शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

किरवले यांना अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2017 00:25 IST

कोल्हापुरात अंत्यसंस्कार : सीबीआय चौकशी करा : रामदास आठवले

कोल्हापूर : ‘अमर रहे, अमर रहे, किरवले सर अमर रहे’ अशा घोषणांनी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक डॉ. कृष्णा किरवले यांच्यावर शनिवारी सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर निळ्या झेंड्यात गुंडाळून त्यांचे पार्थिव ठेवले होते. अंत्ययात्रेत त्यांची पत्नी कल्पना, मुलगी अनघा यांच्यासह केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणे, ‘श्रमुद’चे डॉ. भारत पाटणकर यांच्यासह साहित्यिक, आंबेडकर चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले (रा. म्हाडा कॉलनी, राजेंद्रनगर) यांची शुक्रवारी दुपारी त्यांच्या कोल्हापुरातील घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. आर्थिक व्यवहाराच्या कारणांतून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दलित चळवळीतील नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा जनक्षोभ उसळला होता. या हत्येचा सर्वबाजूंनी तपास करावा अशी संतप्त कार्यकर्त्यांची मागणी होती. शनिवारी सकाळी डॉ. किरवले यांच्या मृतदेहाचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) विच्छेदन करण्यात आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास येथील दसरा चौकातून डॉ. किरवले यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत ‘अमर रहे, अमर रहे; किरवले सर अमर रहे’अशा घोषणा देण्यात येत होत्या. अंत्ययात्रा बिंदू चौकात शोकसभेत अनेकांची आदरांजलीपर भाषणे झाली. पंचगंगा स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले. अंत्ययात्रेत आमदार सतेज पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पार्थ पोळके, व्यंकाप्पा भोसले, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, डॉ.विश्वनाथ शिंदे, आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्याची मागणी करणार आहोत. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा करावी, तसेच या मागील मुख्य सूत्रधार शोधण्यात यावा.-रामदास आठवले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री. बाबांच्या हत्येमागे व्यक्तिगत कारण नक्कीच नाही. गुरुवारी रात्री मी बाबांशी पुण्यातून फोनवरून बोलले. त्यांच्या बोलण्यावरून घरगुती कारण नक्कीच नाही, ते शुक्रवारी (दि. ३) रात्री नाशिकला जाणार होते. तोपर्यंतच त्यांची हत्या झाली.- अनघा किरवले, मुलगीपाच तास ठिय्याडॉ. किरवले यांच्या मारेकऱ्याला अटक करावी, या मागणीसाठी दलित कार्यकर्त्यांनी शनिवारी पाच तास सीपीआर परिसरात ठिय्या आंदोलन केले. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी संशयित प्रीतम पाटील आणि त्याच्या आईला अटक केल्याची माहिती दिल्यानंतर हा तणाव निवळला.