शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात ‘लय भारी’

By admin | Updated: March 5, 2015 00:25 IST

‘यशवंत पंचायत राज’मध्ये प्रथम : कागल पंचायत समितीचा तिसरा क्रमांक

कोल्हापूर : यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत यंदा ‘अत्युत्कृष्ट’ म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांक मिळवून ‘लय भारी’ ठरत तब्बल २५ लाखांच्या बक्षिसाची मानकरी झाली आहे. द्वितीय क्रमांक नाशिक, तर तृतीय क्रमांक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने पटकाविला आहे. केंद्र शासनाकडून पंचायत राजव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी २००५-०६ या वर्षापासून विभाग व राज्य अशा दोन्ही स्तरांवर ‘यशवंत पंचायत राज अभियान’ ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून प्रत्येक वर्षी पंचायत राज संस्थांमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते. शासकीय व्यवस्थापन, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पूर्ण केलेले भौतिक व आर्थिक उद्दिष्ट, लेखापरीक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मूल्यमापन केले जाते. विभागीय स्तरावर क्रमांक मिळविलेल्यांची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड होते. सन २०१४-१५ वर्षात येथील जिल्हा परिषदेने पुणे विभागात पहिला क्रमांक पटकावला व राज्य स्तरावरील क्रमांकासाठी पात्र ठरली होती. कोल्हापूरसह राज्यातील सहा विभागांतून पहिला क्रमांक मिळविलेल्या सहा जिल्हा परिषदा, नऊ पंचायत समित्या, ४२ ग्रामपंचायतींची तपासणी महिन्यापूर्वी झाली होती. त्याचा निकाल शासनाने मंगळवारी जाहीर केला आहे.विजेत्यांना मुंबई येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी १५ मार्च रोजी जाहीर कार्यक्रम करून बक्षीस वितरण केले जाणार आहे. राज्यस्तरावर क्रमांक मिळविलेल्या जिल्हा परिषदांना अनुक्रमे २५ लाख, १५ लाख, १० लाख; तर पंचायत समित्यांना अनुक्रमे १५ लाख, १२ लाख, १० लाख असे रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. याशिवाय पुणे विभागात पहिला क्रमांक मिळविलेल्या कागल पंचायत समितीला दहा लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या गडहिंग्लज पंचायत समितीस सात लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. विजेते असे..राज्यस्तरावरील अनुक्रमे जिल्हा परिषद - कोल्हापूर, नाशिक, सिंधुदुर्ग.पंचायत समिती : रेमणापूर (जि. लातूर), देवगड (जि. सिंधुदुर्ग), कागल (जि. कोल्हापूर).