शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

भूसंपादनातील बदल अन्यायी

By admin | Updated: April 7, 2015 01:16 IST

बेमुदत आंदोलन :प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कोल्हापूर : नवीन भूसंपादन कायद्यात केंद्र सरकारने केलेले अन्यायकारक बदल तातडीने मागे घ्यावेत यासह जिल्ह्यातील धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांसाठी लागणाऱ्या जमिनीची संपादन प्रक्रिया ठप्पच आहे. अशा जमिनीची माहिती काढून त्यांची संपादन प्रक्रिया सुरू करावी आदी मागण्यांसाठी सोमवारी धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील तेरा जिल्ह्यांत एकाचवेळी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.दुपारी टाऊन हॉल उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. घोषणा देत मोर्चा दसरा चौक, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना देण्यात आले. नवीन भूसंपादन कायद्यात केंद्र शासनाने केलेले अन्यायकारक बदल तातडीने मागे घ्यावेत, केंद्राच्या नवीन कायद्यानुसार राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून जादाचे लाभ प्रकल्पग्रस्तांना मिळावेत. जिल्ह्यातील धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांना संपादन कराव्या लागणाऱ्या जमिनी संपादन प्रक्रिया ठप्पच आहे, ती सुरू करावी. आवश्यक आकाराच्या गावठाणाचा प्रस्ताव बरेच दिवस पुढे सरकत नाही. संकलन रजिस्टरची दुरुस्तीची कामे वर्षानुवर्षे पूर्ण होत नाहीत. अतिरिक्त वाटप केलेली जमीन परत घेतली जाते. प्रकल्पग्रस्तांची चुकलेली घरे, जमीन, तालीम यांचे तातडीने पैसे वाटप करावे, वारणा धरणग्रस्तांना १०० टक्के जमीन वाटप करणे व घरबांधणे, अनुदान वाटप करणे, वाटप करण्यात आलेल्या जमिनीतील अडथळे दूर करावे, मागणी केलेल्या जमिनीचे व भूखंडाचे आदेश काढावेत, उदरनिर्वाह भत्ता व ६५ टक्के रकमेवरील व्याज वाटप करणे, नागरी सुविधांची कामे तातडीने सुरूकरावीत, मागणी केलेले प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्पग्रस्त दाखले वाटप करावेत, २४०.६१ हेक्टर वन जमिनीचे निर्वणीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, ३१५ हेक्टर वारणा लाभ क्षेत्रातील जमीन संपादन करणे, ७४ हेक्टर जमिनीला पुनर्वसनचे नाव लावणे, उखळूपैकी अंबाईवाडीचा पुनर्वसनचा प्रस्ताव करावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यालयप्रमुख संपत देसाई, जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, शंकर पाटील, शंकर पाटील-वाठारकर, अशोक पाटील, आनंदा आमकर, जगन्नाथ कुरतुडकर, प्रा. टी. एल. पाटील, आदींचा समावेश आहे.