शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

क्षीरसागर, चंद्रकांतदादा, नरके हेच ‘घरभेदी’

By admin | Updated: May 21, 2014 17:39 IST

शिवसेनेच्या चिंतन बैठकीत आरोप : शहरप्रमुखांच्या राजीनाम्याची मागणी; ‘सूर्याजी पिसाळ’ शोधा : संजय पवार; भाजपचे अजिबात सहकार्य नाही

 कोल्हापूर : नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील सभा कोणी होऊ दिली नाही, शहरातील ४० टक्के केंद्रांवर पोलींग एजंट का नव्हते, करवीरमध्ये कोणी साटेलोटे केले, अशी विचारणा करत आमदार चंद्रकांतदादा पाटील, राजेश क्षीरसागर व चंद्रदीप नरके हेच खरे घरभेदी असल्याच्या तोफा मंगळवारी शिवसैनिकांनी डागल्या. आपल्या गुणाचे खापर जिल्ह्यावर फोडणार्‍यांचे शहरप्रमुखपदाचा राजीनामा द्यावा, अशी संतप्त मागणी कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या चिंतन बैठकीत केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत अजिबात सहकार्य केले नसल्याची जोरदार टीका या बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर कोल्हापूर मतदारसंघातील शिवसेना पदाधिकार्‍यांची चिंंतन बैठक आज, मंगळवार येथील शाहू स्मारकमध्ये झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख संजय पवार होते. जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी थेट आमदार क्षीरसागर यांच्यावर हल्ला चढविला. स्वार्थी राजकारण करणार्‍यांनी २४ वर्षे निष्ठेने काम करणार्‍यांना निष्ठा शिकवू नये. बहुतांशी प्रभागात पोलींग एजंट का ठेवले नाहीत, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला फसवले, ते नेस्तनाबूत झालेत, हे विसरू नका. करवीरमधीलही मताधिक्याबाबत तपासणी होणे गरजेचे आहे. शिवसेनेची शहर व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करून लोकसभा निवडणुकीतील गद्दार शोधून काढा, अशी मागणी पक्षप्रमुखांकडे करणार असून, कार्यकर्त्यांनी हतबल न होता पुन्हा ताकदीने कामाला लागावे, असेही पवार यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, रक्ताचे पाणी करून गडहिंग्लज विभागात काम केल्याने १९ हजारांचे मताधिक्य मिळाले, टीका करणार्‍यांनी पहिल्यांदा जिल्ह्यात फिरावे. चांगले काम करणार्‍यांना कधीतरी चांगले म्हणा. बैठकीच्या सुरुवातीलाच कमलाकर जगदाळे यांनी तोफ डागली. ते म्हणाले, संजय मंडलिक यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असताना, काही मंडळींनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दोष देण्यास सुरुवात केली. ज्यांना पदे दिली, अशा मंडळींनीच गद्दारी केली, असे गद्दार, नासकी माणसे शिवसेनेत आहेत, तोपर्यंत कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा होणे शक्य नाही. नगरसेवक संभाजी जाधव म्हणाले, शहरप्रमुख म्हणून आमदार क्षीरसागर यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, बहुतांशी केंद्रावर पोलींग एजंट नव्हते, असे का? नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरातील सभा कोणी होऊ दिली नाही, याचा पंचनामा झालाच पाहिजे. पंचायत समिती सदस्य तानाजी आंग्रे यांनी आक्रमक शैलीत क्षीरसागर व नरके यांच्यावर हल्लाबोल केला. करवीरमध्ये निष्ठावंत शिवसैनिकाला किंमत नाही, स्वत:च्या संसारावर तुळशीपत्र ठेवून गेली वीस वर्षे काम करत आहे. ‘गोकुळ’मधील ढपल्यासाठी ज्यांनी तत्कालीन मंत्री नारायण राणे यांचे पाय धरून हा भगवा कधीही खांद्यावरून खाली ठेवणार नाही, म्हणणार्‍यांची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. कोणी कोणाला मदत केली, हे एका व्यासपीठावर येऊन तपासावे. पक्षनेतृत्वाला कोणी फसवत असेल तर आगामी काळात त्यांना चकमा दिल्याशिवाय राहणार नाही. हर्षल सुर्वेे म्हणाले, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. आपणच पायात पाय अडकून तोंडावर पडलो आहोत, याचे आत्मचिंतन करा. सत्तेसाठी कार्यकर्त्यांचे मुडदे पाडलेले नेते एकत्र येऊ शकतात मग शिवसेनेतील नेत्यांमध्ये ‘मीपणा’ कशासाठी, निवडणुकीत कोण सूर्याजी पिसाळ झाला, त्याचा शोध घेऊन हकालपट्टी करावी. (प्रतिनिधी)