शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
5
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
6
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
7
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
8
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
9
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
10
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
11
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
12
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
13
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
14
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
15
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
16
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
17
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
18
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा युवा नेता निघाला काँग्रेसचा आमदार, वाद होताच दिला पदाचा राजीनामा
19
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
20
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार

आचारसंहितेपूर्वी कोल्हापूर ‘टोलमुक्त’

By admin | Updated: August 10, 2015 01:15 IST

चंद्रकांतदादा पाटील : कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी उद्या बैठक

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राज्य टोलमुक्तीचे दिलेले आश्वासन ९० टक्के पूर्ण केले आहे. कोल्हापुरातदेखील टोलमुक्तीच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. याबाबतचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहीर होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘एमएच ०९’ वगळून कोल्हापूर जिल्हा टोलमुक्त झाला असता; परंतु टोलविरोधी कृती समितीचा आग्रह आडवा आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण टोलमुक्तीसाठी सकारात्मकता दाखविली. त्यानुसार त्याची प्रक्रिया सुरू केली. मूल्यांकन पूर्ण करून टोलविरोधी कृती समितीचे मत लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. आपण म्हणतो, ‘आयआरबी’ला व्याजासहित ३०० कोटी द्यावे लागतात. याउलट ‘आयआरबी’ म्हणते व्याजासहित ८०० कोटी रुपये द्यावे लागतात. याबाबत सरकार आणि ‘आयआरबी’ यांच्यात चर्चा होऊन पाया निश्चित केला जाईल. त्या दृष्टीने बैठका सुरू होतील. यातून अंतिम निर्णयासाठी थोडा वेळ लागणार आहे. या दृष्टीने मोडस आॅपरेटिंग करण्याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी उद्या, मंगळवारी बैठक होईल. यासाठी टोलविरोधी कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित असतील. ३० सप्टेंबरला आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी टोलमुक्तीचा निर्णय होईल, अशी मला खात्री आहे. हा निर्णय टोल कायमचा बंद होईल, असाच असेल. (प्रतिनिधी)ठोस निर्णय हवा... अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवूसरकारनेच नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीच्या उपसमितीने २३९ कोटी ६४ लाख रुपयांचे वास्तववादी मूल्यांकन करून तो अहवाल सादर केल्यामुळे ‘आयआरबी’चे पितळ उघडे पडले आहे. उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर टोलविरोधी कृती समितीचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आर्किटेक्ट असोसिएशनचे राजेंद्र सावंत, बार असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच ज्या ज्या घटक संस्था या समितीत आहेत, त्यांचे एक प्रतिनिधी या बैठकीस हजर राहणार आहेत. आम्हाला ठोस निर्णय या बैठकीद्वारे हवा आहे. तो जर मिळाला नाही, तर आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी दिला आहे.