शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

निधीचा अभाव, अनास्थेमुळे शिंगणापूर उपसा केंद्र पुन्हा महापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आणि दूरदृष्टीचा अभाव, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे शिंगणापूर योजनेकडील महापुराच्या काळात वारंवार बुडणारे पाणी उपसा केंद्र ...

कोल्हापूर : राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आणि दूरदृष्टीचा अभाव, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे शिंगणापूर योजनेकडील महापुराच्या काळात वारंवार बुडणारे पाणी उपसा केंद्र उचलून वरील बाजूस घेण्याचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा पंधरा दिवस खंडित झाल्यानंतर या प्रस्तावावर चर्चा झाली. परंतु, ‘महापूर काय सारखा येतोय का’ या मानसिकतेमुळे प्रस्ताव मागे पडल्यामुळे कोल्हापूरकरांना सध्या तीव्र स्वरुपाच्या पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहराला सन २०१९मध्ये महापुराचा जबरदस्त फटका बसला होता. त्यावेळी बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर येथील महानगरपालिकेची पाणी उपसा केंद्रे तसेच विजेचे ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात होते. त्यावेळी अभूतपूर्व पाणी संकट शहरावर ओढवले होते. पंधरा दिवस शहराला पाणी पुरवठा झाला नव्हता. तेव्हा आलेल्या या कटू अनुभवातून काही धडा शिकायला मिळाला. शिंगणापूर येथील नदीकाठावर असणारे उपसा केंद्र वरील बाजूस ज्या भागात महापुराचे पाणी येणार नाही, अशाठिकाणी उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.

संपूर्ण पाणी उपसा केंद्रच वरील बाजूला घेऊन नव्याने उभारणी करण्याकरिता १४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, तर आहे त्याच जागेवर केवळ पंपिंग मशिनरी व ट्रान्सफॉर्मर उचलून घ्यायचे झाल्यास ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याचे आराखडे तयार करण्यात आले. गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पुढाकाराने महानगरपालिका स्थायी समितीने अंदाजपत्रकात ७५ लाखांची तरतूद केली. बाकीचा निधी हा डीपीडीसीतून घ्यावा, असे ठरले होते. तसा प्रस्तावसुध्दा डीपीडीसीकडे सादर करण्यात आला.

एक वर्ष या प्रस्तावावर महापालिकेने पाठपुरावा केला नाही, पालकमंत्री सतेज पाटील यांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले. तोपर्यंत कोरोना संसर्ग सुरु झाला आणि या कोरोनाच्या काळात दीड वर्ष निधीअभावी काहीच झाले नाही. राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष, नगरसेवक पदाधिकाऱ्यांची अनास्था आणि आर्थिक निधीअभावी उपसा केंद्र वर उचलून घेण्याचा प्रस्ताव फाईलमध्येच अडकून पडला. पण या अनास्थेमुळे यावर्षीच्या महापुरात तिन्ही केंद्रे पाण्यात अडकल्यामुळे शहरात नागरिकांना भयंकर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.