शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

कृष्णा, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी शिरोळकरांचे ‘शंखध्वनी’

By admin | Updated: December 29, 2015 01:03 IST

दूषित पाण्याच्या बाटल्यांचे तोरण : लाक्षणिक धरणे आणि ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : कृष्णा व पंचगंगा नदीकाठाशेजारील गावांतील शेतकरी दूषित पाण्याच्या विषाने दररोज मरणयातना भोगतो आहे. त्याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरोळसह आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी करत एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन व ठिय्या आंदोलन केले. यावेळी दूषित पाण्याच्या बाटल्यांचे तोरणही कार्यालयाच्या गेटला बांधले.कृष्णा व पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना रोज या दूषित पाण्याच्या विषाने मरणयातना भोगाव्या लागत आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास शिरोळ ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना देण्यात आले. आंदोलनात संजय माळी, सुभाष कोळी-कुटवाडे, वसंतराव कोळी, मन्सूर मुजावर, सुनील कोळी, दिलावर मुजावर, अशोक कोळी, महावीर कोकणे, अण्णाप्पा राजमाने, रवींद्र महापुरे, शकुंतला महात्मे, शांताबाई शेट्टी, सुशीला चुडमुंगे, अंजना देशमुख, भाग्यश्री गावडे सहभागी होते. (प्रतिनिधी)आंदोलकांची फलकासह घोषणाबाजीयावेळी आंदोलकांच्या हातात ‘गंगा पॅटर्नप्रमाणे कृष्णा-पंचगंगेचे धोरण राबवा...’, ‘जलसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती...’, ‘पाणी वाचवा...देश वाचवा...’, ‘आपत्तीग्रस्त म्हणून सवलती द्या...’ ‘शुद्ध पाणी हा माझा जन्मसिद्ध हा हक्क आहे, तो मी मिळविणारच...’असे फलक दिसत होते. समोर दूषित पाण्याने भरलेल्या पाण्याच्या बाटल्यांचे तोरण ठेवण्यात आले होते.