शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोचीचा पाण्याचा प्रश्न मिटला; परंतु योजनाच बनली प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:30 IST

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड ते दोन किलोमीटर फिरावे लागत होते. महिन्यातून दोनवेळा ...

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड ते दोन किलोमीटर फिरावे लागत होते. महिन्यातून दोनवेळा पिण्याचे पाणी या गावाला मिळत होते. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. याची दखल घेत आमदार प्रकाश आवाडे यांनी गावात जलस्वराज्य पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र, ऑडिटवरून ही योजनाच सध्या एक प्रश्न बनून राहिली आहे.

गावाला स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, यासाठी ग्रामसभेची मंजुरी घेण्यात आली. ३१ जुलै २००७ ला चार कोटी २७ लाख ९ हजार ३०० रुपयांचा आराखडा तयार करून जिल्हा परिषदेने त्याला मंजुरी दिली. त्यानुसार रुई (ता. हातकणंगले) येथील पंचगंगा नदीकाठावर जॅकवेल बांधून तेथून १५० अश्वशक्ती क्षमतेच्या पंपाने पाणी उपसा करण्याचे ठरविण्यात आले. कोरोचीमधील विवेकानंदनगरमध्ये ०५.१० दशलक्ष लिटर इतक्या क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला.

दरम्यान, पुन्हा २४ डिसेंबर २०१० ला सुधारित आराखडा तयार करून सहा कोटी २६ लाख ६३ हजार ८६८ रुपयांची मंजुरी जिल्हा परिषदेकडून घेतली. त्यानंतर १ एप्रिल २०११ मध्ये काम पूर्ण करण्यात आले. (पूर्वार्ध)

चौकट

सन २०११ मध्ये गावाची लोकसंख्या वीस हजार ४२० होती. गावाला एक दिवसआड पाणी मिळावे यासाठी जलस्वराज्य प्रकल्प पाणीपुरवठा योजना आणण्यात आली. त्यानुसार घरगुती पाणीपट्टी १८०० रुपये, तर औद्योगिक वापरासाठी वार्षिक पाणीपट्टी तीन हजार ६०० रुपये आकारण्याचे ठरविण्यात आले.