शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर आघाडीत उमेदवारीचा गुंता

By admin | Updated: September 15, 2014 00:49 IST

महायुतीची व्यूहरचना निश्चित : ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही काँग्रेसमध्ये तणाव, संभ्रम

भारत चव्हाण -कोल्हापूर -कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कॉँग्रेसच्या वाट्याला गेला आहे; परंतु गतवेळच्या पराभवातून न सावरलेल्या मालोजीराजे छत्रपती यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने हक्क सांगितला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन कॉँग्रेसमध्ये तणाव, संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मतदारसंघ कोणाला जाणार याविषयी इच्छुक असणाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता वाढली आहे. कॉँग्रेसकडून नगरसेवक सत्यजित कदम, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण व त्यांचे पुत्र सागर चव्हाण यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. कदम यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोर लावला असून शहरातील अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी गणेशोत्सवात जवळीक साधली आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास खासदार धनंजय महडिक, आमदार महादेवराव महाडिक यांचे प्रत्यक्ष सहकार्यही मिळणार आहे. मात्र, बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर कदम यांना काँग्रेस गोटातूनच मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. दक्षिण मतदारसंघात आमदार महादेवराव महाडिक यांचा होत असलेला हस्तक्षेप आणि त्यातून त्यांच्यात आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात होत असलेल्या राजकीय तणावाचा फटका कदम यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची सुरुवातही झाली आहे. त्याचे कारण म्हणजे माजी महापौर सागर चव्हाण यांचे अचानक पुढे आलेले नाव हेच आहे. सागर चव्हाण यांनी निवडणुकीची कसलीही तयारी केली नाही, तरीही त्यांनी उमेदवारी मागून सर्वांनाच चकित केले. प्रल्हाद चव्हाण हे कॉँग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते असले तरी निवडणूक लढविण्याचे त्यांचे वय नाही. त्यामुळे मला नाही तर मुलाला द्या, असा त्यांचा आग्रह राहील आणि त्यास मंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य राहील, असे चित्र आहे. अशावेळी निवडणूक लढविण्याची तयारी केलेल्या सत्यजित कदम यांच्यासमोर एक तर बंडखोरी करणे किंवा दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळविणे असे पर्याय राहतात. राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा करून उत्सुकता आणि उत्कंठा तसेच तणाव वाढवून ठेवला आहे. आर. के. पोवार यांनाच उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा इरादाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकदा बोलून दाखविला होता. माजी नगरसेवक संभाजी देवणे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली असली तरी त्यांचा टिकाव या शर्यतीत लागणार नाही,असे दिसते. जर राष्ट्रवादीकडे ही जागा गेलीच तर आर. के. यांच्याऐवजी सत्यजित कदम यांचेही नाव पुढे येऊ शकते. कॉँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जागा वाटप आणि उमेदवारी निश्चित करण्यावरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे शिवसेनेच्या गोटात काहीसे आनंदाचे वातावरण आहे. कारण आता कोणालाही मतदारसंघ गेला आणि कोणालाही उमेदवारी मिळाली तरी दगाबाजीचा धोका आघाडीतच आहे.शिवसेनेच्या क्षीरसागर यांनी एकतर्फी तयारी केली आहे. शिवसेनेतही काही प्रमाणात नाराजी आहे. प्रबळ दोन गट आहेत; परंतु त्याचा अधिक फटका क्षीरसागर यांना बसेल, असे वाटत नाही. कॉँग्रेस आघाडीतूनच त्यांना सहकार्य होण्याची शक्यता आहे. एकंदरीत विचार केला तर कोल्हापूर दक्षिणमधील राजकारणाचे पडसाद या मतदार- संघावर उमटणार आहेत एवढे नक्की! डाव्या आघाडीने भाकपच्या रघुनाथ कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. सध्या शहरातील डाव्या आघाडीची ताकद पाहता या पक्षाला फारशा अपेक्षाही नाहीत; परंतु निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाचे अस्तित्व आणि कार्यकर्त्यांना बांधून ठेवणे हेच त्यांचे मुख्य धोरण राहील. त्यामुळे या मतदारसंघात खरी लढत ही महायुती विरुद्ध कॉँग्रेस आघाडी यांच्यात होणार आहे. महायुतीचा मल्ल ठरलेला आहे. आघाडीचा मल्ल कोण हे निश्चित झालेले नाही. आघाडीचा उमेदवार किती ताकदीचा असेल त्यावरच निवडणुकीचे रंगत ठरणार आहे. शिवसेना-भाजप महायुतीचा वारु रोखण्यासाठी कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने जोरदार तयारी केली असली तरी कोल्हापूर उत्तर मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार तसेच त्यांचा उमेदवार कोण असणार हेच अद्याप निश्चित न झाल्याने कॉँग्रेस आघाडीच्या पातळीवर प्रचंड संभ्रमावस्था आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सलग दुसऱ्या विजयासाठी व्यूहरचना निश्चित करून कामालाही सुरुवात केलीय. या निवडणुकीत फंदफितुरीचे राजकारण शिवसेनेपेक्षा कॉँग्रेस आघाडीत अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत.