शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

राज्यातील जमिनींची होणार पुनर्माेजणी !

By admin | Updated: October 8, 2015 00:01 IST

३०० कोटींची तरतूद : सहा जिल्ह्यांची निवड; नकाशांचेही होणार डिजिटायझेशन

राम मगदूम - गडहिंग्लज--आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राज्यातील ग्रामीण भागातील जमिनींची पुनर्मोजणी करण्याबरोबरच मूळ भूमापन नकाशांचे डिजिटायझेशन करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुनर्मोजणीची कार्यवाही होईल. त्यासाठी २९३ कोटी ६१ लाख इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.राज्यातील जमिनींचा सर्व्हे प्रथमत: स्वातंत्र्यपूर्व काळात झाला. त्यानंतर वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकण व औद्योगिकरण यामुळे मूळ धारण जमिनींचे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण झाले. त्याचप्रमाणे विक्रीमुळे किंवा वारसामुळे जमिनींची विभागणी होऊन जमिनींचे अनेक तुकडे निर्माण झाले आहेत. यामुळे प्रत्यक्ष वहिवाट, भूमिअभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात अनेक ठिकाणी मेळ राहिलेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीविषयक वाद निर्माण झाले आहेत.सद्य:स्थितीत वारसा हक्काने व अन्य प्रकारच्या हस्तांतरणाने झालेल्या पोटहिश्श्यांची मोजणी न झाल्याने एकाच ७/१२ वर अनेक धारकांच्या नावांच्या नोंदी आहेत. बहुतांश ठिकाणी मूळ भूमापन अभिलेख जीर्ण झाले असून, फाटले आहेत. तसेच मूळ मोजणीच्यावेळी उभारलेली भूमापन चिन्हे व हद्दीच्या निशाण्यादेखील अस्तित्वात राहिलेल्या नाहीत. त्यामुळे जमिनीच्या हद्दीविषयी वाद निर्माण होतात. या पार्श्वभूमीवरच जमिनी पुनर्मोजणीचा निर्णय सरकारने घेतला आहे.तंटामुक्त समित्यांची घेणार मदत!पुनर्माेजणीसाठी प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधणे, पुनर्मोजणीच्या कामात व हरकती निवारणाच्या कामात नागरिक आणि मोजणी यंत्रणा यांना मदत करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती ग्राम समितीची मदत घेण्यात येणार आहे. याकामी ‘पुनर्माेजणी ग्राम समिती’ म्हणून ही समिती काम पाहणार आहे.सहा जिल्ह्यांसाठी २९३.६१ कोटीपुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात पुनर्माेजणीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यिात आला. त्यानंतर राज्यातील पहिल्या टप्प्यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जमिनींची पुनर्मोजणी होईल. त्यासाठी २९३.६१ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये नकाशांच्या डिजिटायझेशनसाठी ३८.७९ कोटी, जी.पी.सी.एन. उभारणी व त्याचे अक्षांश, रेखांश निश्चितीसाठी १०० कोटी, प्रत्यक्ष मोजणीसाठी ९०.०६ कोटी, आस्थापना व इतर अनुषंगिक खर्चासाठी ६४.७६ कोटी खर्ची पडणार आहेत. यासाठी सॅटेलाईट इमेजरी व ई.टी.एस/डी.जी.पी.एस. या हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. १३ प्रकारच्या नकाशांचे डिजिटायझेशनराष्ट्रीय भूमीअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यातील मूळ भूमापन नकाशांचे डिजिटायझेशन होणार आहे. त्यामध्ये टिपण, काटेफाळणी/ फोडी टिपण, फाळणी नकाशा, पोटहिस्सा नकाशा/ गट प्लॉट नकाशा, फेअर स्केच, कोर्ट वाटप नकाशा, सविस्तार भूमापन मोजणी नकाशा, गटबुक नकाशा, टँग्युलेशन नकाशा, सर्व्हेनंबरचे कापडी नकाशे, नगर भूमापन नकाशे, भूमिसंपादन नकाशे, बिनशेती नकाशे, इतर (बंदोबस्त नकाशे, सर नकाशे, सर्व्हे नंबरचे मूळ नकाशे, आदी) १३ प्रकारच्या नकाशांचे डिजिटायझेशन होईल. त्यासाठी सुमारे १५८ कोटी ७० लाख इतका खर्च अपेक्षित आहे.सनदी फी प्रतीहेक्टर ७५०/-तालुकानिहाय पुनर्मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित भोगवटादारांकडून सनद फीच्या स्वरूपात प्रती हेक्टर रुपये ७५०/- (प्रती एकर ३००/-) इतके मोजणी शुल्क वसूल करण्यात येणार आहे.