शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

निधीचा अभाव, अनास्थेमुळे शिंगणापूर उपसा केंद्र पुन्हा महापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आणि दूरदृष्टीचा अभाव, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे शिंगणापूर योजनेकडील महापुराच्या काळात वारंवार बुडणारे पाणी उपसा केंद्र ...

कोल्हापूर : राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आणि दूरदृष्टीचा अभाव, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे शिंगणापूर योजनेकडील महापुराच्या काळात वारंवार बुडणारे पाणी उपसा केंद्र उचलून वरील बाजूस घेण्याचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा पंधरा दिवस खंडित झाल्यानंतर या प्रस्तावावर चर्चा झाली. परंतु, ‘महापूर काय सारखा येतोय का’ या मानसिकतेमुळे प्रस्ताव मागे पडल्यामुळे कोल्हापूरकरांना सध्या तीव्र स्वरुपाच्या पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहराला सन २०१९मध्ये महापुराचा जबरदस्त फटका बसला होता. त्यावेळी बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर येथील महानगरपालिकेची पाणी उपसा केंद्रे तसेच विजेचे ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात होते. त्यावेळी अभूतपूर्व पाणी संकट शहरावर ओढवले होते. पंधरा दिवस शहराला पाणी पुरवठा झाला नव्हता. तेव्हा आलेल्या या कटू अनुभवातून काही धडा शिकायला मिळाला. शिंगणापूर येथील नदीकाठावर असणारे उपसा केंद्र वरील बाजूस ज्या भागात महापुराचे पाणी येणार नाही, अशाठिकाणी उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.

संपूर्ण पाणी उपसा केंद्रच वरील बाजूला घेऊन नव्याने उभारणी करण्याकरिता १४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, तर आहे त्याच जागेवर केवळ पंपिंग मशिनरी व ट्रान्सफॉर्मर उचलून घ्यायचे झाल्यास ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याचे आराखडे तयार करण्यात आले. गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पुढाकाराने महानगरपालिका स्थायी समितीने अंदाजपत्रकात ७५ लाखांची तरतूद केली. बाकीचा निधी हा डीपीडीसीतून घ्यावा, असे ठरले होते. तसा प्रस्तावसुध्दा डीपीडीसीकडे सादर करण्यात आला.

एक वर्ष या प्रस्तावावर महापालिकेने पाठपुरावा केला नाही, पालकमंत्री सतेज पाटील यांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले. तोपर्यंत कोरोना संसर्ग सुरु झाला आणि या कोरोनाच्या काळात दीड वर्ष निधीअभावी काहीच झाले नाही. राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष, नगरसेवक पदाधिकाऱ्यांची अनास्था आणि आर्थिक निधीअभावी उपसा केंद्र वर उचलून घेण्याचा प्रस्ताव फाईलमध्येच अडकून पडला. पण या अनास्थेमुळे यावर्षीच्या महापुरात तिन्ही केंद्रे पाण्यात अडकल्यामुळे शहरात नागरिकांना भयंकर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.