शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

कृष्णा, पंचगंगा प्रदूषणप्रश्नी शिरोळकरांचे ‘शंखध्वनी’

By admin | Updated: December 29, 2015 01:03 IST

दूषित पाण्याच्या बाटल्यांचे तोरण : लाक्षणिक धरणे आणि ठिय्या आंदोलन

कोल्हापूर : कृष्णा व पंचगंगा नदीकाठाशेजारील गावांतील शेतकरी दूषित पाण्याच्या विषाने दररोज मरणयातना भोगतो आहे. त्याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरोळसह आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी करत एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन व ठिय्या आंदोलन केले. यावेळी दूषित पाण्याच्या बाटल्यांचे तोरणही कार्यालयाच्या गेटला बांधले.कृष्णा व पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांना रोज या दूषित पाण्याच्या विषाने मरणयातना भोगाव्या लागत आहे. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास शिरोळ ग्रामपंचायत सदस्य प्रसाद धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना देण्यात आले. आंदोलनात संजय माळी, सुभाष कोळी-कुटवाडे, वसंतराव कोळी, मन्सूर मुजावर, सुनील कोळी, दिलावर मुजावर, अशोक कोळी, महावीर कोकणे, अण्णाप्पा राजमाने, रवींद्र महापुरे, शकुंतला महात्मे, शांताबाई शेट्टी, सुशीला चुडमुंगे, अंजना देशमुख, भाग्यश्री गावडे सहभागी होते. (प्रतिनिधी)आंदोलकांची फलकासह घोषणाबाजीयावेळी आंदोलकांच्या हातात ‘गंगा पॅटर्नप्रमाणे कृष्णा-पंचगंगेचे धोरण राबवा...’, ‘जलसंपत्ती ही राष्ट्रीय संपत्ती...’, ‘पाणी वाचवा...देश वाचवा...’, ‘आपत्तीग्रस्त म्हणून सवलती द्या...’ ‘शुद्ध पाणी हा माझा जन्मसिद्ध हा हक्क आहे, तो मी मिळविणारच...’असे फलक दिसत होते. समोर दूषित पाण्याने भरलेल्या पाण्याच्या बाटल्यांचे तोरण ठेवण्यात आले होते.