शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

जिल्हा परिषदेचे लॅपटॉप सदस्य, सभापतींच्या घरी

By admin | Updated: June 13, 2017 01:13 IST

प्रशासनाची विनंती कचऱ्याच्या टोपलीत : ८१ पैकी केवळ १७ जणांनीच केले परत

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : गेल्या सभागृहातील ६९ जिल्हा परिषद सदस्य आणि १२ पंचायत समित्यांचे सभापतींना दिलेले लॅपटॉप अजूनही त्यांनी जिल्हा परिषदेत जमा केलेले नाहीत. हे लॅपटॉप परत देण्याबाबत आणि ते जमा करून घेण्याबाबत विषय समिती सभापतींच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, ८१ पैकी केवळ १७ जणांनीच लॅपटॉप परत केले आहेत. गेल्या सभागृहातील ६९ सदस्य आणि १२ सभापतींना लॅपटॉप देण्याचा निर्णय अर्थ समितीने घेतला. त्यानुसार जून २०१२ मध्ये या सर्वांना लिनोव्हा कंपनीचे लॅपटॉप देण्यात आले. ३६ हजार ६०० रुपयांना एक लॅपटॉप याप्रमाणे २९ लाख रुपये खर्चून हे लॅपटॉप देण्यात आले. आता जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. नवी पदाधिकारी निवडले गेले. दुसरी सर्वसाधारण सभाही तोंडावर आली तरी जुने लॅपटॉप अजून जमा करण्यात आले नाहीत. वित्त विभागाने हे लॅपटॉप परत जमा करण्याबाबत विषय समिती सभापतींच्या स्वीय सहाय्यकांना पत्र दिले होते. आपापल्या विषय समितीमधील सदस्यांना हे पत्र देऊन त्यांच्याकडून लॅपटॉप जमा करण्याची सूचना त्यामध्ये होती. मात्र, ८१ पैकी केवळ १७ जणांनीच हे लॅपटॉप परत केले आहेत. ते सुस्थितीत असल्याचेही सांगण्यात आले; परंतु आता उर्वरित जिल्हा परिषद सदस्य आणि सभापतींकडून लॅपटॉप परत कसे घ्यायचे, असा प्रश्न वित्त विभागासमोर पडला आहे.पुन्हा सदस्यांना लॅपटॉप नाहीतनव्या सभागृहातील सदस्यांना लॅपटॉप देणार का, अशी विचारणा सदस्यही करत आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाचे परीक्षण करणाऱ्या पंचायत राज समितीने सदस्यांना लॅपटॉप देण्याबाबत आक्षेप घेतला आहे. आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य, सभापतींनी काम करावे अशी जरी अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात या लॅपटॉपचा वापर सदस्य, सभापती करत नाहीत. या वास्तवाच्या आधारे या समितीने ‘लॅपटॉप देऊ नयेत,’ असा शेरा मारला आहे. त्यामुळे नव्या सदस्यांना लॅपटॉप देण्यात अडचण असल्याचे सांगण्यात आले.निवडणुकीला उभेराहिलेल्यांकडून लॅपटॉप परतजिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला उभारताना या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पुरविण्यात आलेल्या वस्तू वापरू नयेत, असा नियम आहे. त्यामुळे गेल्या सभागृहामध्ये निवडून आलेल्या आणि आता पुन्हा फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीसाठी उभारलेल्या बहुतांशी जणांनी हे लॅपटॉप परत केले आहेत. न उभारलेल्यांपैकीही एखादा सदस्य यामध्ये असू शकतो; परंतु केवळ १७ जणांनीच ते परत केले आहेत. मात्र, उर्वरित कुणीही लॅपटॉप परत दिलेला नाही. नियमाचा धाक असल्यानेच फक्त १७ लॅपटॉपच जिल्हा परिषदेकडे परत आले.सभापती बदलानंतरचे लॅपटॉप कुणाकडे?बाराही पंचायत समितीमध्ये आरक्षण बदलल्यानंतर अडीच वर्षांनी, तसेच ‘राजकीय सोयी’साठी आहे त्या सभापतींचा सव्वा वर्षांनंतर राजीनामा घेऊन नवीन सभापती केल्यानंतर हे लॅपटॉप हस्तांतरित करावेत, अशाही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आता हे लॅपटॉप नेमके जुन्या सभापतींकडे आहेत, त्यानंतर बदललेल्या सभापतींकडे आहेत का दोन महिन्यांपूर्वी निवडून आलेल्या सभापतींकडे आहेत याचा पत्ता प्रशासनालाही लागलेला नाही. ‘लॅपटॉप’ची मुदत संपली, आता निर्लेखनशासकीय नियमाप्रमाणे पाच वर्षांनंतर लॅपटॉप निकामी झाल्याचे समजून त्यांचे निर्लेखन केले जाते. त्यांचा लिलावही केला जाऊ शकतो. जिल्हा परिषद प्रशासन याबाबतीत धोरण ठरवेल त्यानुसार हे सर्व लॅपटॉप परत घेऊन त्यांचे निर्लेखन केले जाईल.