शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वी कोल्हापूर ‘टोलमुक्त’

By admin | Updated: August 10, 2015 01:15 IST

चंद्रकांतदादा पाटील : कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी उद्या बैठक

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने राज्य टोलमुक्तीचे दिलेले आश्वासन ९० टक्के पूर्ण केले आहे. कोल्हापुरातदेखील टोलमुक्तीच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. याबाबतचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जाहीर होईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘एमएच ०९’ वगळून कोल्हापूर जिल्हा टोलमुक्त झाला असता; परंतु टोलविरोधी कृती समितीचा आग्रह आडवा आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण टोलमुक्तीसाठी सकारात्मकता दाखविली. त्यानुसार त्याची प्रक्रिया सुरू केली. मूल्यांकन पूर्ण करून टोलविरोधी कृती समितीचे मत लक्षात घेऊन कार्यवाही सुरू आहे. आपण म्हणतो, ‘आयआरबी’ला व्याजासहित ३०० कोटी द्यावे लागतात. याउलट ‘आयआरबी’ म्हणते व्याजासहित ८०० कोटी रुपये द्यावे लागतात. याबाबत सरकार आणि ‘आयआरबी’ यांच्यात चर्चा होऊन पाया निश्चित केला जाईल. त्या दृष्टीने बैठका सुरू होतील. यातून अंतिम निर्णयासाठी थोडा वेळ लागणार आहे. या दृष्टीने मोडस आॅपरेटिंग करण्याबाबतची कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी उद्या, मंगळवारी बैठक होईल. यासाठी टोलविरोधी कृती समितीचे प्रतिनिधी उपस्थित असतील. ३० सप्टेंबरला आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी टोलमुक्तीचा निर्णय होईल, अशी मला खात्री आहे. हा निर्णय टोल कायमचा बंद होईल, असाच असेल. (प्रतिनिधी)ठोस निर्णय हवा... अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवूसरकारनेच नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीच्या उपसमितीने २३९ कोटी ६४ लाख रुपयांचे वास्तववादी मूल्यांकन करून तो अहवाल सादर केल्यामुळे ‘आयआरबी’चे पितळ उघडे पडले आहे. उद्या, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांतदादा पाटील यांच्याबरोबर टोलविरोधी कृती समितीचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आर्किटेक्ट असोसिएशनचे राजेंद्र सावंत, बार असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच ज्या ज्या घटक संस्था या समितीत आहेत, त्यांचे एक प्रतिनिधी या बैठकीस हजर राहणार आहेत. आम्हाला ठोस निर्णय या बैठकीद्वारे हवा आहे. तो जर मिळाला नाही, तर आम्ही आमच्या आंदोलनाची तीव्रता आणखी वाढवू, असा इशारा टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांनी दिला आहे.