परीक्षा हॉलमध्ये आलेल्या परीक्षार्थींना सकाळी साडेनऊ वाजता उत्तरपत्रिकांचे वाटप केले होते. उशिरा आलेल्या परीक्षार्थींना आयोगाच्या नियमानुसार परीक्षा हॉलमध्ये सोडता आले नाही. (प्रतिनिधी) नोंदणीपैकी निम्मे परीक्षार्थ्यांची दांडी

कोल्हापूर केंद्रावरुन या परीक्षेतील दोन्ही सत्रांसाठी ६०४८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी पहिल्या पेपरसाठी २६९४ परीक्षार्थी हजर, तर ३३५४ जण गैरहजर राहिले. दुसरा पेपर २६८९ परीक्षार्थींनी दिला, तर ३३५९ जणांनी दांडी मारली. या परीक्षेसाठी १७ केंद्रावर जिल्हा प्रशासनाचे ७०० कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, सहाय्यक वाहतूक निरीक्षकपदासाठी शहरातील काही केंद्रांवर परीक्षा झाली.