शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनातील बदल अन्यायी

By admin | Updated: April 7, 2015 01:16 IST

बेमुदत आंदोलन :प्रकल्पग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कोल्हापूर : नवीन भूसंपादन कायद्यात केंद्र सरकारने केलेले अन्यायकारक बदल तातडीने मागे घ्यावेत यासह जिल्ह्यातील धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांसाठी लागणाऱ्या जमिनीची संपादन प्रक्रिया ठप्पच आहे. अशा जमिनीची माहिती काढून त्यांची संपादन प्रक्रिया सुरू करावी आदी मागण्यांसाठी सोमवारी धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील तेरा जिल्ह्यांत एकाचवेळी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.दुपारी टाऊन हॉल उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त सहभागी होते. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. घोषणा देत मोर्चा दसरा चौक, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली. यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना देण्यात आले. नवीन भूसंपादन कायद्यात केंद्र शासनाने केलेले अन्यायकारक बदल तातडीने मागे घ्यावेत, केंद्राच्या नवीन कायद्यानुसार राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून जादाचे लाभ प्रकल्पग्रस्तांना मिळावेत. जिल्ह्यातील धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांना संपादन कराव्या लागणाऱ्या जमिनी संपादन प्रक्रिया ठप्पच आहे, ती सुरू करावी. आवश्यक आकाराच्या गावठाणाचा प्रस्ताव बरेच दिवस पुढे सरकत नाही. संकलन रजिस्टरची दुरुस्तीची कामे वर्षानुवर्षे पूर्ण होत नाहीत. अतिरिक्त वाटप केलेली जमीन परत घेतली जाते. प्रकल्पग्रस्तांची चुकलेली घरे, जमीन, तालीम यांचे तातडीने पैसे वाटप करावे, वारणा धरणग्रस्तांना १०० टक्के जमीन वाटप करणे व घरबांधणे, अनुदान वाटप करणे, वाटप करण्यात आलेल्या जमिनीतील अडथळे दूर करावे, मागणी केलेल्या जमिनीचे व भूखंडाचे आदेश काढावेत, उदरनिर्वाह भत्ता व ६५ टक्के रकमेवरील व्याज वाटप करणे, नागरी सुविधांची कामे तातडीने सुरूकरावीत, मागणी केलेले प्रकल्पग्रस्तांचे प्रकल्पग्रस्त दाखले वाटप करावेत, २४०.६१ हेक्टर वन जमिनीचे निर्वणीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, ३१५ हेक्टर वारणा लाभ क्षेत्रातील जमीन संपादन करणे, ७४ हेक्टर जमिनीला पुनर्वसनचे नाव लावणे, उखळूपैकी अंबाईवाडीचा पुनर्वसनचा प्रस्ताव करावा, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात श्रमिक मुक्ती दलाचे राज्य कार्यालयप्रमुख संपत देसाई, जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, शंकर पाटील, शंकर पाटील-वाठारकर, अशोक पाटील, आनंदा आमकर, जगन्नाथ कुरतुडकर, प्रा. टी. एल. पाटील, आदींचा समावेश आहे.