शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

गडमुडशिंगी देणार विमानतळासाठी जमीन

By admin | Updated: June 30, 2016 01:05 IST

तानाजी पाटील यांची माहिती : ‘टेक आॅफ’चा मार्ग खुला

कोल्हापूर : विमानतळ विस्तारीकरणासाठी वनविभागाची भूमी संपादन करण्याबाबत गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने सकारात्मक ठराव देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या विमानतळाच्या विस्तारीकरणासह येथून विमानाचे टेक आॅफ होण्याचा मार्ग खुला झाला आहे. ग्रामस्थांच्या काही मागण्यांच्या पूर्ततेची शासनाने तयारी दर्शविल्याने ग्रामपंचायतीने या ठरावाबाबत सकारात्मक पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे गडमुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील यांनी बुधवारी सांगितले. उपसरपंच पाटील यांनी सांगितले की, गडमुडशिंगी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत राज्य शासनाने १९८४ पासून तब्बल अकरा प्रकल्प राबविले आहेत. त्यांच्यासाठी वेळोवेळी शासनाने गावाच्या हद्दीतील जमीन संपादित केली. यात सन १९८४ मध्ये धरणग्रस्तांसाठी ३४.९४ हेक्टर जमीन शासनाने संपादित केली. यानंतर सन २०१० मध्ये दूधगंगा डावा कालवा सुरू करण्यासाठी ४५ हेक्टर जमीन घेतली; पण कालव्याचे काम केले नाही. या दोन्ही प्रकल्पांसाठी घेतलेल्या जमिनींचा मोबदला शासनाने ग्रामस्थांना आजतागायत दिलेला नाही. तसेच ग्रामस्थांचा विरोध असतानाही सन २०१०-११ मध्ये शासनाने गावाचे विभाजन करून न्यू वाडदे गाव मंजूर केले. त्यामुळे शासनाबद्दल ग्रामस्थांची नाराजी होती. त्यातूनच त्यांनी विमानतळ विस्तारीकरणासाठी गावची जमीन संपादित करण्यासह वनविभागाच्या जमिनी घेऊ नये याबाबतचा सकारात्मक ठराव देण्यास विरोध दर्शविला होता. त्याची दखल घेऊन ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. त्यातून ग्रामस्थांच्या मागण्यांच्या पूर्ततेची सरकार व प्रशासनाने तयारी दाखविली आहे. याबाबत कार्यवाहीही सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने विमानतळ विस्तारीकरणासाठी वनविभागाची जमीन घेण्यासाठीचा ना-हरकतीच्या ठरावाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे ठरविले आहे. विकासाला गती मिळणारदेशात सध्या अस्तित्वात असलेले १६० विमानतळ वापरात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पात घेतला. या अंतर्गत सरकारने कोल्हापूरच्या विमानतळाच्या विकास व विस्ताराबाबतचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. तसेच या विमानतळाच्या विकासाचा आराखडा डिसेंबर २०१५ मध्ये भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाने तयार केला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यापूर्वी विस्तारीकरणासाठी वनविभागाची ५.६० हेक्टर जमीन संपादित करणे आवश्यक आहे. गेल्या दीड वर्षापासून संबंधित जमिनी देण्याबाबतचा गडमुडशिंगी ग्रामपंचायतीचा ठरावाचा मुद्दा अडखळला होता. मात्र, ठराव देण्याबाबत ग्रामपंचायत सकारात्मक झाली आहे. त्यामुळे विमानतळ विकासाला गती मिळविण्याची आशा पल्लवित झाली आहे.