शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

निधीचा अभाव, अनास्थेमुळे शिंगणापूर उपसा केंद्र पुन्हा महापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आणि दूरदृष्टीचा अभाव, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे शिंगणापूर योजनेकडील महापुराच्या काळात वारंवार बुडणारे पाणी उपसा केंद्र ...

कोल्हापूर : राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष आणि दूरदृष्टीचा अभाव, लोकप्रतिनिधींची अनास्था यामुळे शिंगणापूर योजनेकडील महापुराच्या काळात वारंवार बुडणारे पाणी उपसा केंद्र उचलून वरील बाजूस घेण्याचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. दोन वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा पंधरा दिवस खंडित झाल्यानंतर या प्रस्तावावर चर्चा झाली. परंतु, ‘महापूर काय सारखा येतोय का’ या मानसिकतेमुळे प्रस्ताव मागे पडल्यामुळे कोल्हापूरकरांना सध्या तीव्र स्वरुपाच्या पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासह शहराला सन २०१९मध्ये महापुराचा जबरदस्त फटका बसला होता. त्यावेळी बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर येथील महानगरपालिकेची पाणी उपसा केंद्रे तसेच विजेचे ट्रान्सफॉर्मर पुराच्या पाण्यात होते. त्यावेळी अभूतपूर्व पाणी संकट शहरावर ओढवले होते. पंधरा दिवस शहराला पाणी पुरवठा झाला नव्हता. तेव्हा आलेल्या या कटू अनुभवातून काही धडा शिकायला मिळाला. शिंगणापूर येथील नदीकाठावर असणारे उपसा केंद्र वरील बाजूस ज्या भागात महापुराचे पाणी येणार नाही, अशाठिकाणी उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता.

संपूर्ण पाणी उपसा केंद्रच वरील बाजूला घेऊन नव्याने उभारणी करण्याकरिता १४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता, तर आहे त्याच जागेवर केवळ पंपिंग मशिनरी व ट्रान्सफॉर्मर उचलून घ्यायचे झाल्यास ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याचे आराखडे तयार करण्यात आले. गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पुढाकाराने महानगरपालिका स्थायी समितीने अंदाजपत्रकात ७५ लाखांची तरतूद केली. बाकीचा निधी हा डीपीडीसीतून घ्यावा, असे ठरले होते. तसा प्रस्तावसुध्दा डीपीडीसीकडे सादर करण्यात आला.

एक वर्ष या प्रस्तावावर महापालिकेने पाठपुरावा केला नाही, पालकमंत्री सतेज पाटील यांचेही त्याकडे दुर्लक्ष झाले. तोपर्यंत कोरोना संसर्ग सुरु झाला आणि या कोरोनाच्या काळात दीड वर्ष निधीअभावी काहीच झाले नाही. राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष, नगरसेवक पदाधिकाऱ्यांची अनास्था आणि आर्थिक निधीअभावी उपसा केंद्र वर उचलून घेण्याचा प्रस्ताव फाईलमध्येच अडकून पडला. पण या अनास्थेमुळे यावर्षीच्या महापुरात तिन्ही केंद्रे पाण्यात अडकल्यामुळे शहरात नागरिकांना भयंकर पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.