शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कुरबुरीसंबंधी पवारांचे कानावर ‘हात’

By admin | Updated: January 19, 2016 00:36 IST

पक्षविरोधी भूमिका : अनेकजण भेटले; पण तक्रार नाही, राज्याचे पदाधिकारी पाहतील.

कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्षांतर्गंत कुरबुरीसंबंधी मला कोणीही सांगितले नाही. तसे काही नाही, असे म्हणत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ‘कानावर हात’ ठेवल्याचे सोमवारी पत्रकार परिषदेत उघड झाले. दोन दिवस मी कोल्हापुरात आहे; पण मला पक्षातील कुरघोडीसंबंधी एकानेही तक्रार केलेली नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले. शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली. हा मुद्दा राज्य स्तरावर चर्चेला आला. कार्यकर्त्यांमध्येही त्याची सल आहे. खासदार महाडिक सोबत न राहिल्यानेच चांगले वातावरण असताना महापालिका निवडणुकीत ‘एक नंबर’च्या जागा मिळू शकल्या नाही, यासंबंधी कार्यकर्त्यांत सार्वत्रिक चर्चा आहे. यासंबंधी प्रश्न विचारल्यानंतर पवार म्हणाले, मला काही माहिती नाही. तुमच्याकडून ऐकत आहे. कार्यकर्त्यांच्या काही तक्रारी असल्यास राज्य पातळीवरचे पदाधिकारी लक्ष घालतील. देशात पक्षाची ताकद मर्यादित आहे. या वास्तवाचे भान मला आहे. त्यामुळे मी राष्ट्रपतिपदाची अपेक्षा कशी ठेवू ? देशात भाजप सत्तेवर येऊन एक वर्ष झाले आहे. जनतेने या सरकारला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. एका वर्षात भाजप शासनाच्या कामगिरीवर भाष्य करणे योग्य होणार नाही. अनेक बैठकांत सत्ताधाऱ्यांना जनतेच्या विविध प्रश्नांसंबंधीची जाणीव करून देत असतो. सत्ताधारी आम्ही प्रश्न सोडविण्यासाठी पावले उचलत असल्याचे सांगतात. अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी देशहिताला प्राधान्य देत सर्वांनी सहकार्य करणे काळाची गरज आहे. जीएसटी करप्रणालीसाठी मी काही पुढाकार घेणार नाही; पण सर्वपक्षीय बैठकीत जीएसटी येण्यासाठी सहकार्य करावे, असे मत मांडणार आहे.पत्रकार परिषदेस खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, उपमहापपौर शमा मुल्ला, राजू लाटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)राजकारणात असहिष्णुता असणारच...राजकारणात खुर्ची मोकळी होऊन त्या ठिकाणी आपल्याला कसे बसता येईल, असे प्रत्येक जण विचार करत असतात. त्यामुळे राजकारणात असहिष्णुता राहणारच. साहित्यातील असहिष्णुता मात्र दखल घेण्यासारखी आहे. सबनीस यांचे पुणे साहित्य संमेलनातील भाषण ऐकले. त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका मांडली आहे, असे पवार यांनी सांगितले.