शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

लाच कारवाईत पुणे विभागात कोल्हापूरची ‘क्वालिटी’ कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:21 IST

कोल्हापूर : लाचखोरांना गजाआड टाकण्यासाठी गेल्या वर्षभरात, तसेच चालू वर्षातही पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्याची ‘क्वालिटी’ कामगिरी झाली आहे. प्रथमवर्ग ...

कोल्हापूर : लाचखोरांना गजाआड टाकण्यासाठी गेल्या वर्षभरात, तसेच चालू वर्षातही पुणे विभागात कोल्हापूर जिल्ह्याची ‘क्वालिटी’ कामगिरी झाली आहे. प्रथमवर्ग दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते शिपाई, खासगी पंटरवरही कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी भयमुक्त राहून बिनदिख्खतपणे लाचखोराविरोधात पाऊल उचलावे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास पुणे विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरात मुद्रांक जिल्हाधिकारी, सह जिल्हा निबंधक कार्यालयातील सहायक नगररचनाकार (वर्ग २) गणेश माने याला २० लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. राज्यातील सर्वांत मोठी कारवाई असल्याने त्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक नाडगौडा कोल्हापुरात आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, वर्षभरात तसेच चालू वर्षात संपूर्ण विभागात कोल्हापूरने ‘क्वालिटी’ कामगिरी केली. गेल्या महिन्याभरात कोल्हापूर विभागाने लाचेच्या तीन कारवाई करून लाचखोरांना गजआड केले. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक आदीनाथ बुधवंत व त्यांच्या टीमचे काम कौतुकास्पद आहे.

बिनधास्त तक्रारीसाठी पुढे या..

लाचेशिवाय तुमचे काम आडवणूक होत असेल तर त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यासाठी नागरिकांनी भय न बाळगता बिनदिख्खतपणे पुढे यावे, तक्रारदाराचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक नाडगौडा यांनी केले.

किमान चार महिने तरी कामकाज सुधारते...

लाचप्रकरणी कारवाईनंतर त्या कार्यालयात पुढील तीन महिने अधिकारी व कर्मचारी लाच न घेता झटपट कामे होतात. पण, चार-पाच महिन्यांनंतर पुन्हा लाच घेतल्याशिवाय कामे होत नाहीत हे तितकेच सत्य आहे. त्यामुळे अशा कार्यालयावर किमान चार महिन्यांतून एकदा तरी लाचखोरांना पकडावे, आरोपींना गजाआड करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

तक्रारदार होतो फितूर

लाचप्रकरणात आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण मोठे आहे. यावर ते म्हणाले, सरकारी पंच फितूर होत नाहीत; पण तक्रारदारच फितूर होण्याचे मोठे प्रमाण असल्याने अनेक लाचखोर निर्दोष सुटतात, ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो नं. ०६०२२०२१-कोल-सुहास नाडगोंडा