शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

आचारसंहितेपूर्वी कोल्हापूर ‘टोलमुक्त’

By admin | Updated: August 10, 2015 01:15 IST

चंद्रकांतदादा पाटील : कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी उद्या बैठक

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राज्य टोलमुक्तीचे दिलेले आश्वासन ९० टक्के पूर्ण केले आहे. कोल्हापुरातदेखील टोलमुक्तीच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. याबाबतचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहीर होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘एमएच ०९’ वगळून कोल्हापूर जिल्हा टोलमुक्त झाला असता; परंतु टोलविरोधी कृती समितीचा आग्रह आडवा आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण टोलमुक्तीसाठी सकारात्मकता दाखविली. त्यानुसार त्याची प्रक्रिया सुरू केली. मूल्यांकन पूर्ण करून टोलविरोधी कृती समितीचे मत लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. आपण म्हणतो, ‘आयआरबी’ला व्याजासहित ३०० कोटी द्यावे लागतात. याउलट ‘आयआरबी’ म्हणते व्याजासहित ८०० कोटी रुपये द्यावे लागतात. याबाबत सरकार आणि ‘आयआरबी’ यांच्यात चर्चा होऊन पाया निश्चित केला जाईल. त्या दृष्टीने बैठका सुरू होतील. यातून अंतिम निर्णयासाठी थोडा वेळ लागणार आहे. या दृष्टीने मोडस आॅपरेटिंग करण्याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी उद्या, मंगळवारी बैठक होईल. यासाठी टोलविरोधी कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित असतील. ३० सप्टेंबरला आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी टोलमुक्तीचा निर्णय होईल, अशी मला खात्री आहे. हा निर्णय टोल कायमचा बंद होईल, असाच असेल. (प्रतिनिधी)ठोस निर्णय हवा... अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवूसरकारनेच नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीच्या उपसमितीने २३९ कोटी ६४ लाख रुपयांचे वास्तववादी मूल्यांकन करून तो अहवाल सादर केल्यामुळे ‘आयआरबी’चे पितळ उघडे पडले आहे. उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर टोलविरोधी कृती समितीचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आर्किटेक्ट असोसिएशनचे राजेंद्र सावंत, बार असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच ज्या ज्या घटक संस्था या समितीत आहेत, त्यांचे एक प्रतिनिधी या बैठकीस हजर राहणार आहेत. आम्हाला ठोस निर्णय या बैठकीद्वारे हवा आहे. तो जर मिळाला नाही, तर आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी दिला आहे.